एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : केजरीवालांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाडला, दिल्लीतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Delhi Election Result : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेतही दिल्लीकरांनी भाजपवर विश्वास दाखवला असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुंबई : अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली. त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभारल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दिल्लीमध्ये 27 वर्षांनी भाजपने सत्ता मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन केलं. हा नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास असल्याचं ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केजरीवाल यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाटला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देत त्यांनी राज्य केलं, त्याचा अंत झाला. दिल्लीतील जनता लोकसभेत मोदींवर विश्वास दाखवायची. आता विधानसभेतही मोठा विजय मिळाला आहे. हे विकासाला दिलेलं मत आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार लोकांचे आशा आणि आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करणार. दिल्लीतील जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी भाजप प्रयत्न करणार.

दिल्लीतील मराठी माणूस मोदींच्या मागे

दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभा राहिला याचा अभिमान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'एक है तो सेफ है' हा नारा दिल्लीमध्येही चालला आहे. हा नारा आता देशाने स्वीकारला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

काँग्रेसला पराभव होणार हे माहिती होतं 

दिल्लीमध्ये काँग्रेसला काही मिळणार नाही हे राहुल गांधी यांना आधीच माहिती होतं. त्यामुळे हारल्यानंतर काय बोलायचं याची कारणं त्यांनी आधीच ठरवली होती असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

दिल्लीत भाजपचा मोठा विजय

दिल्लीच्या निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनंतर जोरदार कमबॅक करत भाजपनं आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला. 70 पैकी तब्बल 48 जागांवर विजय मिळवत भाजपनं दिल्ली काबीज केली. भाजपच्या तडाख्यात आपच्या दिग्गजांचाही पराभव झाला. 

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मांनी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला. आम आदमी पार्टीला गेल्यावेळच्या तुलनेत तब्बल 40 जागांचा फटका बसला. गेल्यावेळी 70 पैकी तब्बल 62 जागा मिळवणाऱ्या आपला यावेळी 25 चा आकडाही ओलांडता आला नाही. काँग्रेसनं मात्र शून्याची हॅट्रिक केल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget