एक्स्प्लोर

“वंदे मातरम्” 150 वर्षांचा श्वास, रक्तात मिसळलेलं राष्ट्रीय गीत

एक शतक अर्धं संपलं... आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे “वंदे मातरम्!” जेव्हा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली हे शब्द कागदावर उतरवले, तेव्हा ती फक्त कविता नव्हती... तर ते होतं एका झोपलेल्या देशाच्या जागरणाचा शंखनाद. त्यात होती एक वेदना, एक ज्वाला आणि एक नतमस्तक प्रणाम भारतमातेपुढे.

“सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्...”

त्या काळात भारत देश पारतंत्र्यात होता. पराधीनतेच्या अंधारात भारतीयांचा आत्मविश्वास हरवला होता. पण “वंदे मातरम्”च्या प्रत्येक ओळीने लोकांच्या मनात पुन्हा रक्त उसळायला लागलं. वंदे मातरम् च्या प्रत्येक शब्दातून जणू आईच्या पदराचा स्पर्श जाणवत होता.

त्या गीताने भारतीयांना आठवण करून, “आपली मातृभूमी जिवंत आहे… आणि तिचं रक्षण करायचं दायित्व आपल्या रक्तात आहे!”

त्या काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसेवकाच्या तोंडात “वंदे मातरम्” हा मंत्र होता. ब्रिटिशांची सत्ता हादरली कारण या दोन शब्दांत संपूर्ण भारत एकवटला होता. ज्यांच्या हातात तलवार नव्हती, त्यांनी “वंदे मातरम्”च्या हाकेने लढा दिला. त्या हाकेत गोळी नव्हती, पण तर हृदयात झिरपणारा बाण होता.

जेव्हा शहीद भगतसिंग, खुदीराम बोस, बाळ गंगाधर टिळक, आणि राणी लक्ष्मीबाई यांसारखे वीर मातृभूमीसाठी लढले, तेव्हा या गीताचा प्रत्येक स्वर त्यांच्यासोबत रणांगणात घुमत होता. “वंदे मातरम्” हे केवळ राष्ट्रीय गीत नव्हे, तर स्वातंत्र्याची एक प्रकारे शपथच होती.

150 वर्षांचा प्रवास, एक जिवंत श्वास

1875 ते 2025 - अशा 150 वर्षांत किती पिढ्या गेल्या, किती झेंडे फडकले, किती नद्या कोरड्या झाल्या...पण या गीताचा एकही स्वर जुना झाला नाही. आजही शाळांमध्ये मुलं हे गीत गातात, सैनिक सीमारेषेवर पुटपुटतात आणि कुणी राष्ट्रीय गीताच्या आवाजात उभं राहतो तेव्हा अंगावर काटा येतो. मातृभूमीच्या रक्तात, तिच्या पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये आणि आपल्या प्रत्येक श्वासात, क्रांतीचा जयघोष बनलेलं असं हे गीत 150 वर्ष पूर्ण करत आहे.

पण या 150 वर्षांच्या टप्प्यावर प्रश्न फक्त एकच आहे, आपण काय करतो त्या मातृभूमीसाठी?
आपण त्या मातेला परत काय दिलं? आपण तिची माती जपली का? तिचं पाणी, तिचं आकाश, तिच्या भाषेची शुद्धता जपली का? की आपण तिच्या कुशीत राहूनही परकीय मोहात हरवलो?

“वंदे मातरम्” म्हणणं सोपं आहे, पण त्याचा अर्थ जगणं म्हणजे प्रामाणिक राहणं, देशासाठी काहीतरी करणं,आणि प्रत्येक क्षणी मातृभूमीचा सन्मान राखणं.

कधी आईचा हात डोक्यावर ठेवतो ना, तेव्हा मिळणारा आशीर्वाद म्हणजे “वंदे मातरम्”.
कधी सैनिकाची रक्ताळलेली माती पाहतो, तेव्हा त्या मातेनं घेतलेला श्वास म्हणजे “वंदे मातरम्”.आणि कधी राष्ट्रध्वज वाऱ्यात फडफडताना दिसतो, तेव्हा त्या तिरंग्याच्या रंगांत मिसळलेले शब्द म्हणजे “वंदे मातरम्!”

150 वर्षांपूर्वी लिहिलेलं गाणं आजही आपला आत्मा हलवून जातं. कारण त्यात भक्ती, वेदना आणि प्रेम आहे आणि म्हणूनच ते केवळ राष्ट्रगीत नाही, तर भारताचं धडधडतं हृदय आहे, वंदे मातरम् !

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
ABP Premium

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget