Bihar Election Result 2025 Live Updates: एनडीएच्या विजयानं महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनवला : नरेंद्र मोदी
Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणूक निकाल 2025 चे पहिले कल हाती आले आहेत. पहिल्या कलामध्ये पहिल्या तासात भाजपप्रणित NDA ने 100 जागांवर आघाडी घेतली.
LIVE

Background
Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता अंतिम निकाल जाहीर होत आहेत. भाजप एकूण 91 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी 8 जागांवर विजय घोषित झालेत. तर 83 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. जदयू 83 जागांवर आघाडीवर असून त्यापैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत.तर,77 जागांवर जनता दल संयुक्त आघाडीवर आहे. राजद 27 जागांवर आघाडीवर असून एका ठिकाणी विजय घोषित झाला आहे. तर, 26 जागांवर राजदचे उमेदवार आघाडीवर आहेत. लोजपा रामविलासचे 19 उमेदवार आघाडीवर असून 1 उमेदवार विजयी झाला आहे. तर, 18 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस 5, एमआयएम 5, हम पार्टी 5 जागांवर आघाडीवर आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या होत्या. भाजप (BJP) आणि नितीशकुमारांचा (Nitish Kumar) जदयू (JDU)यांच्या एनडीएनं (NDA) सत्ता कायम राखली आहे. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्त्वातील राजद (RJD), काँग्रेस (Congress) यांची महागठबंधनचा (Mahagathbandhan) मोठा पराभव झाला आहे. नितीशकुमार एनडीएकडून पुन्हा मुख्यमंत्री होतात का ते पाहावं लागेल.
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे.
Bihar Election Result 2020 : एनडीएला 2020 मध्ये 132 जागा मिळाल्या होत्या. तर, महागठबंधन बहुमतापासून दूर राहिलं होतं. राजदला 75 जागा, काँग्रेसला 19 आणि सीपीआये माले पक्षाला 12 जागांवर विजय मिळालेला.
बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है, महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज, भाजपचा ठाकरेसेनेला इशारा
विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कानठळ्या मात्र मुंबईत बसल्या!
२०१० ला कांग्रेसच्या राजवटीतल्या बिहार निकालात गप्प बसलेले आज ‘आयोगद्रोही’ कसे झाले?
बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है, महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज!
सामना अग्रलेखाला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं ट्विटवरून प्रत्युत्तर
बिहारमध्ये विधानसभा विजयाचे ढोल - नगारे वाजल्यामुळे इथे मुंबईत काही जणांच्या कानठळ्या बसल्या आहेत.
सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर खापर फोडणार्यांनो,
थोडा इतिहास वाचा आणि थोडा बुध्दीला ताण द्या. निकालाच्या धक्क्यानं तुम्ही विस्मरणात गेला असाल तर आठवण करून देतो.
२०१० ची बिहार निवडणूक आठवते का?
केंद्रात कांग्रेस सरकार होतं आणि बिहारमध्ये निकाल आला होता.
एनडीए : 206, महागठबंधन : 25, अन्य : 8.
तेव्हा कुठे गेला होता तुमचा आजचा ‘आयोगद्रोह’? तेव्हा तर मतदारांनी तुम्हाला ३३ च्या आत विरोधकांना गुंडाळलं होतं. त्यामुळे पराभवाची कारणं तरी जनतेला पटतील अशी सांगा. आजचा अग्रलेख वाचल्यानंतर लक्षात येतं की तुम्हाला खरंच आरामाची सक्त गरज आहे… आणि त्याहून जास्त आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे.
बिहारच्या जनतेने जातीवाद, जंगलराज नाकारलं आणि मंगलराजला मतं दिली
आता मुंबईसह महाराष्ट्रातील निवडणुकीत जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
बिहार तो झांकी है मुंबई अभी बाकी है!
बिहारमध्ये विधानसभा विजयाचे ढोल - नगारे वाजल्यामुळे इथे मुंबईत काही जणांच्या कानठळ्या बसल्या आहेत.
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) November 15, 2025
सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर खापर फोडणार्यांनो,
थोडा इतिहास वाचा आणि थोडा बुध्दीला ताण द्या. निकालाच्या धक्क्यानं तुम्ही विस्मरणात गेला असाल तर आठवण करून देतो.
२०१० ची… https://t.co/DRiQLEJNvY
बिहारच्या विजयानंतर अजित पवार दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमधे 25 मिनटं चर्चा; भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण!
बिहारच्या विजयानंतर अजित पवार दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमधे 25 मिनटं चर्चा; भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण!
बिहारच्या विजयानंतर अजित पवार दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमधे 25 मिनटं चर्चा; भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण!#AjitPawar #AmitShah #delhi #ncp #BJP #MaharashtraPolitics #BiharElectionResults2025 #ParthPawar #parthpawarlandcasehttps://t.co/CdzKhV5h8g
— ABP माझा (@abpmajhatv) November 15, 2025




















