एक्स्प्लोर

Sugar Export : केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी, मात्र, 'या' देशांमध्ये निर्यातीसाठी सूट 

साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखर निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे.

Sugar Export : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीबाबत (Sugar Export) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे. आता साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. मात्र, यातून काही देशांना सूट देण्यात आली आहे. युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील निर्यातीवर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. या दोन्ही ठिकाणी साखरेच्या निर्यातीला परवानगी असणार आहे. यामुळं  देशात साखर महाग होणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

2021-22 मध्ये भारताची साखर निर्यात 57 टक्क्यांनी वाढली

भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. भारतातील साखरेच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. येत्या काही वर्षांत भारतातील ऊसाचे उत्पादन झपाट्याने वाढेल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. साखर उत्पादनात भारत जगात पहिले स्थान कायम ठेवेल असेही सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळं भारताची साखर निर्यात 2021-22 मध्ये 57 टक्क्यांनी वाढून 109.8 लाख टन झाली आहे.

31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत बंदी

केंद्र सरकारनं 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आता एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी असणार आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे. कच्च्या, शुद्ध आणि पांढर्‍या साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध 31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आले आहेत. 

2021 ते 2022 मध्ये 394 लाख टन साखरेचं उत्पादन

युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील देशांमध्ये साखर निर्यात करता येणार आहे. त्यामुळं देशात साखरेच्या किंमती नियंत्रीत राहणार आहेत. या दोन बाजारपेठांमध्ये विशिष्ट प्रमाणात साखर निर्यात केली जाणार आहे. 2021 ते 2022 दरम्यान, देशात साखर कारखान्यांनी सुमारे  3 हजार 574 लाख टन ऊसाचं गाळप करुन सुमारे 394 लाख टन साखरेचं उत्पादन केले. यापैकी 359 लाख टन साखर कारखान्यांनी तयार केली. तर 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, परदेशात साखर पाठवत राहिल्यास आपल्या देशात साखरेचा तुटवडा निर्माण होईल, असे केंद्र सरकारला वाटत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखर महागणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. त्यामुळेच सरकारनं निर्यातीवर बंदी घातल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा; राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
शेतकरी, इथेनॉल ते साखर कारखाने! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित, विरोधकांनांही लगावला टोला
शेतकरी, इथेनॉल ते साखर कारखाने! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित, विरोधकांनांही लगावला टोला

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Embed widget