एक्स्प्लोर

Maharashtra Board HSC Results 2025 मोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; निकाल कुठे पाहता येणार?, पाहा A टू Z माहिती

Maharashtra Board HSC Results 2025: राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे.

HSC Exam Result Date 2025: राज्यातील बारावीचा निकाल (HSC Result 2025) उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली. 

खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील : (Where can I check HSC 12th result See A to Z information)

mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org/

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती .

दहावीच्या परिक्षेचा निकाल कधी?

दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान,दरम्यान, राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे. या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89, तर बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे.

बारावीचा निकाल 5 मे रोजी, VIDEO:

संबंधित बातमी:

CBSE Pattern : महाराष्ट्राचा CBSE पॅटर्न कसा असणार? अभ्यासक्रम आणि पुस्तके कशी? नव्या शालेय शिक्षणाबद्दल A To Z माहिती

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget