Chhatrapati Sambhajinagar: आधी अपहरण, दौलताबाद घाटात रुमालाने गळा आवळून वर्धनला संपवलं, 8 वर्षांनंतर आरोपींना जन्मठेप कायम
वर्धन घोडे अपहरण आणि हत्या प्रकरणी दोषींना आजन्म कारावास दोषी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे पोलिसांना आरोपी अभिलाषच्या घराजवळ पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चिठ्ठी सापडली होती.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर पाच कोटींच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करुन हत्या करणाऱ्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. (Crime News) छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघा दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. ती शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे.. दोषींना कलम 302 म्हणजे हत्या आणि कलम 364 म्हणजे पैशासाठी अपहरण या कलमांअंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. विशेष म्हणजे मुंबईत त्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
27 फेब्रुवारी 2017 रोजी आरोपींनी आधी वर्धनचे अपहरण केलं, त्यानंतर दौलताबाद घाटात त्याची रुमालाने गळा आवळून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट न लावता तो कारच्या डिकीत ठेवून ते कॉलनीत परतले. दहा वर्षांच्या वर्धनच्या शरीरावर तब्बल 31 घाव होते. आरोपींनी टिळकनगर परिसरातील नाल्यात वर्धनचा मृतदेह फेकला. त्यानंतर वर्धनच्या घरी जाऊन काही घडलंच नाही, अशा आविर्भावात आरोपी फिरत होते. वर्धन घोडे अपहरण आणि हत्या प्रकरणी दोषींना आजन्म कारावास दोषी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे पोलिसांना आरोपी अभिलाषच्या घराजवळ पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चिठ्ठी सापडली होती. तपासात आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि आरोपी श्याम मगरे यांच्याविरोधात अनेक पुरावे सापडले.
या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया विशेष गाजली
दहा वर्षांच्या वर्धनचे अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे यांना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांना अभिलाषच्या घराजवळ पाच कोटी रुपयांची खंडणी मागणारी चिठ्ठी सापडली होती. याच आधारे या दोघांविरोधात अनेक ठोस पुरावे उघडकीस आले. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया विशेष गाजली. खटल्यावेळी अवघ्या सात महिन्यांत तब्बल 30 वेळा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. विशेष म्हणजे हा खटला जलदगती कोर्टात नव्हता, तरीदेखील केवळ दीड वर्षात सुनावणी पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यानिमित्त "रुमाल" हेदेखील घातक शस्त्र ठरू शकते, हे सिद्ध झाले.

























