एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कोण पेरतंय हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखा माणूस कसं पेरणार? माझ्या जातीला कोण विचारतंय? असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात गेल्या 5 वर्षात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर बोलता येत नाही. मात्र  वेळ पडल्यास नक्की बोलेन असेही मुख्यमंत्री म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. VIDEO | राष्ट्रवादीकडून जातीयवादाचं विष, शरद पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर | एबीपी माझा सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कोण पेरतंय  हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखा माणूस कसं पेरणार? माझ्या जातीला कोण विचारतंय? असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पण मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा-ओबीसी संघर्ष पेटविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाला सांभाळलं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, हे वारंवार जनतेच्या मनावर ठसवलं, तर द्वेष निर्माण होईल असं शरद पवारांना वाटतं, असा घणाघातही फडणवीसांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही शरद पवार चालवत आहेत, असं दिसतंय, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादीने कशी वागणूक दिली हे धनगर समाजाने पाहिलं, त्यांचा आमच्यावर विश्वास असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, या विधानावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील जोरदार टीका केली आहे. शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यावर लोकांना माहिती असतं त्यामागे ते काय म्हणतात. शिरुरचा उमेदवार देतांना मातीचा की जातीचा विचार केला होता? असा सवाल करत जातीच्या आधारावर आता मतं मिळणार नाहीत, हे शरद पवारांना कळायला लागलंय, असा टोला तावडे यांनी लगावला आहे. सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते बाहेर राहिले नसते : मुख्यमंत्री जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षर्थ नेते बाहेर राहिले नसते, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये उत्तर देताना केला. मनसे आता उनसे म्हणजे 'उमेदवार नसलेली सेना' झाली आहे, असा घणाघातही फडणवीसांनी केला. तर शरद पवार हे राज्यात जातीभेदाचं विष पसरवत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते राहिले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असं म्हणत फडणवीसांनी दबावतंत्राचा आरोप फेटाळून लावला. जीएसटीमुळे भ्रष्टाचार बंद झाला आणि सरकारी तिजोरीत पैसा आला. त्यामुळे तो सर्वसामान्य, शेतकरी यांच्यापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या घोषणा भाजपने कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कुठून येणार? हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. मात्र भाजप जबाबदार पक्ष आहे. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे शब्द देताना तरतूद करावीच लागेल. संवेदनशील पंतप्रधानाने समाजाची गरज ओळखून केलेलं संवेदनशील घोषणापत्र, अशा शब्दात फडणवीसांनी भाजपच्या संकल्पपत्राचं वर्णन केलं. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोललेच नव्हते, असा दावा फडणवीसांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा भाजपचं संकल्पपत्र काढून बघा, असं खुलं आव्हानही फडणवीसांनी दिलं. भाजपने दिलेल्या 540 आश्वासनांपैकी 520 पूर्ण झाली आहेत, तर 20 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असंही ते म्हणाले. राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. बालाकोटचा पुरावा मागणाऱ्यांना देशद्रोही म्हटलंच नाही. मात्र सैन्याने दिलेल्या माहितीवर आतापर्यंत कोणी अविश्वास दाखवला नव्हता, असं फडणवीस म्हणाले. राज ठाकरे पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड आहेत. मनसे आता उनसे झाली आहे. उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना, अशी टीकाही फडणवीसांनी केली. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वर्णन केलं. शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या, कलगीतुरे रंगले, मात्र विकासाच्या मुद्द्यावर कायमच एकमत झालं. शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होते, मात्र कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही, असा दावाही फडणवीसांनी केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: 'काल मला सुनेत्रा वाहिनींचा फोन आला...', बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला जाणार की नाही, सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
'काल मला सुनेत्रा वाहिनींचा फोन आला...', बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला जाणार की नाही, सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
Beed Massajog Election : '...तर गावासमोर नाक घासून पाठिंबा द्यायला तयार'; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या विरोधात निवडणुकीत शड्डू ठोकलेल्या स्वरूपानंद देशमुखांचं मोठं वक्तव्य
'...तर गावासमोर नाक घासून पाठिंबा द्यायला तयार'; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या विरोधात निवडणुकीत शड्डू ठोकलेल्या स्वरूपानंद देशमुखांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Parth Pawar on Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Nanded Crime News: मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Embed widget