एक्स्प्लोर

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला

Mukesh Ambani : रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी एआयच्या वापराऐवजी बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा सल्ला दिला.

Mukesh Ambani नवी दिल्ली : एआय तंत्रज्ञान क्षेत्रात चीनच्या डीपसीकच्या एंट्रीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे चॅट जीपीटी आणि डीपसीक याबाबत चर्चा सुरु असताना भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एआयचे चॅटजीपीटी सारखे प्लॅटफॉर्म मानवी चिकित्सात्मक वैचारिक क्षमतेचा पर्याय असू शकत नाही असं म्हटलं. देश लोकांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रयत्न करेल, असंही ते म्हणाले. तुम्हाला चॅटजीपीटीचा वापर नक्की केला पाहिजे मात्र आपण प्रगती बुद्धिमत्तेच्या जोरावर करु शकतो. एआयच्या सहाय्यानं नव्हे, असं अंबानी म्हणाले.  

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभात ते संबोधित करत होते. भारत या शतकाच्या अखेरीस जगातील पहिला सर्वात समृद्ध देश बनेल, असं त्यांनी म्हटलं. मात्र, या विकासात पृथ्वीला धोका निर्माण होऊ नये. खनिज तेलाकडून हरित ऊर्जेकडे जायला हवे, त्या बदलाचा वेग अधिक असावा, असं ते म्हणाले. एआयच्या संदर्भात विद्यार्थ्यांना एक सल्ला द्यायचा आहे. तुमच्या शिक्षणाच्या साठी साधन म्हणून एआयचा वापर करण्याचं कौशल्य असलं पाहिजे. मात्र, तुमची चिकित्सात्मक वैचारिक क्षमता सोडू नका. तुम्हाला चॅटजीपीटीचा वापर नक्की करा मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जाऊ शकतो, असं मुकेश अंबानींनी म्हटलं.  


मुकेश अंबानी पुढं म्हणाले, भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, जगातील कोणतीही ताकद भारताला विकासापासून रोखू शकत नाही. यासह पर्यावरण संरक्षणावर मुकेश अंबानी यांनी भर दिला. ते म्हणाले, या  शतकाच्या अखेरीस भारत एक जगातील सर्वाधिक समृद्ध राष्ट्र बनेल. मात्र, इतर मोठ्या अर्थव्यवस्थांसह भारतावर देखील मोठी जबाबदारी आहे. आपल्याला आर्थिक विकासासाठी पृथ्वीला संकटात टाकणे किंवा वातावरणीय बदलांच्या संकट किंवा वातावरणातील बिघाडाची परवानगी देता येणार नाही, असं ते म्हणाले. खनिज तेलांकडून आपल्याला स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या दिशेनं बदल करत वेगानं जायला हवं, असं देखील अंबानी म्हणाले.  

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी हरित ऊर्जा, हरित सामग्री आणि एआच्या समन्व्यानं मानवाच्या भविष्याला आकार देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पंडीत दीनदयाल ऊर्जा विद्यापीठानं यामध्ये महत्त्वाचं  काम करावं, असं अंबानी म्हणाले. दीक्षांत समारंभाला कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कोटक यांनी विद्यार्थ्यांना पैशांच्या ऐवजी उत्कृष्टता मिळवण्याचा आग्रह केला. ते म्हणाले तुम्ही जीवनात जे कराल त्यात गुणवत्ता आणि उत्कृष्टतेवर धान्य द्या. जर आपण दोन्ही गोष्टी मिळवल्या तर आर्थिक गोष्टींसह प्रत्येक गोष्टींमध्ये चांगला परिणाम दिसेल. पैशांच्या मागं धावू नका, उत्कृष्ट आणि परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करा.

इतर बातम्या :

चीनच्या DeepSeek मुळे शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, एका कंपनीचे 600 अब्ज डॉलर बुडले; भारतातही कोट्यवधी पाण्यात!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget