एक्स्प्लोर

SBI Alert : एसबीआयच्या ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले; काय आहे नवी पद्धत?

SBI Cash Withdrawal New Rule : SBI च्या ग्राहकांना आता SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी आणखी एका प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्याबद्दलची सर्व माहिती येथे जाणून घ्या

SBI Cash Withdrawal New Rule : भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी. बँकेनं ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम पुन्हा बदलले आहेत. SBI ने ATM मधून पैसे काढणे सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक व्यवहार आणखी सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. 

नवा नियम काय? 

SBI ग्राहकांना आता SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. त्यांच्या एसबीआय एटीएममध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, जो एटीएम मशीनमध्ये टाकल्यानंतरच ग्राहक पैसे काढू शकतील.

काय आहे नवी पद्धत? 

जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. एटीएममधून सामान्य पद्धतीनं पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया करावी लागेल आणि त्यात पिन टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारला जाईल, जो तुमच्या मोबाइलवर येईल. तो पिन एटीएम मशीनवर टाका आणि त्यानंतर तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला मिळेल. 

नवा नियम अधिक सुरक्षित 

सध्याच्या सर्वच एटीएममधून, तुम्हाला फक्त एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही कार्डचा पिन टाकून पैसे काढू शकता. परंतु, एसबीआयने यासाठी ओटीपीच्या रूपात सुरक्षेचा आणखी एक स्तर ठेवला आहे. जेणेकरून कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या कार्डमधून पैसे काढू शकणार नाही. कारण ओटीपी तुमच्या मोबाइलवरच येईल.

फक्त SBI च्या ATM वरच काम करणार हे फिचर 

SBI नं ग्राहकांचे आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी सुरु केलेलं हे फिचर फक्त SBI च्या एटीएमवरच काम करणार आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल आणि तुम्ही SBI ATM मधून पैसे काढत असाल तर ही OTP प्रक्रिया आवश्यक असेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला ओटीपीची गरज भासणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
Embed widget