एक्स्प्लोर

Maharashtra Politics NCP : राष्ट्रवादीच्या फुटीपुढे सेनेतील फूट झाकोळली?

बीडमधील कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीतील दरी वाढतेय का आणि त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाामुळे शिंदेगटाला दिलासा मिळतोय का? असे काही प्रश्न निर्माण होतात. तसा या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध नसताना हे प्रश्न पडायची अनेक कारणं आहेत. महत्वाचं कारण आहे कालच्या अजितदादांच्या भव्य सभेतील बदललेलं वातावरण. या सभेत अजितदादा गटाकडून पहिल्यांदा थेट शरद पवार यांना काही खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. 

प्रश्न विचारण्यात आघाडीवर होते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. 1991 साली शरद पवारांनी शिवसेना फोडून भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं तेव्हापासून सर्व सुखदु:खात भुजबळ पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या सोबत होते. मात्र या काळात पवारसाहेब सुखदु:खात भुजबळांसोबत होते का? की त्यांचा फक्त अत्यंत स्ट्रॅटेजिक वापर करुन घेतला गेलाय? असे प्रश्न भुजबळ समर्थकांना कायम सतावत होतेच. काल भुजबळांनी भावनांना मोकळी वाट करुन दिली आणि शरद पवार गट त्यांच्या विरोधात आक्रमक झाला. 

राष्ट्रवादीतील वादाचा फायदा शिंदेगटातील आमदारांना होतोय. वर्षभरानंतर पहिल्यांदाच गद्दार-खोके हा शब्द कानावर न पडता त्यांचा दिवस संपतोय.. वर्षभर अशाच काही शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना हैराण करुन सोडलं होतं. सकाळ संध्याकाळ ठाकरे गट आणि शिंदे गटाचं एकमेकांची उणी दुणी काढणं सुरु होतं. मात्र दोन जुलैनंतर राज्यातलं वातावरण बदललं, अजितदादा सरकारमध्ये आले आणि अचानक गद्दार, खोके हे शब्द कानावर पडण्याचं प्रमाण कमी झालं. सध्या सगळा फोकस राष्ट्रवादीकडे शिफ्ट झाल्याचं चित्र आहे.

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर जी कटुता, राग, चीड, दिसली ते सगळं राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर गायब आहे. एक दोन नेते सोडले तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आत्तापर्यंत संयम बाळगला होता. पक्षात खरंच फूट आहे की नाही अशी शंका यावी एवढा सौहार्द दिसत होता. मात्र त्यात हळूहळू बदल होतोय. कालच्या बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांनाच लक्ष्य केलं. पुण्यात भुजबळांविरोधात मोठं आंदोलन केलं गेलं. अजितदादा गटाच्या टिकेला शरद पवार, सुप्रिया सुळे कोड्यात उत्तर देत आहेत तर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड थेट उत्तरं देत आहेत. रोहित पवार यांनी तर एजंट वगैरे शेलके शब्द वापरायला सुरुवातही केलीय. बीडमध्ये भुजबळांच्या भाषणावेळी लोकं निघून जात होती असा दावाही त्यांनी केला. 

राष्ट्रवादीत सुरु असलेल्या या सगळ्या गदारोळामुळे शिंदे गट वेगळ्याच कारणासाठी आनंदी आहे. वर्षभर जिथे जातील तिथे गद्दार खोके अशी टीका टोमणे शिंदे आणि 40 आमदार सहन करतायत. त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गही दिसत नव्हता, उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळतेय की काय असं वातावरण तयार केलं जात होतं.अशा वेळी राष्ट्रवादीतील फूट मदतीला धावून आलीय. शिवसेनेच्या 40 आमदारांना टीकाटोमण्यांच्या फैरींपासून थोडीशी उसंत मिळालीय. राष्ट्रवादीतील या फुटीतून उबाठा शिवसेनेनं बरंच काही शिकायला हवं असं आमदार संजय शिरसाट म्हणतात ते त्याचमुळे. एक गट वेगळा झाला म्हणजे त्याच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नसल्याचं सांगत, पवार लढतायत तर उद्धव ठाकरे भांडतायत अशी टिपण्णी करायला ते विसरले नाहीत.

सध्या राज्यातील सगळी राजकीय स्पेस राष्ट्रवादीने व्यापून टाकली आहे. त्यामुळे शिवसेनेतील फूट हा विषय सध्या तरी मागे पडलाय. या काळात आपल्यावरील रोष कमी व्हायला मदत होईल अशी आशा शिंदे गट करत असेल.
अगदी सुरुवातीच्या काळापासून गद्दार या शब्दाला शिवसेनेत अगदी वेगळं महत्व आहे. शिवसैनिकांसाठी, सेनेच्या मतदारांसाठी या शब्दाचा पूर्णपणे वेगळा अर्थ आहे. बंडखोरांना सेनेचा सामान्य मतदार सहसा माफ करत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे गद्दार आणि खोके या शब्दांचे बाण कसे रोखायचे हा प्रश्न शिंदेसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांसमोर होता.  त्यातच जळगाव असो की हिंगोली उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहून त्यांच्या चिंतेत भरच पडली असणार. 

त्यामुळेच पवारांनी सभा घ्याव्यात, अजितदादांनी उत्तरसभा घ्याव्यात, भव्य रोड शो करावेत, एकमेकां विरोधात आंदोलनं करावीत असं शिंदेगटातील अनेकांना वाटत असेल. शरद पवार जिथे सभा घेतील तिथे सभा घेऊन उत्तर देणार हे अजितदादांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार त्यांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन केलं, बीडला भव्य सभा घेतली, त्याला उत्तरदायित्व सभा असं नावंही दिलं. आता ते शरद पवारांपाठोपाठ 10 सप्टेंबरला कोल्हापूरातही सभा घेणार आहेत. पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध भुजबळ, पवार विरुद्ध मुंढे हा वाद काही काळ असाच सुरु राहावा आणि आपल्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये असं शिवसेनेच्या 40 आमदारांना वाटत असेल तर नवल वाटायला नको. राष्ट्रवादीतील फुटनाट्यामुळे आपला विषय थोडा विसराळी पडेल अशी आशा ते करत असतील. तसं होईल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
Embed widget