एक्स्प्लोर

निवडणूक संपताच महागाई वाढणार? 'या' एका कारणामुळे खिशाला बसणार मोठी झळ!

लोकसभेच्या निवडणुकीचा येत्या 4 जून रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीतनंतर बऱ्याच धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ते बदल काय असतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

मुंबई : सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. सगळे राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. आम्ही सत्तेत आल्यास महागाई कमी (Inflation) करू. कमी पैशांत सोई-सुविधा देऊ, अशी आश्वासनं या पक्षांकडून दिली जात आहेत. मात्र हीच निवडणूक संपल्यावर देशातल्या सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणूक संपल्यानंतर आपल्या जीवनात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत देशातील दूरसंचार कंपन्या (Telecom Company) लवकरच आपल्या मोबाईल टॅरिफ प्लॅन्समध्ये (Mobile Tariff Plans) वाढ करणार आहेत, असे सांगितले जात आहे. तसे झाल्यास निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते.

 अॅनालिस्ट अँटिक स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा मोठा दावा 

आज मोबाईल हा जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईल नसेल तर दिवसभरातील अनेक कामे खोळंबून जातात. 5 जी इंटरनेट आल्यापासून तर मोबाईलवरील अवलंबित्व जास्तच वाढलं आहे. मात्र याच इंटरनेट पुरवणाऱ्या दूरसंचार कंपन्या लवकरच आपले मोबाईल टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आता मोबाईल वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे. पीटीआयने अॅनालिस्ट अँटिक स्टॉक ब्रोकिंग या संस्थेच्या हवाल्याने तसे वृत्त दिले आहे.  अँटिक स्टॉक ब्रोकिंग या संस्थेच्या म्हणण्यानुसार जिओ आणि एअरटेल यासारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्या 2024 सालची लोकसभा निवडणूक संपताच आपले मोबाईल रिचार्च प्लॅन्स आणखी महाग करण्याची शक्यता आहे. हे प्लॅन्स सध्याच्या तुलनेत साधारण 15 ते 17 टक्के वाढण्याची शक्यता आहे. 

या संभाव्य वाढीबाबत दूरसंचार कंपन्यांनी सध्याच काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या या आगामी धोरणाची शक्यता वर्तवली जात आहे. पण तसे होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.

4  जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल 

दरम्यान सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 1 जून रोजी होईल. 4 जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्यानंतर सत्तेत कोण येणार हे स्पष्ट होईल. देशात नव्या सरकारची स्थापना झाल्यास अनेक धोरणांवर वेगळे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार, हे स्पष्ट होईल.

हेही वाचा :

रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या 'या' सदस्यांविषयी जाणून घ्या!

आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!

चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परफाड रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीविषयी माहिती आहे का?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget