एक्स्प्लोर

मराठवाड्यातील चार जिल्ह्यात 8 लाख 25 हजार हेक्टरावरील शेतीचं नुकसान, 80 टक्के पिके गेली 

Agriculture : मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या चार जिल्ह्यातील 80 टक्के पिके गेली, तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत.

Farmer News : पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीने मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या चार जिल्ह्यातील 80 टक्के पिके गेली, तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत. दरम्यान उन्हामुळे वाळून जाणारी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.   अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनातर्फे  717 कोटी 88 लाखांची मागणी करण्यात आली आहे. 

नांदेडसह इतर जिल्ह्यात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या  धडपड सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीने  सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, केळी ही 8 लाख लागवड क्षेत्रावरील पैकी 80 टक्के पिके गेली आहेत. तर यात 4 लाख 50 हजार हेक्टर एवढा सोयाबीन पीक पेरा आहे. त्यातील 3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. आता गेल्या 25 दिवसात जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळून जात असल्याने, शेतकऱ्यांचे यावर्षी 100 टक्के नुकसान झालेय. दरम्यान उन्हामुळे वाळून जाणारी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. ज्यासाठी शेतकरी टँकरने, तुषारने शेतीला पाणी देत आहेत.  

एकट्या नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित क्षेत्रात भर पडून एकूण सात लाख 41 हजार शेतकऱ्यांचे पाच लाख 27 हजार हेक्टर मधील खरीपासह बागायती व फळ पिकाचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे. यात बाधितांना  एनडीआरएफ च्या नव्या निकषनुसार (दुप्पट भरपाई )भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलै मध्ये तर एका महिन्यात विक्रमी 606 मिलिमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली सखल भागातील पिके पाण्याखाली गेली होती. जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नैसर्गिक आपत्तीत जिरायती  मधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तुर, उडीद, मूग या पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांस सह 314 हेक्टरवरील  बागायती व 66 हेक्टरवरील पिकांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वच सोळा तालुक्याकडून नुकसानीची अंतिम आकडेवारी घेतली. यासाठी  एनडीआरएफ च्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 8 लाख हेक्टर लागवड क्षेत्रा पैकी, 5 लाख हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत.तर एकट्या सोयाबीन लागवड क्षेत्राचे 3 लाख 50 हजार हेक्टर वरील नुकसान झाले आहे. दरवर्षी जिल्ह्यातून जवळपास 32 लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या नुकसानीचा फटका मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादनावर होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्र 8 लाख हेक्टर, बाधित क्षेत्र 5 लाख हेक्टर

सोयाबीन क्षेत्र 4 लाख 50 हजार हेक्टर
सोयाबीन नुकसान 3 लाख 50 हजार
गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादन 4 लाख हेक्टर 
32 लाख क्विंटल उत्पादन
मागणी 717 कोटी 88 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी

परभणी जिल्ह्यातील एकूण पीक लागवड क्षेत्र 5 लाख 35 हजार
सोयाबीन लागवड क्षेत्र  3 लाख 75 हेक्टर
तर अतिवृष्टी व आता पावसाअभावी सोयाबीनचे 60 टक्के नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एकुण पीक लागवड क्षेत्र - 3 लाख 70 हजार हेक्टर*
एकूण सोयाबीन लागवड  क्षेत्र -2 लाख 60 हजार हेक्टर 
हेक्टरी सोयाबीन उत्पादन 10  क्विंटल.

अतिवृष्टी व पावसायाअभावी 70 टक्के सोयाबीनचे नुकसान झालेय.
बीड जिल्ह्यातील एकूण पीक लागवड क्षेत्र साडेसात लाख हेक्टर आहे.
त्यापैकी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 
पावसाअभावी वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यातील 20 टक्के सोयाबीन बाधित झाले असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या चार जिल्ह्यात एकूण 8 लाख 25 हजार हेक्टरावरील सोयाबीन पिकांचे नुकसान अतिवृष्टी आणि पावसाअभावी झाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget