![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Devendra Fadnavis : अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
![Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा! Amit Shah call to Devendra Fadnavis discussion on his request to leave the post of Deputy Chief Minister of maharashtra loksabha election nda update bjp mahayuti Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/eeab8ec7e1b1a2e64943f61ff7cb4d451717653828875736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Loksabha Election) राज्यात सत्ताधारी महायुतीची धुळदाण उडाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसह सरकारमध्येही सुद्धा एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी पदातून मुक्तता करण्याची मागणी करतानाच पक्ष संघटनेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या निर्णयाला राज्यातील नेत्यांनी विरोध करत पराभवाची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
फडणवीस आज दिल्ली मुक्कामी असणार
या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची मागणी केंद्रीय नेत्यांकडून मान्य केली जाते का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे सुद्धा लक्ष असेल.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, काल (5 जून) फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत बाजूला होण्याची विनंती केल्याने प्रदेश भाजपसह राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली. दुसरीकडे, त्यांच्या भूमिकेला भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची असल्याचे म्हटले आहे. निकालानंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आदी नेत्यांची बैठक झाली. यामध्ये मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विनंती त्यांनी केली. तसेच पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा करणार असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईन, असे फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, महायुतीची पिछेहाट कोणत्या मुद्यांवर झाली याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेती प्रश्नांशी निगडीत फटका बसल्याचा सूर होता. त्यामुळे विधानसभेला सामोरे जाण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी असल्याने तयारी करण्यासाठी फडणवीस यांनी पदातून बाजूला होण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेला दमदार यश मिळाल्याने चांगलाच आत्मविश्वास दुणावल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)