एक्स्प्लोर

IND vs ENG: इंग्लंड चीत, भारताची जीत!

Team India vs England : डकेट, क्राऊली, पोप, रुट, बेअरस्टो, स्टोक्स अशी फलंदाजांची मजबूत फळी एकीकडे, तर रोहित शर्मा, जैस्वाल, गिल, श्रेयस, पाटिदार, सरफराज अशी फलंदाजीची फळी दुसरीकडे. इंग्लंडची (Team England) फलंदाजी तगडी आणि कसोटी क्रिकेटचा भरपूर अनुभव गाठीशी असलेली. म्हणजे मालिका संपताना रुट, स्टोक्स आणि बेअरस्टो या तिघांच्याही नावावर कसोटी सामन्यांचं शतक लागलंय. तर भारतीय फलंदाजीचा अनुभव आकडेवारीतून पाहा, रोहित – 59 कसोटी, जैस्वाल – 9 कसोटी, गिल – 25 कसोटी, सरफराज – 3 कसोटी, पड्डीकल – पदार्पणाची कसोटी.

आकडेवारीत इंग्लंडचं पारडं जड होतं. पण, भारतीय युवा फलंदाजांनी कमाल केली.  खास करुन जैस्वाल,गिल यांनी.

संघ अडचणीत असताना या दोघांनीही कसोटीचं टेम्परामेंट आणि वनडेची आक्रमकता यांचा संगम साधत नैया पार केली. गेल्या कसोटीत तर, नवख्या ज्युरेलला घेऊन गिलने हेलकावे खाणारं संघाचं जहाज विजयाच्या किनाऱ्याला लावलं.

जैस्वालचा मालिकेतला फॉर्म स्वप्नवत होता. 80, 15, 209, 17, 10, 214 नाबाद, 73, 37 आणि 57 ही धावांची आकडेवारी दृष्ट लागू नये म्हणून तीट लावावी अशीच आहे. या मालिकेतील खेळपट्ट्या किट बॅगमध्ये घेऊन जगभरात फिरावं, असं जैस्वालला नक्की वाटत असेल, इतकी भन्नाट बॅटिंग त्याने पाचही सामन्यांमध्ये केली. धावांचं अफलातून सातत्य राखलं. आक्रमकतेचा मंत्र जपताना संयमाच्या तंत्राचीही कास धरली. तरीही 70, 80 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

तर, गिलची कहाणी काहीशी वेगळी होती. विशाखापट्टणम कसोटीआधी नऊ डावात अर्धशतकही न गाठणाऱ्या गिलची त्या नऊ डावातली सर्वोच्च धावसंख्या होती 36. या मालिकेतील विशाखापट्टणम कसोटीत मात्र त्याच्या बॅटने धावांची कूस बदलली आणि धावा बॅटमधून वाहायला लागल्या. पुढे 34,104,0,91, 38, 52 आणि 110 असा सन्मानजनक स्कोरबोर्ड त्याच्या नावावर लागला. गिलला पूर्ण बहरात असताना फलंदाजी करताना पाहणं हा एक अनुभव असतो. त्याच्याकडे मखमली ड्राईव्ह्ज आहेत. मनगटी नजाकत आहे. चेंडूला स्टँडमध्ये सहल घडवून आणण्याची कलाही अवगत आहे. फिरकीवर हल्ला चढवतानाच वेगवान माराही डोईजड न होऊ देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अनुभवी कॅप्टन रोहित शर्माने राजकोटला 131, रांचीत दुसऱ्या डावात 55 आणि धरमशालामध्ये 103 अशा महत्त्वाच्या इनिंग केल्या. एरवी मेन हीरोच्या भूमिकेत असणाऱ्या रोहितने इथे युवा सहकाऱ्यांना 'भिऊ नका, मी आहे म्हणत त्यांच्या पाठीवर अनुभवाचा हात ठेवला आणि आपण सहनायकाची भूमिका चोख पार पाडली. खरं तर कोहली, राहुलसारखे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणारे शिलेदार संघात नसताना रोहितने युवा बॅट्समना ज्या पद्धतीने गाईड केलं, हाताळलं त्याला तोड नाही. मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीचं क्रेडिट कोच राहुल द्रविडने अजित आगरकरच्या सिलेक्शन कमिटीलाही दिलं. ज्यांनी हे गुणवत्तवान हिरे काढून त्याच्या ओंजळीत टाकले. 

इथे सरफराज, ज्युरेलचाही उल्लेख करावा लागेल. दोघंही कसोटी क्रिकेटचा दबाव झुगारत खेळले. गरजेवेळी मोठे फटके बिनधास्तपणे खेळले. हा फ्रेश अॅप्रोच भारतीय संघाला खूप पुढे घेऊन जाईल. खास करुन ऑसी, दक्षिण आफ्रिकेसारख्या खेळपट्टीवर खेळताना. फलंदाजांनी कमाल फॉर्म दाखवल्यावर भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन, जडेजा, कुलदीप, बुमरा या चौघांना फेस करणं सोपं नव्हतं. किंबहुना भारतीय माऱ्याशी दोन हात करताना इंग्लंडच्या अनुभवी फलंदाजांच्या तोंडाला फेस आला. डकेट-क्राऊली जोडीने बहुतेक वेळा चांगली सलामी देऊनही ते कोसळत राहिले. मधल्या फळीचा फ्लॉप शो त्यांना भोवला. अश्विनचं वैविध्य, कुलदीपचा टर्न, बुमराच्या व्हेरिएशननेही त्यांना सळो की पळो केलं. पोपच्या पहिल्या मॅचमधील यादगार इनिंगचा अपवाद वगळता इंग्लंड टीमच्या बॅटिंगवर भारतानेच वर्चस्व गाजवलं. रुट, बेअरस्टो, स्टोक्स हे कसलेले वीर फिरणाऱ्या खेळपट्ट्यांवर शस्त्रहीन दिसले किंवा बेझबॉल थिअरीने खेळताना अति आक्रमकतेच्या विळख्यात फसले असंही म्हणता येईल. इथे येईपर्यंत एकही कसोटी मालिका या थिअऱीने खेळून त्यांनी गमावली नव्हती. या मालिकेत मात्र 1-0 आघाडीवरुन त्यांना 1-4 अशा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांनी आक्रमक बॅटिंग करुन काही वेळा सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केलादेखील. पण, कसोटी मालिकेत सेशन बाय सेशन खेळाचा आढावा घेऊन खेळ करावा लागतो. इथे त्यांचं गणित फसलं. इंग्लंडला आपण चीत केलं, मायदेशातल्या आणखी एका मालिकेत आपल्या भाळी मालिका विजयाचा टिळा लागला. ज्या विजयात युवा ब्रिगेडने गाळलेल्या घामाचं सोनं झालं होतं. हे सोनंच पुढे भारतीय क्रिकेट खास करुन कसोटी चमकत ठेवेल आणि आणखी उजळून टाकेल, अशी अपेक्षा करुया.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget