एक्स्प्लोर

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, सरकारची धोरणच शेतकऱ्याला मारक ठरतंय

Vidarbha Farmer Suicide : गेल्या पाच महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावतीमध्ये 143, यवतमाळमधील 132, बुलढाण्यात 83, अकोल्यात 82 तर वाशिममध्ये 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

अमरावती : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Vidarbha Farmer Suicide) होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कमी पडलं आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी गळफास लावत असून सरकारने या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे. 

कर्जाचा वाढता डोंगर अन् शेतकरी हतबल

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून जानेवारी ते मे या 5 महिन्यात तब्बल 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात 143 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नापिकी, अवकाळी पावसाने होणारे नुकसान यातून शेतकरी हतबल झालाय. यातच डोक्यावर वाढता कर्जाचा डोंगर, यातून आपला संसाराचा गाडा कसा हाकलायचा या विवंचनेत शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसतो आहे. 

सरकारने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे खासदार आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

कृषी मालावर टॅक्स, शेतकऱ्यांची डोकेदुखी

सरकारने कृषी मालावरती टॅक्स लावलेला आहे. मात्र हा टॅक्स शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. त्यामध्ये बियाणांची दरवाढ, यासोबतच बोगस बियाण्यांची होत असलेली विक्री यातून शेतकरी देखील बियाण्यांची प्रतवारी ओळखू शकत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणावरून शेतकऱ्यांची फसवणूक देखील होत आहे. अशा सर्व परिस्थितीतून शेतकरी जात असताना त्याला नैराश्य येतं आणि शेतकरी कायमची जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतो.  

सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात. मात्र योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी योजना राबवताना शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी तर शेतकऱ्यांनी हत्या करण्याची तयारी केली पाहिजे, मतदानाच्या रुपात हत्या केली पाहिजे असं वक्तव्य केलं. सरकारच्या या पॉलीसी शेतकऱ्यांना मारण्यासाठीच आहेत,  शेतकरी कसा मरेल यात राज्य सरकार सक्सेस झालं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मे महिन्यात पश्चिम विदर्भातील जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या

ही बातमी वाचा: 

 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget