एक्स्प्लोर

'या' राज्य सरकारनं महिलांसाठी घेतला मोठा निर्णय, आता 50 व्या वर्षीच मिळणार पेन्शन?

झारखंडच्या (Jharkhand) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या सरकारनं महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.  

Pension News : झारखंडच्या (Jharkhand) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या सरकारनं महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.  झारखंड सरकारनं (Jharkhand government) महिलांसाठी पेन्शन पात्रता वय 60 वर्षांवरुन 50 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला, बालविकास आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या सचिव कृपा नंद झा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे. प्रस्तावानुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी पेन्शनसाठी पात्रता वय 50 वर्षे असणार आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यापूर्वी 29 डिसेंबर रोजी घोषणा केली होती की, राज्यातील आदिवासी आणि दलितांना आधीच्या 60 वर्षांच्या मर्यादेऐवजी 50 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनचा लाभ मिळेल. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती झा यांनी दिली आहे. 

राज्यात 18 लाख नवीन लाभार्थी सामील 

सरकारच्या या निर्णयानंतर झारखंडमधील अतिरिक्त 18 लाख लाभार्थी पेन्शन योजनेत सामील होतील. राज्यात एकूण 35.68 लाख लाभार्थी पेन्शनचा लाभ घेत आहेत. गेल्या चार वर्षांत पेन्शनधारकांच्या संख्येत 82 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा झा यांनी केला आहे.

अंगणवाडीसाठी ही योजना 

सरकारनं अंगणवाडी केंद्रांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात आता बेंच आणि डेस्क असतील. या केंद्रांना गणवेश, वाचन आणि लेखन साहित्य देखील पुरवले जाईल. जेणेकरुन मुलांना पोषणासोबत पूर्व प्राथमिक शाळेचे फायदे मिळावेत. झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये 38,432 अंगणवाडी केंद्रे आहेत. परंतू, केवळ 25,000 अंगणवाडीला स्वतःच्या इमारती असल्याचे झा म्हणाले. आम्ही तीन वर्षांत उर्वरित केंद्रांसाठी इमारती उभारण्याची योजना आखली आहे. याशिवाय ट्रान्सजेंडर समुदायासाठीही योजना सुरू आहेत.

राज्यात विधवा पुनर्विवाहालाही प्रोत्साहन 

शैक्षणिक संस्थांमध्ये ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवली जातील. ट्रान्सजेंडर बोर्ड स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यांच्यासाठी वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णयही घेतला आहे. तसेच झारखंड सरकार राज्यात विधवा पुनर्विवाहालाही प्रोत्साहन देत आहे. चालू आर्थिक वर्षापासून एक योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत 2 लाख रुपये एकरकमी मानधन वाढवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

नेमकी काय आहे 'अटल पेन्शन योजना'? कसा घ्याल 'या' योजनेचा लाभ?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Share Market : अमेरिका-इराण युद्ध सुरुच, इकडे विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा ट्रेंड थांबेना, मार्चमध्ये भारतीय शेअर बाजारातून 88 हजार कोटी काढून घेतले
अमेरिका- इराण युद्धाची भारताला झळ, विदेशी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये शेअर बाजारातून 88 हजार कोटी काढून घेतले

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Shambhuraj Desai Satara ZP Election: साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Embed widget