एक्स्प्लोर

अमित शाहांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरेंची हजेरी

गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे.

गांधीनगर : जोरदार शक्तीप्रर्शन करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित शाहांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. अमित शाह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी शुभ मुहूर्ताची निवड केली होती. गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शाहांनी कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर नारणपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तिथे त्यांच्यासह इतर नेत्याची उपस्थितांना संबोधलं. मग अमित शाहांनी एनडीएमधील घटकपक्षांच्या नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चार किमीचा भव्य रोड शो केला. रोड शो आधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, "1982 मी इथे बूथ कार्यकर्ता म्हणून नारणपुरा परिसरात पोस्‍टर आणि पत्रकं चिटकवत होतो आणि आज पक्षाचा अध्यक्ष आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, ते  भाजपने दिलं आहे. आज निवडणूक केवळ याच गोष्टीवर लढवली जात आहे की, देशाचं नेतृत्त्व कोण करेल? देशाच्या कानाकोपऱ्यातून मोदी-मोदी आवाज येत आहे. मोदी निश्चितच देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की, गुजरातच्या सर्व 26 जागा मोदींना द्या आणि त्यांना पंतप्रधान बनवा." भाजपचा बालेकिल्ला गांधीनगर गांधीनगर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे इथले विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेलं गांधीनगर मतदारसंघ हा भाजपसाठी कायमच विजयाची हमखास गॅरंटी असा आहे. भाजपने 1989 पासून या जागेवर विजय मिळवला आहे. गांधीनगरच्या जागेसाठी पहिल्यांदा 1967 मध्ये निवडणूक झाली होती आणि तिथे काँग्रेसचा विजय झाला होता. यानंतर 1971 च्या निवडणुकीत काँग्रेस, 1977 मध्ये जनता दल आणि 1980 मध्ये काँग्रेसला विजय मिळाला. 1989 च्या निवडणुकीत शंकर सिंह वाघेला यांनी गांधीनगर मतदारसंघावर ताबा मिळवला. तेव्हापासून आतापर्यंत या जागेवर भगवा फडकत आहे. 1991 मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि 1996 मध्ये माजी मुख्यमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी या जागेवर विजय मिळवला होता. यानंतर 1998 पासून लालकृष्ण अडवाणी यांनी गांधीनगरचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागेवर अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वयोमानामुळे लालकृष्ण अडवाणी अमित शाहांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार नाही, असं भाजपच्या एका मंत्र्याने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget