एक्स्प्लोर

डिजिटल व्यवहारात भारताचा पहिला नंबर, पण दिल्ली आणि मुंबईच्या अॅपल स्टोरमध्ये काय स्थिती?

सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार (Digital Payments) केले जातायोत. डिजिटल पेमेंटमध्ये भारत (India) पहिल्या क्रमांकावर आहे.

Digital Payments News : सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार (Digital Payments) केले जातायोत. डिजिटल पेमेंटमध्ये भारत (India) पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, ॲपल कंपनीला (Apple Comapny) भारतात वेगळ्याच एका समस्येला सामारं जावं लागत आहे. अॅपल ( Apple) कंपनीनं दिल्ली आणि मुंबईत दोन स्टोर ओपन केली आहेत. मात्र, या ठिकाणी जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार होत नसून, रोख व्यवहार होत आहेत. त्या ठिकाणी नोटा मोजण्याचं यंत्र बसवण्याची वेळ आलीय. 

भारतातील अॅपल स्टोअरमध्ये रोख पेमेंटचा वाटा जास्त

आयफोन बनवणारी अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी Apple ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारतात दोन स्टोअर उघडली आहेत. दिल्ली आणि मुंबईत ही दुकाने उघडण्यात आली आहेत. पण या कंपनीला एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी ग्राहक मोठ्या संख्येनं ऑनलाइन पेमेंटऐवजी रोख पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळं कंपनीला दोन्ही ठिकाणी नोटा मोजण्याचं यंत्र बसवावे लागले आहे. भारतातील अमेरिकन कंपनीच्या दोन स्टोअरमधील एकूण विक्रीत रोख पेमेंटचा वाटा 7 ते 9 टक्के आहे. अमेरिका किंवा युरोपियन देशांमध्ये, कंपनीच्या स्टोअरमध्ये रोख पेमेंटचा वाटा एका टक्क्यांपेक्षा कमी आहे. अनेक स्टोअरमध्ये रोख पेमेंट शून्य आहे. परंतू, भारतातील ग्राहक अजूनही मोबाईल फोन किंवा संगणक खरेदी करण्यासाठी रोख रक्कम घेऊन दुकानात येत आहेत. 

भारतात रोख पेमेंटच्या समस्येचा सामना करणारी ॲपल ही एकमेव कंपनी 

ॲपलच्या दिल्लीतील स्टोअरमध्ये रोख रक्कम भरणाऱ्या ग्राहकांची संख्या मुंबईपेक्षा जास्त आहे. भारतातील दोन्ही स्टोअर्सची अमेरिकेतील Apple रिटेल टीमला थेट रिपोर्टिंग लाइन आहे. भारतात रोख पेमेंटच्या समस्येचा सामना करणारी ॲपल ही एकमेव कंपनी नाही. सरकारने 2017 पासून प्रति व्यक्ती 2 लाख रुपये दैनंदिन रोख व्यवहार मर्यादा लागू केली आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशाला आळा घालणे हा त्याचा उद्देश आहे.

वाहने खरेदी करण्यासाठीही रोख रकमेचा वापर

भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली असली तरी रोख चलनातही मोठी वाढ झालीय. मार्च 2017 मध्ये ते 13.35 लाख कोटी रुपयांवरून मार्च 2023 मध्ये 35.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. देशात UPI द्वारे डिजिटल पेमेंटमध्ये भरीव वाढ होऊनही ही परिस्थिती आहे. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिेलेल्या माहितीनुसार, मार्च 2017 मध्ये 2,425 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. तर एप्रिल 2023  मध्ये हे व्यवहार 19.64 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) चा अंदाज आहे की भारतात 15 टक्के ते 20 टक्के कार खरेदी लोक स्वतःच्या पैशाने करतात. लक्झरी वाहने खरेदी करण्यासाठीही लोक 2 लाख रुपयांपर्यंत रोख देतात. 

महत्वाच्या बातम्या:

डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी एकच नंबर, आरबीआयची घोषणा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget