एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कोण पेरतंय हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखा माणूस कसं पेरणार? माझ्या जातीला कोण विचारतंय? असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात गेल्या 5 वर्षात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर बोलता येत नाही. मात्र  वेळ पडल्यास नक्की बोलेन असेही मुख्यमंत्री म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. VIDEO | राष्ट्रवादीकडून जातीयवादाचं विष, शरद पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर | एबीपी माझा सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कोण पेरतंय  हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखा माणूस कसं पेरणार? माझ्या जातीला कोण विचारतंय? असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पण मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा-ओबीसी संघर्ष पेटविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाला सांभाळलं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, हे वारंवार जनतेच्या मनावर ठसवलं, तर द्वेष निर्माण होईल असं शरद पवारांना वाटतं, असा घणाघातही फडणवीसांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही शरद पवार चालवत आहेत, असं दिसतंय, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादीने कशी वागणूक दिली हे धनगर समाजाने पाहिलं, त्यांचा आमच्यावर विश्वास असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, या विधानावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील जोरदार टीका केली आहे. शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यावर लोकांना माहिती असतं त्यामागे ते काय म्हणतात. शिरुरचा उमेदवार देतांना मातीचा की जातीचा विचार केला होता? असा सवाल करत जातीच्या आधारावर आता मतं मिळणार नाहीत, हे शरद पवारांना कळायला लागलंय, असा टोला तावडे यांनी लगावला आहे. सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते बाहेर राहिले नसते : मुख्यमंत्री जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षर्थ नेते बाहेर राहिले नसते, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये उत्तर देताना केला. मनसे आता उनसे म्हणजे 'उमेदवार नसलेली सेना' झाली आहे, असा घणाघातही फडणवीसांनी केला. तर शरद पवार हे राज्यात जातीभेदाचं विष पसरवत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते राहिले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असं म्हणत फडणवीसांनी दबावतंत्राचा आरोप फेटाळून लावला. जीएसटीमुळे भ्रष्टाचार बंद झाला आणि सरकारी तिजोरीत पैसा आला. त्यामुळे तो सर्वसामान्य, शेतकरी यांच्यापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या घोषणा भाजपने कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कुठून येणार? हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. मात्र भाजप जबाबदार पक्ष आहे. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे शब्द देताना तरतूद करावीच लागेल. संवेदनशील पंतप्रधानाने समाजाची गरज ओळखून केलेलं संवेदनशील घोषणापत्र, अशा शब्दात फडणवीसांनी भाजपच्या संकल्पपत्राचं वर्णन केलं. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोललेच नव्हते, असा दावा फडणवीसांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा भाजपचं संकल्पपत्र काढून बघा, असं खुलं आव्हानही फडणवीसांनी दिलं. भाजपने दिलेल्या 540 आश्वासनांपैकी 520 पूर्ण झाली आहेत, तर 20 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असंही ते म्हणाले. राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. बालाकोटचा पुरावा मागणाऱ्यांना देशद्रोही म्हटलंच नाही. मात्र सैन्याने दिलेल्या माहितीवर आतापर्यंत कोणी अविश्वास दाखवला नव्हता, असं फडणवीस म्हणाले. राज ठाकरे पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड आहेत. मनसे आता उनसे झाली आहे. उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना, अशी टीकाही फडणवीसांनी केली. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वर्णन केलं. शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या, कलगीतुरे रंगले, मात्र विकासाच्या मुद्द्यावर कायमच एकमत झालं. शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होते, मात्र कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही, असा दावाही फडणवीसांनी केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Yavatmal News: यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Yavatmal News: यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
Bhaskar Jadhav: नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, VIDEO व्हायरल, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण
नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, VIDEO व्हायरल, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण
Embed widget