एक्स्प्लोर

पाण्यासाठी नोकरीवर पाणी सोडणारा वीर

"सुदर्शन सुतार..." तू आमचे डोळे अंजनाने नाही तर तुझ्या गावच्या CCT त साठलेल्या गढूळ पाण्याने धुऊन काढलेत .. अन तरीही कुठल्या महागड्या ड्रॉपने नाही एवढे ते स्वच्छ झालेयत. आम्हाला आमच्याच आयुष्याकडं परत एकदा शुद्ध दृष्टीनं पाहायला शिकवलंस..."

सोलापूरला येऊन जाऊन नोकरी करतोय. एका खासगी शाळेताय कामालाय. सुतारकाम अन् इलेक्टरेशिअन म्हणून. गावात पाण्याची नुसती बोंबाबोंब. सकाळ संध्याकाळ दुसरी काय कामं सोडून येड्यागत घागरी कळशी घ्या, सायकलला टांगा, की जावा पाणी आणायला हिकडं तिकडं असा उद्योग नुसता. च्याआयला कंटाळा आला वर्षानवर्षे तेच-तेच करुन. मग ह्या वर्षी ही पाणी फाऊंडेशनची कायतर भानगड निघाल्याली. आता पाण्याची अडचण जरी असली तरी नसती झंझाट कोण लावून घेणार मागं?? कामधंदा सुडून ही असल्या भानगडी काय करू वाटत नाईत. पण आमच्या गावचं 'काका' मनजे मेन बॉस. नेमकं ते म्हणलं "सुदर्शन राव जरा जाऊन या ट्रेनिंग ला 4 दिवस , गावाला फायदा हुईल हे पाण्याचं काम झालं तर." या विनंतीत एक 'आज्ञा' दडलेली असते हे आपल्या आपण गुपचूप ओळखायचं असतं... आता खरं सांगू का अजिबात म्हणजे अजिबात इच्छा नव्हती खरंतर 4 दिवस तिकडं कुटं सातारा भागात एवढ्या लांब ट्रेनिंग अन् फिनिंगला जायची. मनलं नौकरी वाली द्यायची शिव्या 4 दिवस कामाला नाही आल्यावर. घरदार सोडून, गावासाठी मनुन , वरून एक रुपया मिळणार नसताना कोण जाईल तिकडं?? नाही म्हणायचं ठरवलं. पर गावात काकाच्या पुढं जाता येत नाई. काकानं सांगितलं म्हणजे "तुमचा विषय संपला." तुमाला ते हसत नायतर रडत!! पर करावं तर लागणारच. मग ट्रेनिंगला गेलो. पहिला दिवस सुद्धा काढायचा मुश्किल होईल असं वाटलेलं एवढा अति नकारात्मक होऊन गेलतो. पण आता खरं मनापासनं सांगतो. "ह्या पाणी फाऊंडेशनच्या ट्रेनिंगमध्ये एक धुंदीय राव!". सगळी म्हणत्यात ते खरंय,, जादुई ही एक नुसती. म्हणजे ध्यान लावून बसल्यासारखं मन पावित्र निर्मळ, नुसतं स्वच्छ पाण्याने धुतल्यासारखं होतंय. 4 दिवस झाले अन ट्रेनिंग संपलं तवा खरंच शिवाराच्या आधी, डोळ्यात पाणी होतं सगळ्यांच्या. 70 टक्के लोकं हेच सांगतील तुमाला. आमी टोटल 11 जण ट्रेनिंगला गेलतो गावातनं. जाताना 11 जणांची 1100 मतं होती,, पण येताना सगळ्यांचं फक्त 'एक अन एकच.' "गावात यावर्षी पाणी आणायचंय" आणि थांबवायचंच!!! अकरा जण बोलले तरी एकच आवाज बाहेर येईल, इतके आमी सगळे एकरूप झालेलो. माघारी आलो अन् पहिल्या दिवसापासनंच काम चालू केलं. रोज फिल्ड वर येणं-जाणं, शिवार फेरी करणं, कोणते उपचार करायचे ठरवणं, आखणी करणं, श्रमदान करणं सुरू झालं. एवढ्या कामापुढं घर बी दिसंना अन दार बी अन नौकरीचं काम बी ...अन दुसरं काहीच. फक्त हायड्रोमार्कर, CCT, फक्की, पाणसळ, LBS एवढेच शब्द लक्षात यायचे, बाकी सगळं अन संपूर्ण विसरून गेलेलो. आता लक्षात येत होतं की काकानं मुद्दाम मला का पाठवलं ट्रेनिंगला. कारण माझा व्यवसाय सुतारकाम, मग आखणी करताना बरोब्बर मापं घेण्यात माझी गावाला लंय मदत व्हायली. कामात Accuracy भरपूर आली, सगळी खुश होती. काम इतकं वाढलं की महिन्यात किती का जवळचं असेना पण एकाही लग्नाला गेलो नाही, किंवा दुसरया कुठल्याच कार्यक्रमाला नाही, घरी बायका लेकरांची भेट सुद्दा मुशकील व्ह्यायली. होणार बी कशी, सकाळी 6 ला घराबाहेर पडायचो, कायतर तात्पुरतं खाऊन, आंघोळ न करता तसाच. लोकं भरपूर कामाला येणार अन कामाला फिल्ड किंवा आखणी नाही असं व्ह्याला लागलं, एवढं करत होतो तरी अजून कमी पडत होतं, मग आमी आयडिया केली, गावात कामाच्या 10 साईट चालू केल्या अन कुणी कुठं जायचं ठरवून दिलं, आमीबी मग सगळीकडं जाऊन आखणी करत राहायचो. आता मग काम ठीक-ठाक चालू झालं. यात आमाला दुपारी 1 ते 2 वाजायच्या घरी यायला. मग घरी येऊन अंघोळ अन जेवण की पाठ न टेकता परत कामावर , परत सगळं आखणी अन साईट वरनं यायला रात्री 9 , 10 वाजायच्या अन परत ऑफिस मधी येऊन दुसरया दिवशीच्या प्लानिंग मध्ये 2, 3 तास, म्हणजे घरी यायला रोज रात्रीच्या 12 ते 1. लेकरं तवा झोपलेली असणार. सकाळी घरून निघतानाबी झोपलेली असणार. भेट झाली तर दुपारी काय मिनिटं फकस्त. .. आमची टीम एवढी जबरदस्त झाली की 11 जण 11 गावं उभा करू शकत होतो. इतकं की काही गावं जिथं श्रमदानाला लोकं कमी येत होते, हायड्रोमार्कर सुद्धा आमी बनवून दिले. आता खरा कामाला वेग आलेला. पण घरात माझ्या ह्या अशा काम धंदा सोडून ह्या कामात गुतल्याने अन पैशासाठी म्हणून कुरबुरी सुरू झाल्या, पगार बंद होता. उसनं-पासनं करून घर चालवत होतो. बायकुचं काईच चुकत नव्हतं. दीड महिन्यात 12 हजार उसने झालतं. एके दिवशी रात्री फिल्ड वरनं 12 ला घरी आलो तर घरात कुणीच नाई... घराला कुलूप अन चावी जुन्या बुटात नेहमीच्या ठिकाणी ठेवलेली. कंटाळून शेवटी बायको गेलेली त्या दिवशी माहेरी निघून. म्हणलं बोंबला आता. तरी मला वाटलं यील दोन तीन दिवसात, पर कुठलं काय.. आता अवघड झालतं, काम ऐन मोक्यावर आलेलं अन बायको ला बी आणायचं महत्वाचं हुतं. मग दिवसा तर जाता येत नव्हतं कामावरनं. मग रात्री ह्या पाणी फौंडेशनच्या कामावरनं आलो की कुणाचीतरी 2 व्हिलर घ्यायचो अन रात्रीच तिच्या माहेरच्या दारात जाऊन विनवत बसायचो की चल बाई चुकलं माझं, अन हे अन ते म्हणून. पण ती काय ऐकायची न्हाई, परत तसाच रात्रीत माघारी फिरायचो अन पहाटं 5- 6 ला काम सुरू व्हायच्या आत गावात परत यायचो. कुणालाच माहीत नसायचं. विचित्र परिस्थिती होती. स्वतःचच हासायलाबी यायचं. म्हणजे या कामामुळं बायकुला आणायला सुद्दा मला रात्रीच जावं लागतं होतं. दोन आठवडे हे असंच चालू होतं. शेवटी मात्र मोठा आघात झाला. एके दिवशी शाळेने अर्जंट सोलापूरला बोलावलं. साहेबांच्या केबिन मध्ये गेलो. ते म्हणले दीड महिना झाला तू कामाला आला नाहीस. एवढं चांगलं काम करतोयस हिथं शाळेत. लोकांना मिळत नाही काम. तुला मिळालंय अन एवढे दिवस एवढं चांगलं काम केलंयस, सगळ्यांच्या मर्जीतला झालायस, अन आता अचानक काय त्या पाणी फौंडेशनच्या नादी लागलायस??, उद्या आमी नौकरी वरनं काढून टाकलं तर काय हे पाणी फौंडेशन यिऊन घरचा किराणा भरणाराय का? पोट कसं भरणार? घास कोण देणार तुला, म्हणून कामाला ये, तुझ्या भविष्यासाठी चांगलं सांगतोय... काय विचार करून उत्तर दिलतं त्यावेळी माहीत नाही. ट्रेनिंग आठवून असं बोललो? गावचा वर्षानुवर्षाचा दुष्काळ आठवून, का स्वतः दिवस रात्र एक महिना केलेलं काम आठवून, का दुष्काळ मुक्तीची घेतलेली शपथ पूर्ण करायची म्हणून, का अजून कशासाठी माहीत नाही? पण साहेबाना एवढंच बोललो- "साहेब माफ करा, पण आता गावाला पाणी मिळवून दिल्याशिवाय यातून माघार नाही, अजून पंधरा दिवस राहिलेत आता जर मी अंग काढून घेतलं तर गावाचं होणारं नुकसान ह्याच डोळ्यानं बघू शकणार नाही, बारकी-बारकी पोरं 4 - 4 किलोमीटर वरनं कमरे-खांद्या-डोक्यावर कळशी-घागरी नं पाणी आणायलेले मी अजून एक दिवसही बघू शकत नाही.. मी माझा निर्णय घेतलाय अन त्याच्यावर ठाम आहे... पंधरा दिवसांनी परत एकदा येईल हिथं... "कामावर घ्या" किंवा "राजीनामा लिहून मागा" दोन्ही हसतच करेल हा शब्द देतो... पण आता ह्या एकाच पावसाळ्यात गावाला दुष्काळ मुक्तीच्या जंजाळातून सोडवल्याशिवाय माघार नाही... --- "12 हजार कर्ज डोक्यावर येऊन पडलं असताना, बायको घर सोडून जात असताना, बारक्या पोरानी ओळखायचं बंद करावं असं असताना, 4-5 किलो वजन कमी होऊन शरीर काडीसारखं होत असताना, नातेवाईक अन इतर सगळं विसरून जात असताना, सर्वात महत्वाचं म्हणजे - एवढ्या खटाटोपीनं मिळालेली आयुष्याची नौकरी एका क्षणात जात असताना, आरशात खोल गेलेले डोळे अन काळं ठिककर पडलेला चेहरा स्वतः स्वतःला ओळखू येत नसताना अन या सर्वांच्या बदल्यात एक रुपयाही मिळत नसतानाही एवढं तुटून काम करायची इच्छा कुठून ह्याच्या ह्रदयात पाझरली असेल??? "सुदर्शन सुतार..." तू आमचे डोळे अंजनाने नाही तर तुझ्या गावच्या CCT त साठलेल्या गढूळ पाण्याने धुऊन काढलेत .. अन तरीही कुठल्या महागड्या ड्रॉपने नाही एवढे ते स्वच्छ झालेयत. आम्हाला आमच्याच आयुष्याकडं परत एकदा शुद्ध दृष्टीनं पाहायला शिकवलंस..." गाव: वडाळा, ता: उत्तर सोलापूर जि: सोलापूर... सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग : दुष्काळाचा कणा जिद्दीनं फोडणारा 77 वर्षांचा वाघ...!!! काळीज चिरणारी चिठ्ठी काल रात्री बाराचा पाऊस... अपयशावरचा पहिला घाव..!! धमन्या पेटलेले 40 सैनिक... जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई सलाम दोस्तहो... ...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...! द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार,  ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Manoj Jarange Patil on Prasad Lad: जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार,  ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Manoj Jarange Patil on Prasad Lad: जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
Mumbai Metro Aqua Line: मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Vastu Tips : चिमणी, पोपट की कबूतर? कोणकोणते पशु-पक्षी घरात येणं शुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
चिमणी, पोपट की कबूतर? कोणकोणते पशु-पक्षी घरात येणं शुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
Sangli Crime News: सांगलीत चोरीचा अजब प्रकार! चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरच केला लंपास, सांगाड्यापासून जनरेटरपर्यंत सगळंच गायब, PHOTO
सांगलीत चोरीचा अजब प्रकार! चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरच केला लंपास, सांगाड्यापासून जनरेटरपर्यंत सगळंच गायब, PHOTO
Embed widget