एक्स्प्लोर

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागात बिहारहून मुंबईला बोलावून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हत्या करुन मृतदेह सीएसटीएमच्या एका पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला आणि त्यावर 25 किलो मीठ टाकण्यात आलं. पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून बिहारहून मुंबईत बोलावून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजेश चौपाल असं या मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी सुरेंदर मंडल याने त्याची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह सीएसटीएमच्या एका पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्यावर 25 किलो मीठ टाकण्यात आलं होतं. 

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे पतीने केला तिच्या प्रियकरचा खुन केल्याची घटना घडली आहे. बिहारच्या मधुबनी येथे राहणाऱ्या सुरेंदर मंडल (वय 30) याच्या पत्नीचं गावांमधील राहणाऱ्या राजेश चौपाल या व्यक्ती बरोबर प्रेमसंबंध होते. हे प्रकरण गावकऱ्यांना कळालं आणि याचा माहिती सुरेंदर मंडलला झाली. त्यामुळे आरोपी कासावीस झाला, त्याला त्याच्या नावाची बदनामी झाल्याचा राग मनात वर्षभर होता. त्यानंतर आरोपीने एक प्लान आखला आणि गावामधीलच मित्रांच्या साहाय्याने हत्येचा कट रचला.

आरोपी सुरेंदर मंडलने आधी राजेश चौपालला मुंबईत बोलावले आणि नंतर त्याचे मित्र शंभू सदाय (वय 30) राजकुमार सदाय (य 23) आणि विजयकुमार मिस्त्री (वय 50) यांच्यासोबत मिळून त्याची हत्या केली.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीमध्ये राजेशचा मृतदेह टाकून दिला.

मृतदेहाची विल्हेवाट लागावी म्हणून पाण्याच्या टाकीत आरोपीने मीठ टाकून दिलं. याप्रकरणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली होती  जी नंतर अपहरणामध्ये बदलण्यात आली आणि नंतर हत्येमध्ये.

काय घडलं नेमकं?
14  जून रोजी राजेश बिहारमधून मुंबईला पोहचला. पण गावची ट्रेन कुर्ला स्थानकात आली तरी राजेश काही घरी पोहचला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. ही तक्रार दाखल होताच गुन्हे शाखे 5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना माहिती मिळाली कि राजेशचे अपहरण झाले असून त्याला कुर्ल्याहून सीएसएमटी येथे बोलावण्यात आले होते. 

नायर यांनी हाच धागा पकडून आणि  खबऱ्यांचे जाळे पसरवून तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू केला. आरोपींनी राजेशला भेटायला सीएसएमटीला बोलावले होते. त्यामुळे कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर राजेश टॅक्सीने सीएसएमटीला गेला. तेथे पोहचल्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याला त्याच परिसरात असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर नेले. तेथे नेऊन आरोपींनी राजेशच्या डोक्यात घनाचे घाव घातले. गळा चिरला आणि त्याचा मृतदेह ओढत तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकी पर्यंत घेऊन आले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पाण्याच्या टाकीत फेकला आणि त्यावर 25 किलो मीठ टाकले. 

आरोपीने राजेशला कॉल करून सीएसएमटीला भेटायला बोलावले होते. ही माहिती प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना मिळाली. त्यावरून पथकाने माहिती काढली असता राजेशच्या त्याच्याच गावच्या सुरेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि तो सध्या बेपत्ता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोन पथके तयार करून एक बिहार तर दुसरे पथक कर्नाटकात पाठवले. तेथून सुरेंद्र, शंभू आणि रामकुमार तर कर्नाटकातून त्यांचा मुकादम विजय मिस्त्री याला पकडून आणून गुन्ह्याची उघडकीस आणला.

गुन्हे शाखे पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय संजय जगताप, गणेश जाधव, अमोल माळी, महेंद्र पाटील, जयदीप जाधव, उपनिरीक्षक चिंचोलकर तसेच सोनहिवरे, न्यायनिर्गुणे,राणे आदींच्या पथकाद्वारे हा तपास करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget