एक्स्प्लोर

Union Budget 2021: संरक्षणासाठी 4.78 लाख कोटीची तरतूद

यंदा संरक्षण दलातील पेन्शनचे बजेट कमी करण्यात आले असून 1.15 लाख कोटी आहे. गेल्या वर्षी पेन्शनसाठी 1.33 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4. 78 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 19 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी संरक्षणासाछी 4.71  लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या अभिभाषणात संरक्षण क्षेत्राच्या बजेटच्या उल्लेख केला नाही. परंतु बजेटचे दस्ताऐवज समोर आले आहेत. त्यानुसार या वर्षी संरक्षणासाठी 4.78 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये 4.71 लाख कोटीची तरतूद करण्यात आली होती. 4,71 लाख कोटीपैकी 1.35 लाख कोटी कॅपीटल बजेट म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठीच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी देण्यात आले आहे. गेल्या वर्षी शस्त्रास्त्र खरेदीसाठी 1.13  लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. कॅपीटल बजेटमध्ये यंदा एअरफोर्सला सर्वात जास्त 53 हजार कोटी, आर्मीला 36 हजार कोटी आणि नेव्हीला 37 हजार कोटी देण्यात आले आहे.

संरक्षण बजेटमध्ये रेवेन्यू-एक्सपेंडिचर म्हणजे जवान आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिवील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर खर्चासाठी 2.27 लाख कोटी रूपये देण्यात आले आहे. यावर्षी तिन्ही दलाचे पेंशनचे बजेट कमी करण्यात आले असून 1.15 लाख कोटी आहे. जे गेल्या वर्षी पेन्शनसाठी 1.33 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षानंतर असं पहिल्यांदाच झाले की संरक्षण क्षेत्रातील पेन्शनचे बजेट कमी करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे 
  • आजच्या अर्थसंकल्पानं देशाचा आत्मविश्वास सर्वांपुढं आणला आहे. संपूर्णपणे आत्मनिर्भरतेकडे कल असणाऱ्या या अर्थसंल्पाकडे समाजातील प्रत्येक विभागाला प्राधान्य देण्यात आलं आहे.
  • शेतकऱ्यांची मिळकत वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं असून त्यासाठी पावलंही उचलण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना यापुढं अधिक सोप्या पद्धतीनं कर्ज मिळू शकणार आहे. एपीएमसी मार्केटना आणखी बळकटी देण्यासाठीच्या तरतुदी करणयाक आल्या आहेत.
  • यंदाच्या अर्थसंकल्प हा असाधारण परिस्थितीमध्ये सादर करण्यात आला आहे. कोरोना काळात जगभरात जे परिणाम पाहायला मिळाले त्यामुळं संपूर्ण मानव प्रजातीलाच हादरा बसला. त्यामुळं या काळात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाता आत्मविश्वास वाढवणारा आहे.
  • अनेकांनाच वाटलं होतं की आम्ही मध्यमवर्गीयांवरील काराचा भार वाढवू. पण, आम्ही मात्र या अर्थसंकल्पामध्ये शक्य तितकी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
  • देशातील तरुण पिढीसाठी नव्या संधी, मानव संसाधनांना एक नवा स्तर, विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांची वाढ, नव्या तंत्रज्ञानामुळं प्रगतीच्या नव्या वाटा या गोष्टींना यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.]
  • महिलांच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही महत्त्वाचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. ज्यामुळं रोजगार वाढीसाछीही फायदा होणार आहे.
  •  Individuals, Industry, Investors सह पायाभूत सुविधांमध्येही अर्थसंकल्पीय तरतुदींमुळं सकारात्मक बदल होणार आहेत.
संबंधित बातम्या : Budget 2021 Speech Highlights | 2021-22 आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर; कोणत्या क्षेत्राला किती कोटींचा निधी?

Budget 2021 PM Modi Speech: अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; वाचा त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

Union Budget 2021 | टॅक्स ऑडिटची मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटींवर, NRI नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून मुभा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vitthal Darshan | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पंढरपुरातील VIP दर्शन बंद ABP MajhaMajha Vitthal Majhi Wari | माझा विठ्ठल माझी वारी! माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 07 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Embed widget