एक्स्प्लोर

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' म्हणजे हृदय, राष्ट्र आणि भारतीय संविधानाप्रती राष्ट्रीयत्वाचा अनुभव

Har Ghar Tiranga Campaign:  "हर घर तिरंगा" मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर आपला राष्ट्रध्वज नेमका कसा घडला? या प्रक्रियेबाबत विचार करणं आणि बोलणं महत्वाचं वाटतं. कारण राष्ट्रवादाच्या कल्पनेत या ध्वजाचे विशेष स्थान आहे. हेच कारण आहे की आपल्या राष्ट्रध्वजाशी आपलं खास नातं आहे जे आपल्या थेट हृदयाशी जोडलेले आहे. हे अंत:करणातून आलेलं नातं देश आणि भारतीय राज्यघटनेबद्दल भाष्य करतं. त्यामुळे हा केवळ ध्वज नसून आपली भावना आहे. काहींना असे वाटेल की ध्वजातील भगवा किंवा केशरी रंग हिंदू समुदायाचं प्रतिनिधित्व करतो, तर हिरवा रंग मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचा पांढरा रंग देशातील इतर समुदायांचे प्रतिनिधित्व करतो. मात्र हे चुकीचं आहे. स्वातंत्र्याच्या आधी यातल्या केशरी रंगाची जागा लाल रंगाने घेतली होती. याशिवाय या ध्वजाचं स्वरूप काहीसे सध्याच्या ध्वजासारखे होते.

हा ध्वज निर्णायक क्षणांचा साक्षीदार होता

या ध्वजाबद्दल गांधीजींनी 13 एप्रिल 1921 रोजी यंग इंडियामधील लेखात म्हटले होते की, ध्वजाच्या मध्यभागी चरखा किंवा फिरतं चाक हे ब्रिटीश राजवटीत प्रत्येक अत्याचारित भारतीयांकडे निर्देश करते, तसेच प्रत्येक भारतीय घराला नवसंजीवनी देण्याची शक्यता दर्शवते. संविधान सभेच्या वादविवाद आणि चर्चेनंतर 22 जुलै 1947 रोजी तिरंगा ध्वज स्वीकारण्यात आला. मात्र, ध्वजाच्या रंगांबाबत सभेतील काही सदस्यांनी दिलेल्या सूचना त्याचा वेगळाच अर्थ मांडत होत्या. हिरवे हे निसर्गाचे प्रतीक म्हणून पाहण्याकडे या सदस्यांचा कल होता आणि आपण सर्व 'धरती माते'ची मुले आहोत. केशरी रंग त्यागाचे प्रतीक म्हणून तर पांढरा रंग शांततेचे प्रतीक म्हणून घेतला गेला. हे मान्य करता येईल, पण तरीही हृदय, राष्ट्र आणि संविधान या ‘थ्री फोर्क्ड रोड’मधून हा राष्ट्रध्वज सध्याच्या स्वरूपात कसा उदयास आला आहे, याचा विचार केल्याशिवाय तिरंगा उलगडता येणार नाही. येथे थ्री फोर्क्ड म्हणजे इतिहासातील निर्णायक क्षण. जेव्हा अनेक पर्यायांपैकी एका पर्यायाची गरज भासते आणि त्यानंतर एक पर्याय निवडला जातो, तेव्हा तुम्ही तो बदलू शकत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाचेही असेच झाले आहे.

राष्ट्राच्या सन्मानाचे आणि अखंडतेचे प्रतीक

राष्ट्रध्वज काय आहे आणि तो सर्व राष्ट्र-राज्यांमध्ये सारखाच का आहे? हे जाणून घेण्याची आपल्यालाही उत्सुकता असेलच. कारण राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज हा प्रत्येक राष्ट्र-राज्याचा आधार असतो. यासोबतच भारताप्रमाणेच जवळपास सर्व राष्ट्रांना राष्ट्रीय चिन्ह आहे. "जन गण मन" या राष्ट्रगीताभोवती भारताचा इतिहास आहे. देशाचं अधिकृत राष्ट्रगीत जण गण मनभोवती आपला इतिहास आहे. जो राष्ट्रगाण "वंदे मातरम" पासून सामान्यतः गायल्या जाणाऱ्या "सारे जहाँ से अच्छा" पर्यंत पसरलेला आहे. यामुळेच भारतामध्ये राष्ट्रध्वज विशेष आणि अत्यंत महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रध्वज हे राष्ट्र आणि राज्याचे चिन्ह म्हणून घेतले जाते. राष्ट्राचा सन्मान आणि अखंडता राष्ट्रध्वजाशी जोडलेली आहे. राष्ट्रध्वजासाठी देशाचे नागरिक कितीही बलिदान देण्यास तत्पर असतात, याचा राष्ट्र-राज्य गाथेचा इतिहास साक्षीदार आहे. राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रध्वजात राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्याचे सामर्थ्य असते यावरून त्याची ताकद मोजता येते.  भारतासारख्या बहु-वांशिक, बहु-धार्मिक आणि उच्च बहुभाषिक राष्ट्रामध्ये, प्रत्येक भारतीयाला एकत्र आणणारे काहीतरी आहे याची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रध्वज आहे. तो देशवासियांना आठवण करुन देत असतो की, कोणत्याही भाषा, धर्म, जात समूह किंवा इतर कशाशीही निष्ठा बाळगण्यापूर्वी ते भारतीय आहेत. पाहिल्यास, प्रत्येक प्रकारे राष्ट्रध्वज एक प्रकारचा अप्रत्यक्ष आदेश देतो की केवळ आपला सन्मान करण्यासाठीच नाही, तर राष्ट्राप्रती आपली निष्ठा पाळण्यासाठीही.

राष्ट्रध्वजाशी जवळचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न

"हर घर तिरंगा" मोहीम हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या "आझादी का अमृत महोत्सव" या संकेतस्थळावरील महत्त्वाचा भाग आहे. हा महत्त्वाचा भाग एका वेगळ्या प्रकारच्या वादाला फोडणी घालणारा आहे. इथं म्हटलं आहे की, राष्ट्रध्वजाशी आमचे नाते नेहमीच वैयक्तिक पेक्षा अधिक औपचारिक आणि संस्थात्मक राहिले आहे. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक भारतीयाचे तिरंग्याशी वैयक्तिक नाते निर्माण करणे आणि राष्ट्र उभारणीसाठी असलेल्या बांधिलकीची जाणीव करून देणे हा आहे. ही कल्पना उघडपणे सूचित करते की त्याचा उद्देश देशभक्तीच्या भावनेला चालना देणे आहे. त्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी वेगळ्या कराव्या लागतील. पहिला, हा देशभक्तीचा प्रश्न आहे आणि दुसरे म्हणजे, राष्ट्रध्वजाशी भारतीयांचे औपचारिक, कठोर आणि संस्थात्मक नाते अतिशय खाजगी आणि जवळचे बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभक्तीवर दीर्घ आणि मोठ्या चर्चेत येण्याआधी, आपण इथे दुसऱ्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, म्हणजे राष्ट्रध्वजाशी भारतीयांचे जवळचे असलेले नाते.

ध्वजारोहणासाठी ध्वजसंहिता कधी आली

अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांप्रमाणे, भारताने सामान्य नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये किंवा कार्यालयात ध्वज फडकवण्यास परवानगी दिला नव्हती. हा अधिकार राज्याचा विशेषाधिकार म्हणून संरक्षित होता. 2002 मध्ये, 'द फ्लॅग कोड-इंडिया' ची दुरुस्ती करण्यात आली. म्हणजेच त्याची कमतरता दूर करण्यात आली. त्याची जागा भारताचा ध्वज संहितेनी घेतली. यासह, राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत राष्ट्रध्वज फडकवताना पाळले जाणारे प्रोटोकॉल तयार केले गेले.

21 सप्टेंबर 1995 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने 'फ्लॅग कोड-इंडिया' बाबत अधिकृत निर्णय दिला. या प्रकरणात तो फार महत्त्वाचा होता. त्यामध्ये न्यायालयाने असे निर्देश दिले होते की, पूर्वीची 'ध्वज संहिता-भारत' अशा प्रकारे घेतला जाऊ शकत नाही की एखाद्या सामान्य नागरिकाला त्याच्या कार्यालयातून किंवा घरातून राष्ट्रध्वज फडकवण्यापासून रोखता येईल. यामुळेच शेवटी 2002 मध्ये ध्वज संहिता-2002 अस्तित्वात आला. हा ध्वज संहिता राष्ट्रध्वजाच्या सन्मानानुसार तिरंग्याचे प्रदर्शन करण्यास परवानगी देतो.

मात्र, अलीकडच्या काळात राष्ट्रध्वज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर बरीच चर्चा होत आहे. हा प्रश्न सोडल्यास, ध्वज संहितेच्या अंतर्गत राष्ट्रध्वजावर अजूनही अनेक निर्बंध आहेत. जसे की ध्वज संहितेचा पॅरा 2.2, कलम 11 (पॅरा 2.2, से. xi) फक्त 'सूर्योदयापासून' ते सूर्यास्त होईपर्यंत फडकवण्याचा नियम आहे. मात्र, ध्वजसंहितेतील हे बदल सर्वसामान्यांच्या माहितीत कधीच आले नाहीत. परिणामी, भारतीयांचे वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचे नाते न राहता राष्ट्रध्वजाशी दूरचे आणि औपचारिक नाते राहिले असे म्हणणे अधिक सुरक्षित होते. 

स्वातंत्र्यापूर्वीच भारतीयांचे राष्ट्रध्वजाशी नाते 

स्वातंत्र्यापूर्वीच्या दोन-तीन दशके भारतीयांचे काँग्रेसच्या झेंड्याशी वैयक्तिक आणि जवळचे नाते होते. त्यावेळी काही तत्कालीन इंग्रज अधिकारी उपहासाने बोलत होते. हा, महात्मा गांधी यांचा ध्वज आहे. ज्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. ज्यामध्ये चरख्याचे चिन्ह आणले. त्यानंतर तो संविधान सभेने स्वीकारला. त्यानंतर त्याला राष्ट्रध्वजाचा सन्मान मिळाला.

ध्वज फडकावण्याच्या अधिकारासाठी काँग्रेस आणि महिलांनी ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात मोठा लढा दिला. ध्वज फडकावल्याने ब्रिटीश अधिकार्‍यांना नेहमी राग येत होता, हे नागरिकांच्या लक्षात आले होते. त्यानंतर बर्‍याचवेळा बदला म्हणून ब्रिटीश अधिकार्‍यांनी ध्वज खाली करण्याचा आदेश दिला होता. काही वेळेस जेव्हा ब्रिटीश सरकारचे अधिकारी काँग्रेसचा झेंडा फडकावण्याची परवानगी देत होते, तेव्हा त्याला वसाहतवादी सरकारने विरोध केला होता.

काँग्रेसचा झेंडा युनियन जॅकसोबत फडकवल्यामुळे ब्रिटिश सरकार चिडले
एक घटना भागलपूरमध्ये 1923 साली घडली होती. त्यानंतर एका सरकारी अधिकाऱ्याने युनियन जॅकच्या बाजूला काँग्रेसचा ध्वज फडकवण्याची सहमती दर्शवली, खरंतर तो ज्युनियन जॅकपेक्षा कमी उंचीवर फडकवला गेला. याचा परिणाम असा झाला की त्यानंतर केवळ ब्रिटिश सरकारनेच नव्हे, तर ब्रिटिश मंत्रिमंडळानेही कडक नोट जारी केली. "कोणत्याही परिस्थितीत युनियन जॅकच्या खालीही स्वराज किंवा गांधी ध्वज फडकवू नये," असे त्या नोटमध्ये म्हटले आहे. ब्रिटिश ध्वजावर सरकारच्या नाराजीचा परिणाम अतिशय क्रूर होता. मिठाच्या सत्याग्रहादरम्यान, ध्वज फडकावण्याचा किंवा फडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासाठी आठ वर्षांच्या मुलांना फटके मारण्यात आले. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या निर्भीड आणि धाडसी कमलादेवी चट्टोपाध्याय (Kamaladevi Chattopadhyay) यांनी मिठाच्या सत्याग्रहादरम्यान (Salt Satyagraha) ध्वजासाठी केलेल्या संघर्षाबद्दल त्यांच्या आठवणींमध्ये  सांगितले. काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी वेळोवेळी ध्वज फडकावला आणि ब्रिटीश पोलिसांनी प्रत्येक वेळी तो खाली उतरवला असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांनी लिहिले, "आजही वर झेंडा, वर झेंड्याचे आवाज कानात घुमत राहतात." स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे 1988 मध्ये निधन झाले.

खडतर संघर्षानंतर राष्ट्रध्व फडकवण्याचा अधिकार मिळाला
कठीण संघर्षानंतर भारतीयांना राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार मिळाला. या संघर्षांच्या छायेत राष्ट्रध्वज फडकत राहिला. भिकाजी कामा यांनी बंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादन केले. युरोपातील भारतीय क्रांतिकारकांशी त्यांचा जवळचा संबंध होता. 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये पहिला भारतीय राष्ट्रध्वज मादाम भिकाजी कामा यांनी फडकवला. हा राष्ट्रध्वज देशाच्या सध्याच्या ध्वजापेक्षा वेगळा होता, परंतु स्वातंत्र्य लढ्यादरम्यान तयार केलेल्या अनेक अनधिकृत ध्वजांपैकी एक होता.  याबाबत कमलादेवींनी यांनी लिहिले आहे की, "एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व म्हणून भारताची स्थापना करण्यात आली.  1906 मध्ये कलकत्ता (कोलकाता) येथे तोच ध्वज प्रथमच फडकवण्यात आला. 1921 मध्ये, कामा यांच्या आदेशानुसार गांधीजी. पण चरखा त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. त्यानंतर 1931 मध्ये ध्वजाचे स्वरूप पुन्हा सुधारण्यात आले. गांधींनी लिहिल्याप्रमाणे, "ध्वज ही सर्व राष्ट्रांची अत्यावश्यक गरज आहे."  या ध्वजासाठी लाखो लोकांचे प्राण गेले. मूर्तिपूजेप्रमाणेच राष्ट्रध्वजावरील अखंड प्रेम आणि आदर आहे, ज्याचा नाश करणे पाप ठरेल, यात शंका नाही. युनियन जॅक हवेत उडताना पाहून ब्रिटिशांचा ऊर अभिमानाने भरून आला. हे पाहून गांधीजींनी त्या वेळी विचारले, "सर्व भारतीयांनी "जगण्यासाठी आणि मरण्यासाठी हा समान ध्वज ओळखणे आवश्यक नाही का?" अशा रीतीने त्या काळात स्वातंत्र्याच्या प्रत्येक मोहिमेला काँग्रेसचा झेंडा असायचा, तर कलाकारांनीही आपल्या कलेत ठळकपणे ध्वजाचा समावेश केला.

जेव्हा राष्ट्रध्वजाची रंगीत प्रिंट काढण्यात आली

1945 मध्ये राष्ट्रध्वजाची रंगीत प्रिंट काढण्यात आली होती. त्यामध्ये सुभाष चंद्र बोस आणि देशद्रोहाच्या आरोपात खटल्याला सामोरे गेलेल्या भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या (Indian National Army)  वीरांना स्थान देण्यात आलं होतं. एकप्रकारे ते त्या वीरांच्या धैर्याचा गौरव करण्यासारखं होतं. त्या काळातील काँग्रेसच्या ध्वजात चरखा, आयएनएच्या (INA) ध्वजात वाघ (Springing Tiger) आणि दुसऱ्या बाजूला सुभाषचंद्र बोस दिसतात. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्म्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं असेल, पण त्यांचा संघर्ष आणि बलिदान व्यर्थ गेले नाही. 1947 पासून सुधीर चौधरी यांनी काढलेल्या प्रिंटमधून त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरव करण्यात आला होता. तसेच, त्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पंडीत जवाहरलाल नेहरूंना तिरंगा सुपूर्द करताना दाखवलं होतं. त्यासोबतच, या प्रिंटमध्ये भारतमातेच्या वेगवेगळ्या हातांमध्ये तिरंगा साकारण्यापूर्वीचा राष्ट्रध्वजाचा प्रवास दर्शविला होता. 

हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिलं कारण, ते ज्यासाठी उभे आहेत त्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी वसाहतवादी दडपशाहीविरुद्ध स्वेच्छेनं लढा दिला. जर भारतीयांनी राष्ट्रध्वजासाठी लढा दिला, तर त्यांनी राष्ट्रध्वजावरचे हे प्रेम राज्यापेक्षा देशवासीयांच्या अंतःकरणातून आलेला आदेश म्हणून आलं. हे प्रेम दडपणाखाली नव्हतं तर उत्स्फूर्त होते, परंतु आज अशा कोणत्याही चर्चेत, ज्यामध्ये आपण ध्वज किंवा ध्वजाचा अर्थ काय? असं बोलतो, तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की, राष्ट्राचं काम देशभक्त नागरिक घडवणं हे असलं तरी देशाच्या दबावाखाली निर्माण झालेली ही देशभक्ती फार काळ टिकू शकत नाही. 

भारताचं संविधान आणि राष्ट्र ध्वज 

भारताच्या राज्यघटनेत राष्ट्रध्वजावर काहीही सांगण्यासारखं नाही हे देखील कमी प्रासंगिक नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचं नेतृत्व करणारे माजी सरन्यायाधीश व्हीएन खरे यांनी 2004 मध्ये म्हटलं होतं की, संविधानाच्या कलम 19(1)(अ) च्या लेखी तरतुदींनुसार झेंडा फडकवण्याचा नागरिकांना मूलभूत अधिकार आहे. हा लेख भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आहे. 

अर्थात, राज्यघटनेत एक हजार विषयांवर स्पष्टपणे सांगण्यासारखं काहीही नाही आणि सरन्यायाधीश  खरे यांनी न्यायालयांना जे करायचं आहे, तेच केलं, म्हणजे राज्यघटनेचा अर्थ लावला. हे ठीक आणि चांगलं आहे, पण राष्ट्रध्वजाचा आदर करणारे अनेक लोक संविधानाचा आदर करत नाहीत, या वस्तुस्थितीलाही सामोरं जावं लागेल. राष्ट्रही याला अपवाद नाही. म्हणजे लोक देशाच्या संविधानाकडे लक्ष देत नसले तरी राष्ट्रध्वजाचा आदर करतात.

किंबहुना इथे जनतेच्या संविधानापेक्षा अधिक राष्ट्रध्वजाचा मान राखण्याची दाट शक्यता आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मोठा आणि महत्वाचा अधिकार आहे, ज्यामध्ये ध्वज फडकवण्याचा अधिकार देखील आहे.  हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे की संविधानानेच देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून राष्ट्रध्वजाचा समावेश केला आहे. आता भारतातील नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, कदाचित भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करण्याच्या कर्तव्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

टीप- लेखात दिलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. एबीपी माझा याच्याशी सहमत असेलच असे नाही. या लेखाशी संबंधित सर्व दावे किंवा आक्षेपांसाठी लेखक वैयक्तिक जबाबदार असतील.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget