एक्स्प्लोर

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ : भाजपसमोर जागा टिकवण्याचं आव्हान

2009 च्या मतदारसंघ फेररचनेनंतर आस्तित्वात आलेला भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा तसा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा गड असल्यासारखाच. बहुभाषिक आणि मुस्लीम मतदार सर्वाधिक असलेला. 2014 च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिमवर भाजपने झंडा रोवला. पण काँग्रेसने हिंदू उमेदवार दिला तर भाजपपुढे आव्हान उभं राहू शकतं.

1990 पासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला भिवंडी विधानसभा मतदारसंघ 2014 साली भाजपच्या ताब्यात गेला. आजवर भिवंडी मतदार संघात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. ज्यावेळी 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी भिवंडीचे विधानसभेचे पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे भाग झाले.
1990 नंतर एकदा शिवसेना सोडल्यास आजवर इथे वरचष्मा राहिला आहे तो समाजवादी पार्टी आणि नंतर काँग्रेसचा. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघ भाजप-शिवसेना युतीच्या पारंपरिक जागा वाटपात शिवसेनेच्या ताब्यात होता. 2014 साली दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि मोदी लाटेत ही जागा भाजपने जिंकली. या ठिकाणाहून भाजपचे महेश चौगुले निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने आपापले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. ज्यात भाजपचे महेश चौगुले 42,483 मते घेऊन विजयी झाले.
या मतदार संघात भिवंडी शहरासह गावाचाही समावेश होतो. ज्यात 40 टक्के मतदार हा मुस्लिम आहे तर उर्वरित मतदार हा हिंदू असून आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत भिवंडीतल्या निवडणुका या थेटपणे हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत.
गेल्यावेळी निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव, काँग्रेसच्या नेतृत्वाप्रती स्थानिकांमध्ये असलेली नाराजी आणि एकूण संघ, भाजप आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लावलेला जोर, परप्रांतीयांची शिवसेनेप्रती असलेली नापसंती यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता.
यावेळी मात्र गणितं जरा बदलेली बघायला मिळू शकतात. कारण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीतही इथे आजी-माजी खासदार एकमेकांच्या समोर भिडले होते. भाजपकडून विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे. कपिल पाटील यांना पाच लाख 23 हजार मते मिळाली तर  म्हणजे जवळपास 52 टक्के कपिल पाटील यांना मिळाली तर सुरेश टावरे यांना तीन लाख 67 हजार म्हणजे 36 टक्के.
स्वाभाविकच भाजपने सलग दुसऱ्यांदा एक लाख 56 हजार मतांसह लोकसभा निवडणूक जरी जिंकली. लोकसभा निवडणुकीत भिवंडी शहरातून भाजपला 55 हजार मते मिळाली तर काँग्रेसला 62 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणुकीत ही कसर भरुन काढावी लागणार आहे.
याशिवाय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी संघाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे इथली निवडणूक गाजली होती. महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. याप्रकरणी भिवंडीचे संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्यामुळे राहुल गांधीचा सतत भिवंडी दौरा करावा लागला होता. त्यामुळे जिल्ह्यातल्या नेत्यांसह स्थानिक नेतृत्वही हायकमांडच्या संपर्कात होतं.
शिवाय मध्यंतरी झालेल्या महापालिका निवडणुकांत पहिल्यांदाच भिवंडीत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. मुस्लिमांची एक गठ्ठा मते काँग्रेसला मिळाली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खास करुन मुस्लिम मतदारांमध्ये एक उत्साह आहे.
असं असलं तरी शिवसेना-भाजप या विधानसभेसाठी एकत्र लढले तर मात्र काँग्रेससाठी ही लढाई मोठी असेल. कारण गेल्यावेळी सेना आणि भाजपच्या मतांची बेरीज ही 62 हजाराच्या घरात होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज ५५ हजाराच्या घरात. त्यामुळे याही वेळी मोठ्या विजयानं उमेदवार जिंकण्याची आशा कमीच आहे.
शिवाय जर काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडी अथवा एमआयएमने जर इथं मुस्लिम उमेदवार दिला तर मात्र या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. पण काँग्रेसनं हिंदू उमेदवार दिला तर भाजपला विजयश्री खेचून आणायला मोठे परिश्रम करावे लागतील.
त्यामुळे हिंदू-मुस्लिम अशी थेट लढत होवू शकते अथवा हिंदू-हिंदू अशी जरी लढत झाली तर भाजपला आपली जागा कायम राखण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे.
भिवंडी उद्योग शहर म्हणून नामांकित आहे. परंतू हीच याची कमजोरी ठरते आहे. कारण असंघटीत उद्योग, त्यासाठी बाजार उपलब्ध नसणं आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची बिझनेस पार्कची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. सोबतच रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी पासून सुटका करण्यात नेतृत्व अपयशी ठरलं असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
इच्छूक उमेदवार
भाजप - महेश चौगुले
काँग्रेस - शोएब गुड्डू, सुरेश टावरे, प्रदीप राका
वंचित - सुहास बोंडे

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Embed widget