एक्स्प्लोर

गेल्या पाच वर्षांत देशात कडधान्य आणि तेलबियांचे उत्पादन किती? आयातीवर करावा लागतोय मोठा खर्च

भारतात कडधान्ये (Pulses) आणि तेलबियांचे (Oilseeds) उत्पादन खूप कमी होते. भारतात कडधान्ये आणि तेलबिया पिकांकडे फार पूर्वीपासून दुर्लक्ष केलं जात असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलंय.

Pulses and Oilseeds Production: भारत अनेक पिकांमध्ये आघाडीवर असला तरी कडधान्ये (Pulses) आणि तेलबियांचे (Oilseeds) भारतात खूप कमी उत्पादन होते. भारतात कडधान्ये आणि तेलबिया पिकांकडे फार पूर्वीपासून दुर्लक्ष केलं जात असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलंय. धोरणकर्त्यांनी या पिकांचे उत्पादन वाढवण्याऐवजी आयातीचा मार्ग स्वीकारला. याचा परिणाम असा झाला की आज आपण या डाळी आणि खाद्यतेलावर मिळून 1 लाख 58 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहोत. 

आपण तांदूळ आणि गहू निर्यात करुन जेवढे कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च आपण कडधान्ये आणि तेलबियांची आयात करण्यावर करतो. जो पैसा भारतीय शेतकऱ्यांना द्यायला हवा तो इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, युक्रेन, अर्जेंटिना, म्यानमार आणि मोझांबिक या देशांतील शेतकऱ्यांच्या खिशात जात आहे. केवळ धोरण योग्य नसल्यामुळे हा पैसा परदेशात जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पण आता या दोन पिकांचे आयात अवलंबित्व संपवून त्यात स्वावलंबी व्हायचे सरकारने ठरवले आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर काम सुरू असून त्याचा परिणामही उत्पादन वाढीवर दिसून येत आहे.

2022-23 मध्ये तेलबिया पिकांचं उत्पादन 413.55 लाख मेट्रिक टन

केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 मध्ये तेलबिया पिकांचे उत्पादन हे 315.22 लाख मेट्रिक टन होते. जे 2022-23 मध्ये 413.55 लाख मेट्रिक टन इतके वाढले आहे. म्हणजे साधारणपणे, पाच वर्षांत आम्ही उत्पादन 98 लाख मेट्रिक टनांनी वाढवले ​​आहे. त्यात आता आणखी वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांना मोहरी, सोयाबीन या पिकांना चांगला भाव मिळेल तेव्हा हा वेग वाढेल. 

कडधान्य पिकांचे उत्पादन किती?

2018-19 मध्ये भारतानं केवळ 220.75 लाख मेट्रिक टन  कडधान्य पिकांचं उत्पादन केले. जे 2022-23 मध्ये वाढून 260.59 लाख टन झाले. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांत सुमारे 40 लाख टनांची वाढ झाली आहे. भारत हा डाळींचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जगातील सुमारे 25 टक्के डाळींचे उत्पादन येथे होते. पण खप जगाच्या 28 टक्के आहे. त्यामुळं आम्ही अजूनही आयातदार आहोत. डिसेंबर 2027 पर्यंत भारताला डाळींच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचे लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. यासाठी नाफेडला नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे. जी कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करेल आणि 100 टक्के डाळींची खरेदी करेल.

तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न 

तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवून खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार सन 2018-19 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-तेलबिया चालवत आहे. तेलबिया पिकांमध्ये भुईमूग, सोयाबीन, रेपसीड आणि मोहरी, सूर्यफूल, करडई, तीळ, नायगर, जवस आणि एरंडेल यांचा समावेश होतो. ऑइल पाम क्षेत्राचा विस्तार करून खाद्यतेलाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ऑइल पाम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत 2025-26 पर्यंत ईशान्येकडील राज्यांमध्ये 3.28 लाख हेक्टर आणि उर्वरित भारतात 3.22 लाख हेक्टरवर ऑइल पामची लागवड केली जाईल. हे अभियान देशातील 15 राज्यांमध्ये लागू आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget