एक्स्प्लोर

Onion Price: टोमॅटोपाठोपाठ कांदाही सर्वसामान्यांना रडवणार? 'या' कारणानं दर गगनाला भिडण्याची शक्यता

Onion Price: देशात टोमॅटोचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. अशातच येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरांतही विक्रमी वाढ होऊ शकते, असं बोललं जात आहे.

Onion Price: देशात टोमॅटोच्या दरात (Tomato Price) विक्रमी वाढ झाली आहे. पण आता टॉमेटोपाठोपाठ आणखी एका पदार्थामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याची किंमत वाढू शकते. पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील (Maharashtra News) पाच जिल्ह्यांत कांद्याच्या किरकोळ किमतींत लक्षणीय वाढ झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी, सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 35.88 रुपये होती, 2021 मध्ये हीच किंमत काहीशी घसरली आणि सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये झाली. तर 2022 मध्ये ही किंमत 28.00 रुपये प्रति किलो होती. तसेच, यंदाच्या वर्षात म्हणजेच, 2023 मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणू शकतो. 

सरकारनं किती कांदा खरेदी केला? 

सरकारनं सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे 0.14 दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे. केंद्र सरकार 2023-24 हंगामासाठी 3 लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एप्रिलमध्ये सांगितलं होतं. तसेच, गेल्या हंगामात 2022-23 मध्ये 2.51 लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, 2021-22 मध्ये कांद्याचं उत्पादन 31.69 दशलक्ष टनांवरून 31.01 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज असल्याचा अहवाल भारत सरकारनंच जून महिन्याच्या सुरुवातीलाच दिला होता. 

सरकार एखादी गोष्ट बफर स्टॉकमध्ये का ठेवते? 

देशात जेव्हा जेव्हा दुष्काळ किंवा अन्नधान्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवते त्यावेळी नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हे लक्षात घेऊन सरकारनं बफर स्टॉकची व्यवस्था केली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा या बफर स्टॉकचा वापर केला जातो. याशिवाय एखाद्या खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या तर त्या किमती स्थिर ठेवण्यासाठीही बफर स्टॉक ठेवला जातो. जेव्हा पुरवठा कमी असतो आणि किंमती वाढत असतात, त्यावेळी सरकार ही पावलं उचलतं. रब्बी कांदा एप्रिलमध्ये काढणीला येतो. हा कांदा एप्रिलपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजेच, खरीप पीक काढणीपर्यंत ग्राहकांची मागणी पूर्ण करतो. 

80 रुपयांपर्यंत पोहोचलेत टोमॅटोचे दर 

देशभरात सर्वात आधी उष्णतेची लाट आणि त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटोच्या दरांवर परिणाम झाला आहे. पाऊस आणि अति उष्णतेमुळे पीक निकामी झाल्यामुळे बळीराजाचं नुकसान झालं आहेच, पण त्यासोबतच देशभरात पुरवठ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत टोमॅटोचे भाव 10 ते 20 रुपयांवरुन 80 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. म्हणजेच, प्रति किलो 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. हवामानामुळे टोमॅटोशिवाय इतर भाज्यांचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढले आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
Actor Girish Karnad Life Story: वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Raigad Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Embed widget