एक्स्प्लोर

Nitin Gadkari : 30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहरात गेली कारण....नितीन गडकरींनी सांगितली शेतकऱ्यांची व्यथा

विविध कारणामुळं शेतकऱ्यांचे स्थलांतर वाढले आहे, गावातील लोकं शहराकडे येत असल्याचे वक्तव्य मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.

Nitin Gadkari : गावात चांगले रस्ते नाहीत. शिक्षणाच्या सुविधा नाहीत, स्वच्छ पाण्याची उपलब्धता नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यामुळं रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळं लोकांचं स्थलांतर होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. या सर्व कारणामुळं देशातील 30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहराकडे आली आहे. ती खुशीनं नाही तर मजबुरीने आली असल्याचे ते म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्धघाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते.

शेतमालाला हवी तेवढी किंमत मिळत नाही

शेतीमालाच्या दराचा संबंध मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. लिंबू, संत्रा स्वस्त आहे, सरबत महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्कीड महाग आहे. शेतमालाला जेवढी हवी तेवढी किंमत मिळत नसल्याचे गडकरी म्हणाले. आपण सगळेजण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. भावाचा संबंध हा जागतिक ग्लोबल इकॉनॉमीशी असल्याचे गडकरी म्हणाले. आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. मलेशिया आणि इंडोनिशियातून तेलाची आात केली जाते. सूर्यफूलाचे तेल युक्रेनमधून, सोयाबीनचे तेल अर्जेंटीनामधून आयात होते असे गडकरी म्हणाले. 

कृषी विद्यापीठांनी जागतिक स्तरावर कोणत्या मालाचा किती स्टॉक याची माहिती द्यावी 

केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून दरवर्षी हमीभावात वाढ करते. आज परिस्थिती अशी आहे की, हमीभाव जास्त आहे आणि मार्केटमध्ये दर कमी आहेत. यासाठी सरकारला दीड लाख कोटी द्यावे लागत असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी कृषी विद्यापीठाला सल्ला देखील दिला. सगळ्या शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, विद्यापाठीने एक वेबसाईट उघडावी. त्यामध्ये मे आणि ऑक्टोबर दोन महिन्यात  शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर कोणत्या मालाचा किती स्टॉक शिल्लक आहे. त्याची विक्री किती झाली आहे, यासंदर्भातील माहिती द्यावी. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याची माहिती द्यावी असे गडकरी म्हणाले. 

...तर गुजरातऐवजी विदर्भातील कापसाला मागणी वाढेल

विदर्भातील कापसाला किंमत का मिळते कारण येथील मोठ्या प्रमाणातील कापूस जीनींग प्रेसमधून बांगलादेशमध्ये जातो. कोविड काळात बांगलादेशमध्ये कापूस निर्यात कमी झाला, त्यामुळं किमंती कमी झाल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भातील कापूस बांगलादेशमध्ये नेण्यासाठी एका कंटेनरमागे दोन लाख रुपयांचा खर्च येतो. कापसाला दर मिळवायचा असेल तर मुंबईचा समुद्र विदर्भात आणला पाहिजे अशी संकल्पना मी मांडली होती. आता रेल्वेने कापूस कोलकातामध्ये जाईल, तिथून नदीमार्गाने कापूस बांगलादेशमध्ये जाईल. याबाबत बांगलादेशच्या मंत्र्यांशी मी बोललो आहे. त्यामुळं एका कंटेनरमागे एक ते दीड लाख रुपये वाचतील. त्यामुळं विदर्भातील कापसाला मागणी वाढेल णि त्यातीन किंमतीत वाढ होईल असे गडकरी म्हणाले. बांगलादेशला गुजरातचा कापूस घेण्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च येतो आणि विदर्भातील कापूस घेण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च येईल, त्यामुळं बांगलादेशचे व्यापारी विदर्भाचा कापूस घेतील असे गडकरी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nitin Gadkari : '60 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करणार'; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 10 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळल्याचा आरोप Tirupati Temple : ABP MajhaZero Hour : युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही, Ramdas Athawale यांनी व्यक्त केली नाराजीZero Hour : मविआत मुख्यमंत्रीपदावरुन शर्यत तर महायुतीत जागांवरुन संघर्ष  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Embed widget