एक्स्प्लोर

बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण

बागलाण मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपारिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.

देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला बागलाण म्हणजे आजचा सटाणा मतदारसंघ. या मतदारसंघात आलटून पालटून दोन परिवारातच आजपर्यंत निवडणुका झाल्याच चित्र पहावयास मिळाले. मात्र यंदा उमेदवाराची संधी नवीन मतदाराला मिळणार का याच्याच चर्चा होऊ लागल्या आहेत. बागलाण मतदार संघ हा चाळीस वर्षापूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदार संघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले. 1995 साली माजी आमदार दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. त्यानंतर माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अपक्ष मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली. तर माजी आमदार दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी भाजपाकडून उमेदवारी करत विजय मिळविला. असे एका मागे एक याच दोन परिवारात खऱ्या अर्थाने इथली आमदारकी फिरत राहिली. 2014 सालच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दिपीका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या तर भाजपच्या उमाजी बोरसे यांचा पराभव झाला. मोदी लाटेचा प्रभाव असतांना बागलाणमध्ये दिपीका चव्हाण यांनी आपला गढ राखला. यापूर्वी नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती मध्ये संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र राष्ट्रवादीची सत्ता होती. बागलाण मतदार संघ हा धुळे लोकसभा मतदार संघात मोडत असल्याने मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला भरभरुन मतदान झाले होते. नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबाला सुरु झाला आणि राष्ट्रवादीची काहीशी पिछेहाट झाली. त्यातच खासदार सुभाष भामरे यांनी बागलाण तालुक्यात सुरु केलेली सिंचनाची काम आणि विकासकामांमुळे आमदार दिपीका चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सटाणा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून पुनंद धरणातून थेट पाईपलाईनने पाण्याचा प्रश्न सुटणार असून त्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे. साहजिकच त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत उमटणार आहे. चव्हाण आणि बोरसे या दोन कुटुंबातील सदस्यांमध्येच आज पर्यंत निवडणुका होत असल्या तरी यंदा मात्र अनेक नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले असून त्यापार्श्वभूमीवर त्यांचे मतदार संघात दौरे सुरु झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान दिपीका चव्हाण-राष्ट्रवादी-68,434 दिलीप बोरसे-भाजपा-64,253 साधना गवळी-शिवसेना-9108 जयश्री बर्डे-कॉंग्रेस-6946 बागलाण तालुक्यात सर्वात मोठा प्रश्न अपूरे सिंचन प्रकल्प. विंचूर-प्रकाशा महामार्गाचा शहराबाहेरुन जाणारा बाह्यवळण रस्ता अशा काही महत्वाच्या समस्या आहेत. याच बरोबर महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकरणाचा अभाव हे प्रश्न प्रलंबित आहे. एकूणच बागलाण मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपारिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget