एक्स्प्लोर

कार्तिक चुकला की, आपण चुकतोय?

भारताला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूत 14 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकनं लाँग ऑनच्या दिशेनं चेंडू टोलावला. पण या चेंडूवर एकेरी धाव निघत असताना आणि नॉन स्ट्रायकर एंडचा कृणाल पंड्याही फटकेबाजी करत असताना कार्तिकनं स्ट्राईक स्वत:कडेच ठेवला.

गेल्यावर्षी श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेतल्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकनं षटकार ठोकत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. अखेरच्या चेंडूवरच्या त्या विजयी षटकारानं दिनेश कार्तिक भारतीय क्रिकेटरसिकांचा हीरो ठरला होता...

जवळपास वर्षभरानं हाच दिनेश कार्तिक आता व्हिलन ठरलाय... याचं कारण न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत कार्तिकनं नाकारलेली एकेरी धाव...

भारताला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूत 14 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकनं लाँग ऑनच्या दिशेनं चेंडू टोलावला. पण या चेंडूवर एकेरी धाव निघत असताना आणि नॉन स्ट्रायकर एंडचा कृणाल पंड्याही फटकेबाजी करत असताना कार्तिकनं स्ट्राईक स्वत:कडेच ठेवला.

टिम साऊथीच्या पुढच्या चेंडूवर कार्तिकला केवळ एकच धाव घेता आली. आणि इथेच क्रिकेटरसिकांमध्ये कार्तिकच्या नावानं शंख फुंकण्यास सुरुवात झाली. अखेरच्या चेंडूवर कार्तिकनं षटकार ठोकला खरा पण भारतानं हा सामना अवघ्या चार धावांनी गमावला. सामना संपल्यानंतर कार्तिकवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली. ‘कार्तिक तू काही धोनी नाहीस’ इथपासून ‘त्याला संघातून कायमचं वगळा’ अशा कमेंट्स धडकू लागल्या. पण कार्तिकला या पराभवासाठी जबाबदार धरणं खरंच योग्य ठरेल?

कार्तिकनं 2017 पासून ट्वेन्टी ट्वेन्टीत मोलाची कामगिरी बजावली आहे. गेल्या दोन वर्षात त्यानं 16 डावांत तब्बल 56.44 च्या सरासरीनं 290 धावा फटकावल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे 16 पैकी 11 डावांत तो नाबाद राहिला आहे आणि त्याचा स्ट्राईक आहे 163.31. कार्तिकची ही कामगिरी आणि त्याचा ट्वेन्टी ट्वेन्टीतला सध्याचा फॉर्म लक्षात घेता त्याक्षणी त्यानं घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा म्हणणं योग्य ठरणार.

न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरणारी बरीच कारण देता येतील... सामन्यात मोक्याच्या क्षणी खलील अहमद आणि रोहित शर्माकडून सुटलेले झेल... टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण... खलील अहमद, हार्दिक आणि कृणाल पंड्यां या तिघांनी मिळूनं 12 षटकांत केवळ एका विकेटच्या मोबदल्यात दिलेल्या तब्बल 145 धावा... भारताच्या पराभवाची खरंतर ही मुख्य कारण...

Public memory is very short असं आपल्याकडे म्हटलं जातं. ज्या कार्तिकने अंतिम चेंडूवर षटकार ठोकून भारताला निदाहास ट्रॉफी जिंकून दिली आज तोच कार्तिक संघाला जिंकून देऊ शकला नाही म्हणून ट्रोल झाला. खरंतर क्रिकेटमध्ये जर-तरच्या भाषेला काहीच अर्थ नसतो. हार आणि जीत हा खेळाचाच एक भाग. पण भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात जिंकल्यानंतर आपण खेळाडूंना कौतुकानं डोक्यावर घेतो आणि हरल्यानंतर टीका हे ठरलेल. हे चित्र कधी बदलणार हाच खरा प्रश्न आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget