एक्स्प्लोर

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, सरकारची धोरणच शेतकऱ्याला मारक ठरतंय

Vidarbha Farmer Suicide : गेल्या पाच महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावतीमध्ये 143, यवतमाळमधील 132, बुलढाण्यात 83, अकोल्यात 82 तर वाशिममध्ये 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

अमरावती : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Vidarbha Farmer Suicide) होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कमी पडलं आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी गळफास लावत असून सरकारने या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे. 

कर्जाचा वाढता डोंगर अन् शेतकरी हतबल

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून जानेवारी ते मे या 5 महिन्यात तब्बल 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात 143 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नापिकी, अवकाळी पावसाने होणारे नुकसान यातून शेतकरी हतबल झालाय. यातच डोक्यावर वाढता कर्जाचा डोंगर, यातून आपला संसाराचा गाडा कसा हाकलायचा या विवंचनेत शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसतो आहे. 

सरकारने या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे खासदार आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

कृषी मालावर टॅक्स, शेतकऱ्यांची डोकेदुखी

सरकारने कृषी मालावरती टॅक्स लावलेला आहे. मात्र हा टॅक्स शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. त्यामध्ये बियाणांची दरवाढ, यासोबतच बोगस बियाण्यांची होत असलेली विक्री यातून शेतकरी देखील बियाण्यांची प्रतवारी ओळखू शकत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणावरून शेतकऱ्यांची फसवणूक देखील होत आहे. अशा सर्व परिस्थितीतून शेतकरी जात असताना त्याला नैराश्य येतं आणि शेतकरी कायमची जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतो.  

सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात. मात्र योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी योजना राबवताना शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी तर शेतकऱ्यांनी हत्या करण्याची तयारी केली पाहिजे, मतदानाच्या रुपात हत्या केली पाहिजे असं वक्तव्य केलं. सरकारच्या या पॉलीसी शेतकऱ्यांना मारण्यासाठीच आहेत,  शेतकरी कसा मरेल यात राज्य सरकार सक्सेस झालं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मे महिन्यात पश्चिम विदर्भातील जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या

ही बातमी वाचा: 

 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget