एक्स्प्लोर

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागात बिहारहून मुंबईला बोलावून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हत्या करुन मृतदेह सीएसटीएमच्या एका पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला आणि त्यावर 25 किलो मीठ टाकण्यात आलं. पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून बिहारहून मुंबईत बोलावून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजेश चौपाल असं या मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी सुरेंदर मंडल याने त्याची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह सीएसटीएमच्या एका पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्यावर 25 किलो मीठ टाकण्यात आलं होतं. 

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे पतीने केला तिच्या प्रियकरचा खुन केल्याची घटना घडली आहे. बिहारच्या मधुबनी येथे राहणाऱ्या सुरेंदर मंडल (वय 30) याच्या पत्नीचं गावांमधील राहणाऱ्या राजेश चौपाल या व्यक्ती बरोबर प्रेमसंबंध होते. हे प्रकरण गावकऱ्यांना कळालं आणि याचा माहिती सुरेंदर मंडलला झाली. त्यामुळे आरोपी कासावीस झाला, त्याला त्याच्या नावाची बदनामी झाल्याचा राग मनात वर्षभर होता. त्यानंतर आरोपीने एक प्लान आखला आणि गावामधीलच मित्रांच्या साहाय्याने हत्येचा कट रचला.

आरोपी सुरेंदर मंडलने आधी राजेश चौपालला मुंबईत बोलावले आणि नंतर त्याचे मित्र शंभू सदाय (वय 30) राजकुमार सदाय (य 23) आणि विजयकुमार मिस्त्री (वय 50) यांच्यासोबत मिळून त्याची हत्या केली.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीमध्ये राजेशचा मृतदेह टाकून दिला.

मृतदेहाची विल्हेवाट लागावी म्हणून पाण्याच्या टाकीत आरोपीने मीठ टाकून दिलं. याप्रकरणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली होती  जी नंतर अपहरणामध्ये बदलण्यात आली आणि नंतर हत्येमध्ये.

काय घडलं नेमकं?
14  जून रोजी राजेश बिहारमधून मुंबईला पोहचला. पण गावची ट्रेन कुर्ला स्थानकात आली तरी राजेश काही घरी पोहचला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. ही तक्रार दाखल होताच गुन्हे शाखे 5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना माहिती मिळाली कि राजेशचे अपहरण झाले असून त्याला कुर्ल्याहून सीएसएमटी येथे बोलावण्यात आले होते. 

नायर यांनी हाच धागा पकडून आणि  खबऱ्यांचे जाळे पसरवून तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू केला. आरोपींनी राजेशला भेटायला सीएसएमटीला बोलावले होते. त्यामुळे कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर राजेश टॅक्सीने सीएसएमटीला गेला. तेथे पोहचल्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याला त्याच परिसरात असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर नेले. तेथे नेऊन आरोपींनी राजेशच्या डोक्यात घनाचे घाव घातले. गळा चिरला आणि त्याचा मृतदेह ओढत तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकी पर्यंत घेऊन आले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पाण्याच्या टाकीत फेकला आणि त्यावर 25 किलो मीठ टाकले. 

आरोपीने राजेशला कॉल करून सीएसएमटीला भेटायला बोलावले होते. ही माहिती प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना मिळाली. त्यावरून पथकाने माहिती काढली असता राजेशच्या त्याच्याच गावच्या सुरेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि तो सध्या बेपत्ता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोन पथके तयार करून एक बिहार तर दुसरे पथक कर्नाटकात पाठवले. तेथून सुरेंद्र, शंभू आणि रामकुमार तर कर्नाटकातून त्यांचा मुकादम विजय मिस्त्री याला पकडून आणून गुन्ह्याची उघडकीस आणला.

गुन्हे शाखे पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय संजय जगताप, गणेश जाधव, अमोल माळी, महेंद्र पाटील, जयदीप जाधव, उपनिरीक्षक चिंचोलकर तसेच सोनहिवरे, न्यायनिर्गुणे,राणे आदींच्या पथकाद्वारे हा तपास करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget