एक्स्प्लोर

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी कसोटी आजपासून सुरु झाली मात्र संपूर्ण दिवस पावसामुळं वाया गेला. पहिल्या दिवसाचं तिकीट ज्या प्रेक्षकांनी काढलं होतं त्याच्यासाठी नवी अपडेट समोर आली आहे.

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या तिसऱ्या कसोटीला आज सुरुवात झाली आहे. तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट ग्राऊंडवर आजपासून सुरु झाली. मात्र, आजचा पहिला दिवस पावसामुळं वाया गेला. भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ केवळ 13.2 ओव्हर इतका झाला. ऑस्ट्रेलियानं या दरम्यान बिनबाद 28 धावा केल्या. उस्मान ख्वाजानं  19 आणि नॅथन मॅकस्विनी यानं 4 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ पावसानं वाया गेल्यानं प्रेक्षकांची निराशा झाल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका निर्णयानं प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा 

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मोठी घोषणा केली असून पहिल्या दिवसाची  ज्या प्रेक्षकांकडे तिकिटं असतील त्यांना संपूर्ण रक्कम परत केली जाणार आहे.क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या रिफंड पॉलिसी नुसार एखाद्या दिवसात 15 ओव्हरपेक्षा कमी ओव्हरचा खेळ झाल्यास  किंवा मॅचचा निकाल काहीच न लागल्यास प्रेक्षकांना तिकिटाची रक्कम परत केली जाते. 

मॅचचा दुसऱ्या दिवसाचा वेळ बदलला 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.50 ला सुरु झाला. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास अगोदर सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ट्वीट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे.  ब्रिस्बेनमधील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं रोखण्यात आला. उद्या स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी  9.50 म्हणजेज भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.20  मिनिटांनी खेळ सुरु होईल. दुसऱ्या दिवशी किमान 98 ओव्हरचा खेळ होणं अपेक्षित आहे. 


ब्रिस्बेनचं वातावरण कसं राहणार?

14 डिसेंबरला ब्रिस्बेन सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून आलं. दिवसभरात 66.2 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार पाऊस आला. रविवारी 50 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात  आली आहे. पुढील काही दिवस ब्रिस्बेनमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं तिसऱ्या कसोटीत पावसामुळं अनेकदा व्यत्यय येऊ शकतो. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक एक मॅच जिंकली आहे. दोन्ही संघ मालिकेत सध्या बरोबरीत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीनं उर्वरित कसोटी सामने महत्त्वाचे आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जायचं असल्यास भारताला राहिलेले कसोटी सामने जिंकणं आवश्यक आहे. 

इतर बातम्या : 

India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget