एक्स्प्लोर

BLOG: महाराष्ट्राचे 'मर्द'मंडळ! महिला'राज' बेपत्ता...

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या शिंदे-फडणवीस नावाच्या दोन बुंध्यांच्या झाडाची वेल आज अखेर सरकार स्थापनेच्या 40 व्या दिवशी विस्तारली. 18 'गड्यांनी' आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन टाकली. राजभवनावर अत्यंत हर्षोल्लासाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. राज्यपाल महोदय देखील अत्यंत आनंदी दिसले. शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाला आता 18 'पुरुष' शिलेदार मिळाले. पुरुष शब्दाला कोट करण्याचं कारण हेच की या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळालेलं नाही. पुरोगामी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही घटना अत्यंत दुर्देवी मानावी अशीच असली तरी सध्याच्या राजकारणाचा सूर पाहता हे अनपेक्षित मात्र आजिबात मानलं जाऊ शकत नाही. 

आजकाल महिला आरक्षण, महिला सबलीकरण यांसारखे विषय प्रचंड संवेदनशील उपक्रम म्हणून राबविले जात आहेत. महिलांची सुरक्षा,आरोग्य, अधिकार, स्वातंत्र्य यांसारख्या मुलभूत गोष्टींवर भलेही चर्चा होत नसेल, मात्र दिखाऊ सबलीकरणाच्या कार्यक्रमासाठी 'महिलांनी यांव केले, महिलांनी त्यांव केले' असे म्हणून महिलाच तारणहार असल्याच्या बतावण्या करताना भले-भले लोकं दिसून येतात. राजकारणात देखील महिलांना केवळ 'दिखाऊ' स्वरूपात प्रस्तुत करण्याचाच अधिकतर प्रयत्न केला जातोय. देशाच्या राजकारणाचा विचार केला असता सोनिया गांधी, मायावती, ममता बॅनर्जी,जयललिता, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, निर्मला सीतारामण यांसारखी काही नावे स्वबळावर पुढे आलेली आता दिसत आहेत. राज्यातही यादी कमी नाहीच. 

ज्येष्ठ साहित्यकार, पत्रकार उत्तम कांबळे यांचे '50 टक्क्यांची ठसठस' नावाची कादंबरी नुकतीच वाचनात आली. त्यात महिलांना निवडणुकीत दिलेल्या 50 टक्के आरक्षणावर भाष्य केले आहे. ही कादंबरी वाचताना आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत बॅनर आणि पोस्टर्सवर विजयी महिलांच्या मागे असलेल्या पुरुषांच्या मोठ-मोठाले फोटो पाहून राजकारणात महिलांच्या याच 'दिखाऊ' असण्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतेय.

73  आणि 74 व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळाले. जे कालांतराने 50 टक्के झाले. महिला ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येन दिसू लागल्या. मात्र त्याचवेळी त्यांच्यासोबत पांढरी कपडे घालून त्यांचे नवरे, भाऊ, सासरे किंवा बापदेखील तेवढ्याच संख्येने मोठ्या खुर्चीच्या शेजारी छोटी खुर्ची घेऊन अधिकृत पद्धतीने फायली चाळत बसलेले दिसून येऊ लागले आणि येतात देखील. सुरुवातीला नवऱ्याची जागा राखीव झाली, त्याने उभे राहायला लावले म्हणून राजकारणात येणाऱ्या, नवऱ्याचा किंवा इतर पुरुषांचा रबर स्टॅम्प म्हणून वावरणाऱ्या स्त्रिया आल्या. अर्थात हे आताचे चित्र नाहीच. दुर्दैवाने हे पूर्वापारपासून सुरुय. 

महिला राजकारणात यायला लागल्यापासून पुरुषप्रधान संस्कृतीचा विळखा महिलांच्या राजकीय स्थापनेभोवती दिसून येत आहे. विशेषत: निमशहरी तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आजही अनेक असुविधांना सामोरे जावे लागते. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आदी ठिकाणी आरक्षण पद्धतीमुळे महिलांना प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. मात्र ती केवळ सही किंवा अंगठ्यापुरतीच मर्यादित असल्याचे चित्र जवळपास सर्वच ठिकाणी दिसून येतेय. सरपंचपदापासून ते सभापती पदापर्यंत महिला विराजमान आहेत, तरीही महिलांचे प्रश्न सोडवताना त्यांनाही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राजकारणात कुणाची तरी बायको, मुलगी आणि सून म्हणून येणे आणि स्वत:च्या बळावर राजकारणात आस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांची संख्या फारच तोकडी आहे. 

आजही ही स्त्रियांबाबत 50 टक्क्यांची ठसठस राजकारणात कायम आहे. याला अधिक प्रमाणात दोषी महिलाच आहेत. यासाठी महिलांच्या डोक्याची मशागत होणे आवश्यक आहे.  कारण पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव अधिककरून महिलांवरच पडलेला आहे. अर्थात काही ठिकाणी लादला देखील गेला असेल. मात्र हे ओझे आता महिलांनी स्वताहून झटकने आवश्यक आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे घ्या. भाजपसारख्या जगातील सर्वात मोठा पक्षाकडे राज्यात काही महिला आमदार असताना एकाही महिलेला मंत्रिपद द्यावंस वाटलं नाही. शिंदे गटातही काही महिला आहेत. आज महिला अत्याचारासह महिलांच्या अनेक समस्या आ वासून आपल्या समक्ष उभ्या आहेत. पुरुष मंत्री त्या समस्या सोडवणार नाहीत, असा दावा मला बिलकुलच करायचा नाही. पण महिलेचं मंत्रिमंडळात स्थान का नाही? हा मात्र सवाल या व्यवस्थेला आहे. 

पुरुष व स्त्री दोघांनाही समान अधिकार असावेत, यावर जोरदार भाषणबाजी सभागृहात होते. मोठमोठाली आश्वासनंही दिली जातात. मात्र महिलांचा आवाज अशा पद्धतीनं दाबणं कितपत योग्य आहे. नुसते पोस्टर्स किंवा डिजिटलवर रणरागिणी, मर्दानी यांसारखे शब्द वापरून राजकारणात मोठे होता येत नसते ही गोष्ट आता राजकारणात असलेल्या आणि येऊ इच्छिणाऱ्या महिलांनी खरोखर डोक्यात ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी स्वत:वर असलेले पुरुषी वर्चस्वाचे ओझे झटकून देणे आवश्यक आहे. बाकी हे 20 जणांचे 'मर्द'मंडळ किंवा त्यांचे म्होरके यावर काय उत्तर देतात याकडे लक्ष आहेच...

निलेश झालटे यांचे अन्य काही ब्लॉग

 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणाEknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget