एक्स्प्लोर

BJP Manifesto | फुले दाम्पत्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' मिळावा यासाठी पाठपुरावा करणार, भाजपचं आश्वासन

विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटलं आहे.

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा ही मागणी सातत्याने केली जात आहे. हीच मागणी लक्षात घेत सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. भाजपच्या संकल्पपत्रात दुष्काळमुक्तीचा संकल्प करण्यात आला आहे. भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थित संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली असून त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. याशिवाय ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्यांचा गौरव झाला पाहिजे याचाही आम्ही पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा ही मागणी शिवसेनेकडूनही सातत्याने होत आहे.

भाजपने संकल्पपत्रात दुष्काळमुक्त महाराष्ट्रचा संकल्प केला असून दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन गोष्टीवर जास्त भर दिला आहे. रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा, ग्राम विकास, रेल्वे विकास अशा विविध विषयांवर जाहिरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे. तर शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून, आयटी पार्कची स्थापना, 1 कोटी रोजगाराची निर्मिती, इंटरनेटच्या मदतीनं प्रत्येक घर जोडण्याची योजना अशा वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

भाजपच्या संकल्पपत्रातील 16 ठळक मुद्दे 
  • दुष्काळमुक्ती (पश्चिम घाटातील पाणी मराठवाड्यात वळवणार)
  • मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 11 धरणांना जोडून मराठवाड्याचे दुष्काळनिर्मूलन
  • 1 करोड नोकऱ्या निर्माण करणार
  • 1 करोड लोकांना बचत गटाशी जोडणार
  • 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार
  • राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र तंत्र अवगत करणार
  • प्रत्येक घरात वीज आणि शुद्ध पाणी
  • भारत नेटच्या माध्यमातून सर्व घरांना इंटरनेटशी जोडणार
  • शिक्षण मूल्यांवर आधारित करणार
  • सोशल सिक्युरिटीत कामगारांना आणणार
  • शहिदांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन धोरण
  • विस्थापितांचे योग्य पुनर्वसन धोरण
  • शेतीसाठी दिवसा 12 तास अविरत वीजपुरवठा देण्याचा संकल्प
  • सौर ऊर्जेचा वापर करून प्रदूषणमुक्ती
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Nashik Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही; नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत होणार
शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही; नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत होणार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget