![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
देशाची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान; रघुराम राजन यांचा सावधगिरीचा इशारा
Former RBI Governor Raghuram Rajan: देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
![देशाची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान; रघुराम राजन यांचा सावधगिरीचा इशारा Indian companies may suffer if country's 'anti-minority' image is created, warns former RBI governor Raghuram देशाची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान; रघुराम राजन यांचा सावधगिरीचा इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/11/10195534/raghuram-rajan_625x300_1526533304473.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Former RBI Governor Raghuram Rajan: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन वेळोवेळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भाष्य करत असतात तसंच चिंता व्यक्त करत असतात. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, जगात भारताची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे.
रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, भारताची अशी प्रतिमा झाल्यानंतर विदेशी सरकारं आपल्या राष्ट्रावर विश्वास ठेवायला सहज तयार होणार नाहीत. अशामुळं गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहणं बंद करु शकतात.
लोकशाहीमध्ये गोष्टी सोप्या नसतात...
टाइम्स नेटवर्कशी बोलताना माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, लोकशाहीमध्ये गोष्टी नेहमी सोप्या नसतात. यात नेव्हिगेशनची गरज असते. त्यांनी म्हटलं की, लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते. गरज पडल्यास काही बदल देखील करावे लागतात. त्यांनी रशिया आणि चीनचं उदाहरण देत म्हटलं की, या देशांमध्ये चेक आणि बँलंस नसल्यानं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.
अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर बोलताना रघुराम राजन म्हणाले की, अल्पसंख्यांकांसोबत दुर्व्यवहार जगभरात चांगली प्रतिमा तयार करत नाही. अशामुळं चांगले गुंतवणूकदार दूर जाऊ शकतात, त्यांच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोणामध्ये विश्वासार्हता नसेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.
कोरोना महामारीचा तंत्रज्ञान आणि मोठ्या भांडवली कंपन्या लहान व्यवसाय आणि उद्योगांपेक्षा खूप जलद गतीने परिणाम झाला आहे. त्यांना कोरोनानं अधिक प्रभावित केलं आहे. मध्यमवर्गीय, लहान आणि मध्यम क्षेत्र आणि सर्वसामान्यांवर पडणारा परिणाम यावर सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यामुळे सरकारने काळजीपूर्वक विचार करून खर्च करायला हवा, असे रघुराम राजन म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)