एक्स्प्लोर

Election Result 2022 : कुठे काय झालं, वाचा आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या 10 घडामोडी...

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. आत्तापर्यंत पंजाब वगळता अन्य ठिकाणी भाजप आघाडीवर आहे.

Election Result 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. अद्याप पूर्ण चित्र स्पष्ट झाले नसले तरी मतदारांनी कल कोणाच्या बाजून दिले आहेत, ते स्पष्ट झाले आहे. पंजाब वगळता अन्य चार राज्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याठिकाणी आम आदमी पार्टीने मोठी मुसंडी ठिकाणी मारली आहे. जवळपास 80 च्या आसपास जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंत या पाच राज्यात नेमकं कुठे काय झालं? पाहुयात आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या दहा घडामोडी....

आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या 10 घडामोडी

पंजाबमध्ये आपचा करिष्मा

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. आपने पंजामध्ये 80 च्या आसपास जागांवर आघाडी घेतली आहे. त्या ठिकाणी काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ 18 जागांवर काँग्रेस पंजाबमध्ये आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आप पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

उत्पल पर्रिकरांचा पराभव 

सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे गोव्यातील आहे. गोव्यातून पणजी विधानसभा मतदारसंघातून गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे. उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे. उत्पल पर्रिकर हे भाजपचे बंडखोर उमेदाव होते.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची आघाडी

अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण जवळपास 250 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर समाजवादी पार्टी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. समाजवादी पार्टी 110 जागांवर आघाडीवर असून, इतर पक्षांचे उमेदवार हे 13 जागांवर आघाडीवर आहेत.

पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसला धक्का

गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपच 
 
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. यामध्ये 44 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शिवसेनेचा फ्लॉप शो

महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेचा अद्याप एकही उमेदवार निवडून आलेला नाही. शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे. 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. काही वेळ प्रमोद सावंत हे पिछाडीवर गेले होते. मात्र, अखेर ते 500 मतांनी विजयी झाले आहेत. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे.

मणिपूरमध्येही भाजपची आघाडी

2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे एक्झीट पोलमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, मणिपूरमध्ये भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचल सुरु आहे. मणिपूरमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे. इतर अमेदवार 14 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये देखील पुन्हा भाजपचं सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

गोव्यात भाजप बहुमताच्या दिशेनं

गोव्यात यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अन्य पक्षाची मदत घ्यावी लागणार नसल्याचे वातावरण तार झाले आहे. कारण सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. पुन्हा गोव्यात भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.

1993 नंतर बसपाची सर्वांत वाईट कामगिरी

उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे. हाती आलेल्या कलानुसार बसपा केवळ पाच जागांवर आघाडीवर आहे.  2017 च्या निवडणुकीत बसपाला 19 जागांवर विजय मिळवता आला होता. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget