एक्स्प्लोर
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन
जैसलमेर.. तसं लहान शहर. पण कला आणि सौंदर्यदृष्टी इथल्या कणाकणात सामावलीय. पिवळसर रंगाच्या दगडांपासून निर्मित भव्य घरं, सुंदर हवेल्या, बाजारपेठांनी गजबजलेले रस्ते, प्राचीन मंदिरं आणि थरच्या वाळवंटातला गडिसर तलाव. या अद्भूत सुंदर भूमीवरच्या त्रिकुटा पर्वतावर स्वर्णमुकुटासमान भासणारा हा सुवर्ण किल्ला.

तनोटहून निघालो. बस वेगानं जैसलमेरकडे निघाली होती. अडीच तासाचं अंतर दोन तासातच पूर्ण करु की काय असं वाटत होतं. तसंही लवकर पोहोचलो तर दिवसभर जैसलमेर फिरण्यासाठी मला जास्त वेळ मिळणार होता. मुंबई-पुण्यात जशा रस्त्यावर गाड्याच गाड्या असतात, तसं इथे नसतं. मी ड्रायव्हरच्या सीटजवळ बसलो होतो. त्यामुळे बसमधून आजूबाजूचा परिसर बारकाईनं न्याहाळता येत होता. जैसलमेर आता अगदी जवळ आलं होतं. अर्ध्या तासात पोहोचूच, असं ड्रायव्हरने मोठ्या ठामपणे सांगितलं खरं. पण पुढच्या पाच मिनिटात माशी शिंकली. जे व्हायला नको होतं, तेच झालं.
सकाळी नऊच्या सुमारास अचानकच वाऱ्याचा जोर वाढला. काही मिनिटांपूर्वी मोकळ्या असलेल्या रस्त्यावर वाळूचे डोंगर तयार झाले. पुढे एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. ती वाळू हटवण्याठी जेसीबी बोलवण्यात आली होती. ट्रॅफिक आपल्याला काही नवीन नसतं. पण हे असं ट्रॅफिक मी तरी पहिल्यांदाच बघत होतो. बसच्या दारं खिडक्या बंद कराव्या लागल्या. कारण वाळूचं ते वादळ इतकं भयानक होतं, की समोर दोन गाड्यांनंतरची तिसरी गाडीसुध्दा पुसटशी दिसत होती. छोट्या कारही वाळूमध्ये फसत होत्या.
सौ. फेसबुक
ते मला नीट खायला जमेना. शेवटी, शेजारच्या माणसाने न राहावून मला दाल पकवान कसा खायचा ते सांगितलं.
"पहली बार खा रहा हुँ ना...तो मालूम नही कैसे खाते हैं I" मी जरा खजील होऊनच त्याला सांगितलं.
पण मोठ्या उत्साहानं तो म्हणाला, "अरे, कोई बात नही, लेकिन आप सही जगह पे आये होI जैसलमेर आये और खत्री साहब का दाल पकवान खाना ही चाहिएI वैसे कहा से आये हो आप?"
मी थोडंसं हसत दाल पकवानचा घास घेत "मुंबई! " एवढंच उत्तर दिलं. तुम्हाला सांगतो, काय अप्रतिम चव होती! भूक कडाक्याची लागली असल्यामुळे असेल कदाचित, पण ती चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळतीय.
माझ्या चेहऱ्यावरचं समाधान बघून शेजारचा मित्र खुश झाला. खाता खाता मला म्हणाला, "क्यों? कैसा लगा?"
मी म्हणालो "अच्छा हैI"
"तभी तो खत्री साहब को सोनम कपूर की शादी में दाल पकवान परोसने बंबई ले गये थे अनिल कपूर!" तो हे सगळं अतिशय अभिमानानं सांगत होता.
मी एक प्लेट संपण्याआधीच आणखी एक ऑर्डर दिली.
पोटभर जेवल्यावर बरं वाटलं. दोन वाजत आले होते. जैसलमेर शहरामध्ये 19 आणि 20 व्या शतकात अनक हवेल्या बांधल्या गेल्या. त्यात नथमल की हवेली, सलीम की हवेली, पटवों की हवेली अशा अनेक हवेल्या बघण्यासारख्या आहेत.
पटवों की हवेली किल्ल्यापासून एक ते दीड किमीवर आहे. पण त्याच रस्त्यावर जैसलमेरचं मार्केटही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये फेरफटका मारत मी निघालो.. रस्त्याच्या दुतर्फा साडी, दुपट्टे, चादरी, शोभेच्या वस्तू, बारीक कोरीव काम असलेल्या वस्तू यांची दुकानं आहेत. हीच दुकानं किल्ल्यातही आहेत, पण तिथे याच वस्तू महाग मिळतात, असा माझा अनुभव आहे. ज्या चादरीची किंमत मला किल्ल्यात 700 रुपये सांगितली, तीच चादर इथे 500 रुपयात मिळत होती. घासाघीस केल्यावर किंमत आणखीही कमी झाली असती. मी चादरी वगैरे घेऊन फिरु शकत नसल्याने खरेदी करणं टाळलं. पण इथलं मार्केट फिरल्यावर तुम्हाला खरेदीचा मोह आवरणं केवळ अशक्य आहे. विशेषत: महिलांना...
दुपारचे तीन वाजले. आकाशात काळे ढग होते. पण पाऊस पडेल, असं वाटत नव्हतं. पटवों की हवेलीपासून मी गडिसर लेकला निघालो. खरंतर गडिसर लेकला संध्याकाळी जायचं, असं ठरवलं होतं. पण आता लवकर सगळं बघून झालं होतं. मग मी गडिसर तलावाकडे जायला निघालो. तेवढ्यात मला जैसलमेरजवळ एक भूतांचं गाव असल्याचं आठवलं. त्याबद्दल आधी वाचनात आलं होतं. मी रिक्षावाल्याला सहज विचारलं. " भैया, भूतवाले गांव ले कर चलोगे?"
रिक्षावाल्याला हसायला आलं. तो म्हणाला "आपको गडिसर तालाब जाना है ना?"
मी म्हटलं, "हां.. तालाब तो शाम को भी जा सकते है! अभी भूतवाले गाव चलते हैI "
रिक्षा बाजूला लावत तो म्हणाला, "देखो आजतक किसीने मुझे भूतवाले गाव जाने के बारे मे नहीं पुंछाI"
मी म्हटलं, "चलो ना, दिन ढलने से पहले वापस आ जायेंगे.."
त्यावर तो म्हणाला, "नही भैया, यहां से 20 किमी है! बहोत टाईम जायेगाI"
मी म्हटलं, "आपको जो पैसे लेनेे हैं लिजिएI और हम बाहर से ही 10 मिनिट मे लौट आयेंगेI"
त्यावर तो म्हणाला, "200 रु. लुंगाI"
मी म्हटलं, "चलो, कोई बात नहीI लिजिए 200 रु.I"
त्याने रिक्षा उलट्या दिशेला वळवली. जैसलमेर एअरपोर्टजवळच्या रस्त्यावरून रिक्षा पुढे आली. मी म्हटलं "भैया, लोग जाते हैं क्या वहां?"
त्यावर तो म्हणाला, "आते है, पर शाम से पहेले निकलना पडता हैI"
या कुलधरा गावात आधी इतकी दहशत होती, की या गावाच्या आसपासही कोणी फिरकायचं नाही. आता राजस्थान सरकारने कुलधरा गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. तरीही मोजके लोक सोडले, तर इथे येण्याची हिंमत कोणी करत नाही.
आम्ही कुलधरा गावाजवळ पोहोचलो तर तिथे दोनच मुलं होती. बहुदा ती गावाजवळचीच असावीत. या गावात आता फक्त पडलेली घरं आहेत. जीर्ण भींती आणि अस्ताव्यस्त पडलेले घरांचे दगड..
हे गडिसर तलावाच्या समोरचं सार्वजनिक शौचालय आहे. जैसलमेरच्या स्थापत्य, कलाकुसर, कल्पकतेची मी खूप स्तुती केली. त्याचं हे उदाहरण आहे. जिथे अशी शाही सार्वजनिक शौचालयं आहेत, तिथली घरं कशी असतील, याचा विचार करा.
असो, तर वाळवंटातल्या जैसलमेर शहराला पाणी मिळावं, यासाठी 14 व्या शतकात या कृत्रिम गडिसर तलावाची निर्मिती राजा रावल जैसल यांनी केली. त्यानंतर 14 व्या शतकात महारावल गडसी सिंह यांनी या तलावाला पुनरुज्जीवित केलं. जुलै महिन्यातही या तलावात भरपूर पाणी होतं.
सध्या पर्यटक नसल्यामुळे बोटिंग बंद होतं. पण या तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आजूबाजूच्या रम्य परिसरात मनःशांती मिळते. तुम्हाला फोटो, सेल्फीची आवड असेल तर गडिसर लेक सर्वोत्तम..





सौ. फेसबुक
ते मला नीट खायला जमेना. शेवटी, शेजारच्या माणसाने न राहावून मला दाल पकवान कसा खायचा ते सांगितलं.
"पहली बार खा रहा हुँ ना...तो मालूम नही कैसे खाते हैं I" मी जरा खजील होऊनच त्याला सांगितलं.
पण मोठ्या उत्साहानं तो म्हणाला, "अरे, कोई बात नही, लेकिन आप सही जगह पे आये होI जैसलमेर आये और खत्री साहब का दाल पकवान खाना ही चाहिएI वैसे कहा से आये हो आप?"
मी थोडंसं हसत दाल पकवानचा घास घेत "मुंबई! " एवढंच उत्तर दिलं. तुम्हाला सांगतो, काय अप्रतिम चव होती! भूक कडाक्याची लागली असल्यामुळे असेल कदाचित, पण ती चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळतीय.
माझ्या चेहऱ्यावरचं समाधान बघून शेजारचा मित्र खुश झाला. खाता खाता मला म्हणाला, "क्यों? कैसा लगा?"
मी म्हणालो "अच्छा हैI"
"तभी तो खत्री साहब को सोनम कपूर की शादी में दाल पकवान परोसने बंबई ले गये थे अनिल कपूर!" तो हे सगळं अतिशय अभिमानानं सांगत होता.
मी एक प्लेट संपण्याआधीच आणखी एक ऑर्डर दिली.
पोटभर जेवल्यावर बरं वाटलं. दोन वाजत आले होते. जैसलमेर शहरामध्ये 19 आणि 20 व्या शतकात अनक हवेल्या बांधल्या गेल्या. त्यात नथमल की हवेली, सलीम की हवेली, पटवों की हवेली अशा अनेक हवेल्या बघण्यासारख्या आहेत.
पटवों की हवेली किल्ल्यापासून एक ते दीड किमीवर आहे. पण त्याच रस्त्यावर जैसलमेरचं मार्केटही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये फेरफटका मारत मी निघालो.. रस्त्याच्या दुतर्फा साडी, दुपट्टे, चादरी, शोभेच्या वस्तू, बारीक कोरीव काम असलेल्या वस्तू यांची दुकानं आहेत. हीच दुकानं किल्ल्यातही आहेत, पण तिथे याच वस्तू महाग मिळतात, असा माझा अनुभव आहे. ज्या चादरीची किंमत मला किल्ल्यात 700 रुपये सांगितली, तीच चादर इथे 500 रुपयात मिळत होती. घासाघीस केल्यावर किंमत आणखीही कमी झाली असती. मी चादरी वगैरे घेऊन फिरु शकत नसल्याने खरेदी करणं टाळलं. पण इथलं मार्केट फिरल्यावर तुम्हाला खरेदीचा मोह आवरणं केवळ अशक्य आहे. विशेषत: महिलांना...


दुपारचे तीन वाजले. आकाशात काळे ढग होते. पण पाऊस पडेल, असं वाटत नव्हतं. पटवों की हवेलीपासून मी गडिसर लेकला निघालो. खरंतर गडिसर लेकला संध्याकाळी जायचं, असं ठरवलं होतं. पण आता लवकर सगळं बघून झालं होतं. मग मी गडिसर तलावाकडे जायला निघालो. तेवढ्यात मला जैसलमेरजवळ एक भूतांचं गाव असल्याचं आठवलं. त्याबद्दल आधी वाचनात आलं होतं. मी रिक्षावाल्याला सहज विचारलं. " भैया, भूतवाले गांव ले कर चलोगे?"
रिक्षावाल्याला हसायला आलं. तो म्हणाला "आपको गडिसर तालाब जाना है ना?"
मी म्हटलं, "हां.. तालाब तो शाम को भी जा सकते है! अभी भूतवाले गाव चलते हैI "
रिक्षा बाजूला लावत तो म्हणाला, "देखो आजतक किसीने मुझे भूतवाले गाव जाने के बारे मे नहीं पुंछाI"
मी म्हटलं, "चलो ना, दिन ढलने से पहले वापस आ जायेंगे.."
त्यावर तो म्हणाला, "नही भैया, यहां से 20 किमी है! बहोत टाईम जायेगाI"
मी म्हटलं, "आपको जो पैसे लेनेे हैं लिजिएI और हम बाहर से ही 10 मिनिट मे लौट आयेंगेI"
त्यावर तो म्हणाला, "200 रु. लुंगाI"
मी म्हटलं, "चलो, कोई बात नहीI लिजिए 200 रु.I"
त्याने रिक्षा उलट्या दिशेला वळवली. जैसलमेर एअरपोर्टजवळच्या रस्त्यावरून रिक्षा पुढे आली. मी म्हटलं "भैया, लोग जाते हैं क्या वहां?"
त्यावर तो म्हणाला, "आते है, पर शाम से पहेले निकलना पडता हैI"
या कुलधरा गावात आधी इतकी दहशत होती, की या गावाच्या आसपासही कोणी फिरकायचं नाही. आता राजस्थान सरकारने कुलधरा गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. तरीही मोजके लोक सोडले, तर इथे येण्याची हिंमत कोणी करत नाही.
आम्ही कुलधरा गावाजवळ पोहोचलो तर तिथे दोनच मुलं होती. बहुदा ती गावाजवळचीच असावीत. या गावात आता फक्त पडलेली घरं आहेत. जीर्ण भींती आणि अस्ताव्यस्त पडलेले घरांचे दगड..

हे गडिसर तलावाच्या समोरचं सार्वजनिक शौचालय आहे. जैसलमेरच्या स्थापत्य, कलाकुसर, कल्पकतेची मी खूप स्तुती केली. त्याचं हे उदाहरण आहे. जिथे अशी शाही सार्वजनिक शौचालयं आहेत, तिथली घरं कशी असतील, याचा विचार करा.
असो, तर वाळवंटातल्या जैसलमेर शहराला पाणी मिळावं, यासाठी 14 व्या शतकात या कृत्रिम गडिसर तलावाची निर्मिती राजा रावल जैसल यांनी केली. त्यानंतर 14 व्या शतकात महारावल गडसी सिंह यांनी या तलावाला पुनरुज्जीवित केलं. जुलै महिन्यातही या तलावात भरपूर पाणी होतं.
सध्या पर्यटक नसल्यामुळे बोटिंग बंद होतं. पण या तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आजूबाजूच्या रम्य परिसरात मनःशांती मिळते. तुम्हाला फोटो, सेल्फीची आवड असेल तर गडिसर लेक सर्वोत्तम..


तळटीप- भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच..
संबंधित ब्लॉग
View More
Advertisement
Advertisement

























