![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nitin Gadkari : '60 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करणार'; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
![Nitin Gadkari : '60 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करणार'; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती Transport minister nitin gadkari gives important information about ethanol vehicles in nagpur maharashtra detail marathi news Nitin Gadkari : '60 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करणार'; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/cdd52416b3f1f7e654d667d308fa1fb81661144976047381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
40 टक्के मोफत वीज निर्माण होणार : नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, "इथेनॉलचे वाहन हे स्वतः 40 टक्के मोफत वीजनिर्मिती करण्यास सक्षम असणार आहे. त्यामुळे पेट्रोलची देखील बचत होण्यास मदत होईल. पेट्रोल डिझेलचे दर हे 120 आणि 110 प्रिति लिटर असे आहेत. पण इथेनॉलचा दर हा फक्त 60 रुपये इतकाच आहे. त्याशिवाय 40 टक्के मोफत वीज देखील यामुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या वाहनाचा इंधन खर्च हा फक्त पंधरा रुपये प्रति लिटर याप्रमाणे होणार आहे." तसेच या वाहनांची किंमत जरी जास्त असली तरी ती हळूहळू कमी होईल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.
येणाऱ्या काळात वाहतूक क्षेत्रात क्रांती होणार : नितीन गडकरी
भविष्यात अशा वाहनांमुळे ऑटोमोबाईल तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये आधुकनिक तंत्रज्ञान प्रणालीला बरचं महत्त्व प्राप्त होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. "पर्यावरणाच्या दृष्टाने पेट्रोल आणि डिझेलची वाहनं थोडी अडचणीची असतात. पण येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचा फायदा नागरिकांना आता होणार आहे.", असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता वाहनांमुळे इंधन बचत तर होईलच पण यामुळे प्रदुषण देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवण्यास मदत होणार
भात, मका आणि ऊस यांपासून इथेनॉल या इंधनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे या पिकांचा अतिरिक्त साठ्याचा वापर आता इंधन निर्मितीसाठी करता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी बांबू आणि कापूस यांसाख्या पिकांचा देखील वापर करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)