एक्स्प्लोर

पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरेल, सीतारामन यांचा हल्लाबोल, ADB च्या अध्यक्षांकडे केली 'ही' मागणी

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणारा निधी कमी करण्याची मागणी केली.

FM Nirmala Sitharaman : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणारा निधी कमी करण्याची मागणी केली. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एडीबी अध्यक्षांकडे ही मागणी केली आहे.

इटलीत आशियाई विकास बँकेची वार्षिक बैठक

इटलीतील मिलान येथे झालेल्या 58 व्या आशियाई विकास बँकेच्या (ADB) वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (५ मे) एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जॉर्जेट्टी यांच्याकडेही ही मागणी मांडली आहे. दरम्यान, एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा यांच्याशी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "भारत खासगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि देशात एक धोरणात्मक आणि नियामक परिसंस्था तयार करत आहे.

भारतासोबत वाढत्या तणावामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का 

जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने सोमवारी (५ मे) एका अहवालात म्हटले आहे की, भारतासोबत वाढत्या तणावामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो आणि त्यांच्या चालू आर्थिक सुधारणा प्रयत्नांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय, या तणावांचा पाकिस्तानच्या बाह्य वित्तपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो आणि पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावरही दबाव येऊ शकतो, जो पुढील अनेक वर्षांसाठी कर्ज फेडण्यासाठी देखील खूपच कमी आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला

22  एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील हा तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय देखील घेतला. पाकिस्तानातून होणारी संपूर्ण आयात बंद करण्यात आली आहे. वाघा अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

China : जग भारतासोबत, मात्र चीनची उलटी चाल... दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा जाहीर, चीनी राजदूतांच्या भेटीनंतर पाकच्या माध्यमांचा दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget