एक्स्प्लोर

Maharashtra Sugar Production: असमाधानकारक पावसामुळे साखरेला महागाईची कडवट चव? यंदा राज्यातील साखर उत्पादन घटण्याची भीती

Maharashtra Sugar Production: राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस असला तरी ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याच्या परिणामी राज्यातले साखर उत्पादन घटण्याची भीती आहे.

Sugar News:  राज्यात आणि देशात अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे अनेक ठिकाणी तर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, साखर उत्पादन (Sugar Production) करणार्‍या क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्याने त्याचा परिणाम  साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामी शेतकरी आणि साखर कारखान्याचे आर्थिक गणित तर बिघडणार आहेच सोबतच साखरेच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात आणि देशात सर्वदूर पाऊस पडत आहे. मात्र, साखर कारखानदारी पट्ट्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. ऊस हे पिक प्रामुख्याने मुबलक पाण्यावर अवलंबून असल्याने आणि पावसाळ्यात मशागतीसोबतच खतांच्या मात्रेसोबत पाण्याची गरज असतांना लांबलेला पावसाचा फटका नवीन ऊस लागवडीसोबतच ऊस आणि पर्यायाने साखर उत्पादनाला बसणार आहे. यामुळे यंदा राज्यात साखरचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता ऊस साखर कारखानदारी असणार्‍या अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. नेमका हाच पट्टा साखर कारखानदारीशी निगडीत आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर गेल्यावर्षी 35 हजार हेक्टरवर आडसाली ऊसाची लागवड झाली होती. यंदा मात्र केवळ 11911 हेक्टरवरच ऊसाची लागवड झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले आहे.

एकट्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या 12.58 टक्के ऊसाची लागवड झाली आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय ऊस लागवड पुढीलप्रमाणे:

> नगर:  101 हेक्टर, 

> पारनेर:  64 हेक्टर, 

> श्रीगोंदा: 5 हजार 332 हेक्टर, 

> कर्जत: 1 हजार 285 हेक्टर, 

> जामखेड:  296 हेक्टर, 

> पाथर्डी:  551 हेक्टर, 

> संगमनेर:  164 हेक्टर, 

> कोपरगाव:  259 हेक्टर 

एकट्या अहमदनगर जिल्ह्यात ही स्थिती आहे. नाशिक, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही ऊस क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने तिथेही लागवड क्षेत्र घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यावर शेतकऱ्यांवर आणि साखरेच्या किंमतीवर देखील होणार आहे.

जून-जुलै महिना लोटला तरी देखील दमदार पाऊस न झाल्याने ऊस लागवड घटली आहे. त्यामुळं साखर उत्पादन देखील घटणार आहे.  त्यामुळे साखरेच्या किंमतीचा समतोल राखण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर जर बंदी घालण्यात आली तर साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना  उसाला चांगला दर देता येणार नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News 11 PM Top Headlines 11 PM 30 March 2025 रात्री 11 च्या हेडलाईन्सRich Thief Story Special Report : अट्टल चोराचा 1 कोटींचा बंगला,लोकांना लुटून श्रीमंत होणारा गजाआडRaj Thackeray Speech : औरंगजेबची कबर दिसली पाहिजे,  राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी ABP MAJHAChhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Embed widget