एक्स्प्लोर

उन्हाचा चटका वाढला, बाजारात लिंबाला झळाळी; दरात झाली 350 टक्क्यांची वाढ

सध्या बाजारात लिंबाच्या दरात (Lemon Price) तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी लिंब आहेत, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय.

Lemon Price : सध्या देशाचा उन्हाचा (Heat) तडाका चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. देशातील बहुतांश भागात पारा हा 35 अंशाच्या आसपास गेला आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानात (temperature) लोक लिंबू सोडा, विविध प्रकारचे कोल्ड्रिग घेत आहेत. या स्थितीमुळं सध्या बाजारात लिंबाच्या दरात (Lemon Price) तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी लिंब आहेत, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. लिंबाच्या दरात 350 टक्क्यांची वाढ झालीय.

तापमानात वाढ झाल्यास दरात आणखी वाढ होणार

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी लिंबू सोडा 20 रुपये प्रति कप विकला जात होता. आता लिंबू सोडा 25 ते 30 रुपये प्रति कप विकला जातोय. दरम्यान आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं पुढच्या काळात आणखी लिंबाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम आकाराच्या लिंबाला प्रतिकिलो 100 रुपयांचा दर मिळत आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं बाजारात लिंबाची मागणी वाढत आहे, त्यामुळं दरातही वाढ होत आहे.

लिंबाच्या दरात 350 टक्क्यांची वाढ

सध्या कर्नाटक राज्यात किरकोळसह घाऊक बाजारातही लिंबाच्या दरात वाढ झालीय. ही वाढ 350 टक्क्यांची झाली आहे.  दरम्यान, तापमानात जर अशीच वाढ राहीली तर लिंब आणखी महाग होऊ शकते. 

दुष्काळी परिस्थिती आणि बदलतं हवामानाचा पिकाला फटका

दुष्काळी परिस्थिती आणि बदलतं हवामान यांचा काही ठिकाणी लिंबाला फटका बसलाय. अनेक ठिकाणी लिंबाच्या बागांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं बाजारपेठेत सध्या लिंबाचा म्हणावा तेवढा पुरवठा नाही. पुरवठा कमी झाल्याचा परिणाम दरावंर झालाय. लिंबू विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिना भरापूर्वी 1000 लिंबाचा दर हा 2000 रुपये होता. आता याच 1000 लिंबाचा दर हा 7000 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळं याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.

महाराष्ट्रातील विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढला

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. वाढल्या तापमामुळ नागरिकांना त्रास होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशावर गेला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं गेलं आहे. दोनच दिवसात मार्च महिना संपत आहे. मात्र, यापुढेही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळ या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणं गरजेच आहे.  

महत्वाच्या बातम्या:

भरघोस पगाराची नोकरी सोडून केली लिंबाची शेती, आज वर्षाला कमवतोय 'एवढे' उत्पन्न, 'लेमन मॅन'ची यशोगाथा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget