एक्स्प्लोर

सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, MSP मधील वाढ अत्यंत तुटपुंजी, किसान सभा आक्रमक 

Kisan Sabha On MSP : आधार भावात केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचे मत किसान सभेचे (Kisana Sabha) नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी व्यक्त केले आहे.

Kisan Sabha On MSP : केंद्र सरकरानं (Central Govt) खरीप हंगामासाठी एकूण 14 पिकांच्या हमीभावात ( MSP) वाढ केली आहे. मात्र, ही आधार भावात केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचे मत किसान सभेचे (Kisana Sabha) नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी व्यक्त केले आहे. सरकारनं  शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याची टीका अजित नवलेंनी केली आहे. 

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता तरी आपल्या शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल करेल व खरीप हंगामाचे एम.एस.पी.चे भाव रास्त उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना परवडतील अशा पातळीवर जाहीर करेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेले आधार भाव पाहता ही अपेक्षा फलद्रूप झालेली नाही असे नवले म्हणाले.

सोयाबीनसाठी केवळ 4892 रुपये इतकाच हमीभाव जाहीर 

वाढता उत्पादन खर्च व केंद्र सरकारने शेती सेवा, औजारे, निविष्ठा व  उत्पादनावर लावलेले जी.एस.टी.चे दर पाहता करण्यात आलेली वाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. एक प्रकारे याद्वारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आल्याचे नवले म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोगाच्या झालेल्या बैठकीमध्ये सोयाबीनला किमान 5300 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली होती. किसान सभेने परिषद घेऊन सोयाबीनचा उत्पादन खर्च पाहता किमान 7000 रुपये प्रति क्विंटल आधार भाव जाहीर करण्याची मागणी केलेली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत तुटपुंजी वाढ करुन यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 4892 रुपये इतकाच हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत सुद्धा तो 408 रुपयाने कमी आहे. 

वाढता उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान 10 हजार रुपये देणे अपेक्षीत

वाढता उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळावा असा ठराव किसान सभेने वर्धा येथे घेतलेल्या परिषदेमध्ये केलेला होता. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला हमीभाव हा खूप कमी असून केवळ 7121 रुपये हमीभाव कापसासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकरी व किसान सभेची मागणी आणि जाहीर करण्यात आलेला हमीभाव याच्यामध्ये 2879 रुपयांचा फरक दिसतो आहे.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतकऱ्यांना दर द्यावा

वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल बिया यांचे सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घेतलं जातं. केंद्र सरकार यामध्ये भरीव वाढ केली असल्याचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षामध्ये हे शेतीमाल आधार भावाप्रमाणे खरेदी केले जात नाहीत हे वास्तव आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावामध्ये धरण्यात आलेला उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे C2 + 50% म्हणजेच सर्वंकष उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव दिला तरच शेतकऱ्यांना शेती परवडू शकेल अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने मात्र सर्वंकष उत्पादन खर्च गृहीत न धरता केवळ A2 + FL म्हणजेच निविष्ठा व कुटुंबाची मजुरी एवढाच उत्पादन खर्च विचारात घेतला आहे. तो सुद्धा वास्तव खर्चापेक्षा खूप कमी धरण्यात आलेला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रात सर्वच शेतीमालाच्या उत्पादनाचा खर्च जास्त आहे. हा वाढीव उत्पादन खर्च सुद्धा विचारात देण्यात आलेला नाही. 

केंद्र सरकारने आपल्या शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार करावा

विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. नजीकच्या काळात यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात आणि देशभरातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार करावा. एम.एस.पी.मध्ये भरीव वाढ करुन शेतीमालाला रास्त भाव मिळेल, यासाठी सरकारी खरेदी यंत्रणा सक्षम करावी. तसेच येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात उद्योगपतींची कर्जमाफी नव्हे, तर शेतकरी-शेतमजुरांच्या कर्जमुक्तीची घोषणा करुन ती अमलात आणावी अशी आग्रही मागणी किसान सभा करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 14 पिकांच्या हमीभावात वाढ

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
Iran US War Ceasefire: अमेरिका -इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी
अमेरिका -इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी
Loan :गुड न्यूज, आरबीआयनं पतधोरण जाहीर करण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेकडून MCLR मध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार
गुड न्यूज, आरबीआयनं पतधोरण जाहीर करण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेकडून MCLR मध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
Superstar Who Delivered Four Hits In Year: एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Embed widget