एक्स्प्लोर

घोषणाबाजी कराल तर तिकीटच देणार नाही, अजित पवारांचा दम अन् कार्यकर्ते शांत

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर (अनधिकृत बांधकामावर आकारला जाणार दंड) माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवड :  राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार आणि त्यांच्या उतावळ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सज्जड दम भरला. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर मेळाव्यात हा प्रकार घडला. मेळावा सुरु असताना इच्छुक उमेदवारांनी शक्ती-प्रदर्शन केलं. या उमेदवारांच्या उतावळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला तिकीट मिळावं म्हणून पोट तिडकीने घोषणाबाजी सुरू ठेवली. पण यावेळी अजित पवार संतापले, आता जर कोणी घोषणाबाजी केली तर तिकीटच देणारच नाही असं सज्जड दम भरला आणि कार्यकर्ते शांत झाले. या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले आहेत. आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. लवकरच उमेदवारी जाहीर करतो, कोणी नाराज व्हायचं नाही, असेही पवार म्हणाले.   पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर (अनधिकृत बांधकामावर आकारला जाणार दंड) माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले की  समोर बसलेला कार्यकर्ता आमच्यासोबत आहे, त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी मध्यंतरी व्यस्त असल्याने पिंपरी चिंचवड शहरात येऊ शकलो नाही. तर बातम्या आल्या अजित दादा शहरवासियांना विसरले. मी मरेपर्यंत विसरणार नाही. मी कधीही येईन, कधीही जाईन हे आमचं आम्ही ठरवू, कार्यकर्ते आणि आमच्यात कोणी ढवळा-ढवळ करू नये, असेही पवार म्हणाले. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. पण आपले सरकार आल्यावर त्यांना आपल्याकडे घ्या असं तुम्ही म्हणू नका. मी तर कुणाला परत पक्षात घेणार नाही. पण तुम्ही येऊन सांगू नका, दादा घ्या हो पदरात पाडून. अरे आपला पदर फाटला, पदरात पाडून घेता-घेता, असे म्हणत अजित पवारांनी गयारामांवर निशाणा साधला. यावेळी युतीवर बोलताना पवार म्हणाले की, किती ही तानलं तरी युती ही होणार आहे. शिवसेना बॅकफूटवर आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नाही. बाळासाहेब कमळीला वापरायचे, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, असे ते म्हणाले. वंचित आघाडी नसती तर आपले 12-13 खासदार वाढले असते. वंचितमुळे फटका बसल्याची कबुली त्यांनी दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget