एक्स्प्लोर

Hindu Religion: अंत्यसंस्कार करताना मृतदेहाच्या डोक्यावर काठीने 3 वेळा का मारले जाते? आत्मा शरीर कधी सोडतो? शास्त्रात काय म्हटलंय?

Hindu Religion: अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाच्या डोक्यावर काठीने तीन वेळा प्रहार केला जातो. यामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धा आहेत. शास्त्रांमध्ये याबद्दल काय म्हटलंय? जाणून घेऊया.

Hindu Religion: जो या पृथ्वीतलावर जन्म घेतो, त्याचा मृत्यूही अटळ आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले हे ज्ञान सर्वांनाच माहित आहे. तर गरुडपुराणात म्हटल्याप्रमाणे व्यक्ती हयात असताना तसेच त्याच्या मृत्यूनंतरही त्याला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावे लागते, म्हणूनच म्हणतात ना, माणसाने नेहमी चांगले कर्म करावे. व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. यात अनेक विधी केल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का? अंत्यसंस्कार करताना मृतदेहाच्या डोक्यावर तीन वेळा मारले जाते. हिंदू धर्मात तसेच शास्त्रात याबद्दल काय म्हटलंय? असे का करतात? जाणून घेऊया...

मृतदेहाच्या डोक्यावर काठीने 3 वेळा का मारले जाते?

अंत्यसंस्कार करताना मृतदेहाच्या डोक्यावर तीन वेळा मारले जाते. ही परंपरा मुख्यतः हिंदू धर्माशी संबंधित आहे. तसं पाहायला गेलं तर यामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धा आहेत. याला कपाल क्रिया म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार, कपाल क्रिया मृत व्यक्तीच्या आत्म्याला शरीरातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी केली जाते. असे मानले जाते की, जोपर्यंत कवटी तुटत नाही तोपर्यंत आत्मा शरीराशी जोडलेला असतो. कपाल क्रियेद्वारे आत्म्याला शरीर सोडण्यात मदत मिळते आणि तो पुढील जगाचा प्रवास सुरू करू शकतो. मानवी डोक्याच्या वरच्या भागात ब्रह्मरंध्र नावाचे स्थान आहे अशी हिंदूंची धारणा आहे.

आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो?

मृत्यूनंतर आत्मा या मार्गाने शरीर सोडतो. कपाल क्रियेच्या वेळी डोक्यावर काठीने प्रहार केल्याने ब्रह्मरंध्र उघडते आणि आत्मा शरीरातून बाहेर पडतो. कपाल क्रिया न केल्यास आत्मा भटकू शकतो, असेही मानले जाते. डोक्यावर काठीने तीनदा प्रहार केल्याने मृताच्या आत्म्याने शरीर सोडले आणि शांती मिळते याची खात्री केली जाते.

अंत्यसंस्काराच्या वेळी 'ही' क्रिया कोण करू शकतं?

तसं पाहायला गेलं तर ही एक प्राचीन धार्मिक परंपरा देखील आहे. शास्त्रात वर्णन केलेल्या नियम आणि नियमांनुसार त्याचे पालन केले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी कपाल क्रिया आवश्यक मानली जाते जेणेकरून मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळू शकेल. मृतदेह चितेवर ठेवून जाळला जातो. चिता जाळताना मृतदेहाच्या डोक्यावर लाकडी किंवा बांबूच्या काठीने तीन वार केले जातात. हे काम मृत व्यक्तीचा मुलगा, कुटुंबातील जवळचा सदस्य किंवा पुजारी करतात.

हेही वाचा>>>

Hindu Religion: अंत्यसंस्कार करताना बहुतेक पुरुषांचा शरीराचा 'हा' भाग जळत नाही, या भागाचे काय केले जाते? हिंदू धर्मात काय म्हटलंय? 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
शिवसेनेचं मिशन मुंबई; महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती
शिवसेनेचं मिशन मुंबई; महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
शिवसेनेचं मिशन मुंबई; महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती
शिवसेनेचं मिशन मुंबई; महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Chandrapur Farmer: कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Embed widget