एक्स्प्लोर

BLOG | कोकणला नजर लागली 'निसर्गा'ची

सध्याची स्थिती पाहता माझं कोकण 20 ते 25 वर्षे मागे आलंय. साऱ्या बागा जमीनदोस्त झाल्यात. गावात रोजगार नसल्यानं मुंबईत अनेक जण मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्थायिक होतात. पण, गाव आणि तिथल्या माणसांशी नाळ मात्र काय जोडलेली असते.

टुमदार कौलारू घरं, नारळी-फोपळीच्या बागा, आंबा, काजू आणि समुद्राची गाज म्हणजे 'माझं कोकण'. निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेले ठिकाण म्हणजे 'माझं कोकण'. 'येवा कोकण आपलंच असा' असं म्हणत इथल्या माणसांनी कायमच सर्वाचं स्वागत केलं. पण, आज मात्र कोकणातल्या किनारपट्टी भागातील चित्र वेगळं आहे. निसर्ग चक्रीवादळ आलं आणि सारं घेऊन गेलं. नारळ, फोपळी, आंबा, काजूच्या बागा जमिनदोस्त झाल्या. घरांची कौलं उडून गेली. चक्रीवादळानं सारं चित्र बदललं आणि माझं कोकण बोडकं झालं. माझं गाव कोकणातलं हे सांगताना ऊर भरून येतो. त्याचा काळजाचं आज पाणी पाणी झालं. कायम हसतं-खेळतं असलेल्या कोकणावर आता दु:खाची छटा जाणवते. उद्याची चिंता जाणवते. कारण सध्या झालेली हानी ही अपरिमित अशीच. न जाणो किती पिढ्या या बागांवर जगल्या. पण त्यांची झालेली अवस्था पाहून काळजात धस्स होतं. उंचच उंच डोंगर दऱ्यांमधल्या दुर्गम भागात जन्मलेल्या आणि वावरलेल्या कोकणी माणसात कणकणखरपणा देखील ठासून भरलेला. पण, चक्रीवादळ आलं सारं घेऊन गेले. लाल मातीच्या कौलारू घरात कित्येक पिढ्या वाढल्या. पण, आज जमीनदोस्त झालेलं घर पाहताना अश्रू आवरणं कठिणच. वाडवडिलांपासून चालत असलेल्या वारशाचा, वैभवाचा कोकणी माणसाला अभिमान देखील भारीच. पण, हे सारं एका क्षणात नाहीसं झालंय.

सध्याची स्थिती पाहता माझं कोकण 20 ते 25 वर्षे मागे आलंय. साऱ्या बागा जमीनदोस्त झाल्यात. गावात रोजगार नसल्यानं मुंबईत अनेक जण मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्थायिक होतात. पण, गाव आणि तिथल्या माणसांशी नाळ मात्र काय जोडलेली असते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात दोन कोकणी माणसं एकत्र आल्यावर, कुणी आपल्या कोकणातलं भेटल्यावर काय मग काय म्हणतेय वाडी? यंदा नाम्या, बावा, शिंदे, कदम, जाधव, गोखल्यांची कलमं लागलीत काय रे? अशी आपुलकीनं चौकशी केली जाते.

संध्याकाळ झाल्यावर पारावर गजाली गात दिवसाचा शेवट सुखद करण्यास आम्हाला वेगळीच धन्यता. पण, यापुढे मात्र चित्र नक्कीच वेगळं असेल. आज निसर्ग चक्रीवादळानं कोकणचं सौदर्य हिरावून घेतलंय. किनारपट्टी भागात झालेली हानी प्रचंड आहे. 'बाबा आम्ही काय असली परिस्थिती याच्या अगोदर कधीच बघितलेली नाय' असं सांगताना जुन्या जाणत्यांच्या आवाजातला कातरपणा मनाला खोल जखम करून जातो. सध्याचा काळ तसा कठिणच ना विज, ना पाणी ना संपर्काचं साधन अशा परिस्थितीत इथला माणूस सध्या सावरण्यासाठी धडपड करतोय. नोकरी-धंद्यानिमित्त शहरांमध्ये असलेल्या लोकांची पावलं गावी आल्यानंतर मात्र सारी परिस्थिती पाहून जाग्यावरच थरथर कापू लागतात. डोळ्यांच्या पापण्या अश्रू ओले करून जातात.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी आता सर्वच जण प्रयत्न करत आहेत. सरकारी मदतीची अपेक्षा न करता प्रत्येक जण आपल्यापरिनं सारं काही उभं करण्याचा प्रयत्न करतोय. सध्याच्या स्थितीत आता रात्र देखील वैऱ्याची वाटू लागलीय. कोकण उद्धवस्त झालंय. निसर्ग चक्रीवादळानं निसर्गानं दिलेलं सौदर्याचं देणं ओरबडून नेलंय. पण, त्यानंतर देखील त्यांचा संघर्ष सुरू झालाय तो सारं काही उभारण्यासाठी, डोळ्या देखत पडलेलं, जमीनदोस्त झालेलं घर बांधण्यासाठी आता गावातील आता शेकडो हात पुढे येतायत. उन्मळून पडलेल्या बागा पुन्हा नव्यानं सावरण्याची धडपड सध्या दिसून येतेय. समुद्राची गाज उठ गड्या सावर म्हणत मनाला पुन्हा एक नवी उभारी देतेय. हे सारं उभारताही येईल. त्यासाठी कष्ट देखील घेता येतील. पण, पिढ्यान पिढ्यांच्या जपलेल्या आठवणींचं काय? याच आठवणींनी मन हुंदका देतंय.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Embed widget