एक्स्प्लोर

कुणालाही खड्यासारखे बाजूला केलेलं नाही, पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलतात : मुख्यमंत्री

आंदोलन केल्यावर हे सरकार लाठ्या मारत नाही हे लक्षात आल्यावर आमच्या काळात आंदोलनं वाढली. आमच्या काळात झालेली आंदोलनं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. आम्ही समस्यांवर तोडगा काढला, म्हणूनच लोकं आम्हाला निवडून देतात, असेही ते म्हणाले.

मुंबई : पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. पक्ष काही प्रयोग करत असतो. तो पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आहे. कुणाला डावलण्याकरता दुसऱ्यांना संधी दिलेली नाही. कुणालाही खड्यासारखे बाजूला केलेलं नाही. ते पक्षात आहेत आणि पक्षासाठी काम करत राहतील, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचा आशीर्वाद ज्यांना मिळतो तोच मुख्यमंत्री होतो. मात्र आमचा पक्ष ठरवतो कोण मुख्यमंत्री होणार. मी चांगलं काम केलं आहे म्हणून मलाच मुख्यमंत्री बनवतील असा विश्वास आहे. हे आत्मप्रौढी नाही, असेही ते म्हणाले. सोबतच आम्ही 2014 ला युती घोषित केल्यानंतरच उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेसोबत आमची चर्चा झाली होती. आम्ही उपमुख्यमंत्री देण्यास तयार आहोत असं सांगितलं होतं, मात्र शिवसेनेने कमी कालावधीसाठी नको असं म्हटलं, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी पक्षप्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, आपला शक्तिसंचय झाला पाहिजे. म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. शक्तिसंचय थांबल्याने शक्तीचा ऱ्हास होतो. आज जवळ जवळ सगळेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडून आलेले नेते पहिले भाजपा आणि दुसरे शिवसेनेला प्राथमिकता देतात. काहींना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. यासाठी आमचे निकष ठरले होते, असे ते म्हणाले.  ज्या जागा आम्ही कधी जिंकलो नाही तिथे जिंकणाऱ्या लोकांना आम्ही घेतलं.  या लोकांना आपण पचवू शकू का? म्हणजे आपल्या धोरणांशी सुसंगत राहतील असे लोक घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेला कधी गृहीत धरू नये. जनतेला गृतीत धरलं की जनता तुमचा त्याग करते. स्वतःच्या पलीकडे विचार करत नाहीत असं जनतेला कळलं की जनता नाकारते, असे ते म्हणाले. राजकारणी माणसांकरिता जनता ही टॉनिक असते. जनतेच्या प्रतिसादाची शक्ती मला मिळते म्हणून मी फ्रेश असतो, असेही ते म्हणाले. यावेळी मित्रपक्षांच्या जागांबाबत ते म्हणाले की, मित्रपक्षांनीच आमचं चिन्ह मागितलं, आम्ही त्यांना दिलं. काही ठिकाणी मित्रपक्षांनी आमचे उमेदवारही नेले. आमचा कुठलाही आग्रह नव्हता की त्यांनी आमच्या चिन्हावर लढावं. मात्र एक चिन्ह आम्हाला मिळत नसल्याने आम्ही कमळाच्या चिन्हावर लढू असे आरपीआयकडून सांगितलं गेलं. जानकरांनी चिन्ह मागितले नाही. मात्र त्यांच्या उमेवारांनी चिन्ह मागून नेलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या काळातल्या नाहीत. शेतकरी आत्महत्येचं पाप राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आहे. 15 वर्ष सरकार होत त्यावेळी यांनी काय केलं. ज्या भागात सिंचन आहे तिथं आत्महत्या नाहीत. आम्ही 140 प्रकल्प पूर्ण करू. राज्यातील हे सगळे प्रकल्प आम्ही पूर्ण करण्याचं काम आम्ही सुरु केलं आहे, असे त्यांनी सांगितलं. आंदोलन केल्यावर हे सरकार लाठ्या मारत नाही हे लक्षात आल्यावर आमच्या काळात आंदोलनं वाढली. आमच्या काळात झालेली आंदोलनं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. आम्ही समस्यांवर तोडगा काढला, म्हणूनच लोकं आम्हाला निवडून देतात, असेही ते म्हणाले.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
Supriya Sule on Baramati Byelection 2026: रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
Embed widget