एक्स्प्लोर

Lumpy Virus : कडाक्याच्या थंडीने लम्पीग्रस्त जनावरांवर विषाणूजन्य आजारांचा विळखा, दूध उत्पादन घटण्याची भीती

वातावरणातील या बदलामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात गेला आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झाली आहे.  त्यामुळे गुरांवर वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांचा विळखा बसताना दिसत आहे. आधीच लम्पीमुळे (Lumpy Virus) ग्रासलेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होताना दिसत आहे.  यामुळे मात्र पशुपालक चिंतेत आहे.

 राज्यभरात सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावारांध्ये " फूट अॅन्ड माऊथ डिसीज "  अर्थात तोंडखुरी व पायखुरी असे विषाणूजन्य आजार बळावत आहे. लम्पी नियंत्रणात येतो न येतो तोच आता पशुपालक गुरांवरील या नवीन संकटाने धास्तवले आहेत. वातावरणातील या बदलामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.  दूध उत्पादक संकटात आहे. 

आगामी काळात जर थंडीच प्रमाण वाढलं तर आता कुठे नियंत्रणात आलेला लम्पी आजाराचा फैलाव मात्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती ही पशुवैद्यक तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे अशा आजारांपासून आपल्या प्राण्याला वाचविण्यासाठी बाधित जनावारांचं विलगीकरण करून लसीकरण करून घेण्याचं आवाहन बुलढाण्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजेंद्र पाटील यांनी केलं आहे.

साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी हे थंडीचे महिने असतात आणि या दोन महिन्यात राज्यातील जनावरांवर दरवर्षी थोड्याफार प्रमाणात विषाणूजन्य आजाराची साथ असते. पण यावर्षी लम्पीमुळे आधीच बाधित गुरांवर जर तोंडखुरी व पायखुरी अशा आजाराचे हल्ला केला तर मात्र गुरे चारा पाणी खाणे बंद करतात आणि याच सरळ परिणाम हा दूध उत्पादनावर होतो . त्यामुळे जर अजून थंडीच प्रमाण राज्यात वाढलं तर मात्र आगामी दिवसात दूध उत्पादन घटण्याची भीती ही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

राज्यातील दूध उत्पादन या महिन्यात किती असते?

  • जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी दूध उत्पादनात घट होत असते.
  •  कडाक्याच्या थंडीमुळे गुरे चारा खाणे कमी करतात त्यामुळे दूध उत्पादन कमी होते
  • साधारणतः पावसाळ्यानंतर गुरांवर विषाणूजन्य आजार येतात त्यामुळे दूध उत्पादन घटते
  • थंडीमुळे साधारणपणे राज्यातील दूध उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांची घट दरवर्षी येते.

   नुकत्याच झालेल्या लम्पीच्या प्रादुर्भावाने राज्यात हजारो जनावरे मृत्युमुखी पडली असताना आता मात्र पशुपालकांसमोर नवे संकट उभ राहिल आहे. सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे व पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गुरांवर वेगवेगळे विषाणूजन्य आजार उद्भवत असल्याने दूध उत्पादन घटण्याचीही भीती आता व्यक्त होत आहे. यामुळे मात्र पशुपालक त्रस्त झाले असून राज्यातील पशूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं चित्र आहे 

 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये फळांच्या प्रदर्शनाचे आयोजन, कोण ठरणार मिलांज महाराजा पुरस्काराचा मानकरी?
नाशिकमध्ये फळांच्या प्रदर्शनाचे आयोजन, कोण ठरणार मिलांज महाराजा पुरस्काराचा मानकरी?
Satbara Big Changes :  ७/१२ उताऱ्यात होणार मोठा बदल; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Satbara Big Changes :  ७/१२ उताऱ्यात होणार मोठा बदल; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानच्या 22 व्या हप्त्यापासून 'हे' शेतकरी राहणार वंचित, जाणून घ्या सविस्तर माहिती 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानच्या 22 व्या हप्त्यापासून 'हे' शेतकरी राहणार वंचित, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gokul Milk : दूध उत्पादकांना दिलासा! गोकुळकडून गाई आणि म्हशीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना किती फायदा?
Gokul Milk : दूध उत्पादकांना दिलासा! गोकुळकडून गाई आणि म्हशीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना किती फायदा?

व्हिडीओ

Plane Crash Special Report : असुरक्षित उड्डाण, दुर्घटना खराब हवेमुळे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे?
Bhaskar Jadhav Vidhansabha Speech : लबाड सरकार, लाडक्या बहिणींना फसवलं, राज्यपालही खोटं बोलले
Dhananjay Mahadik on Krishnaraaj Mahadik : 'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही
Sudhir Mungantiwar vs Yogesh Kadam : धान उत्पादकांचा प्रश्न,मुनगंटीवार-योगश कदम भिडले
Anil Parab Vidhan Parishad : अनिल परब प्रलंबित विषयावरुन संतापले, शिंदेंनी 1 मिनिटात विषय संपवला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeep Sagale : गुजरातमध्ये मराठमोळं पाऊल! अकोल्याचे सुपुत्र संदीप सागळे गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
गुजरातमध्ये मराठमोळं पाऊल! अकोल्याचे सुपुत्र संदीप सागळे गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
IND vs ZIM : झिम्बाब्वे विरुद्धच्या 'करो या मरो' सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू T20 वर्ल्ड कप अर्ध्यावर सोडून घरी परतला
झिम्बाब्वे विरुद्धच्या 'करो या मरो' सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू T20 वर्ल्ड कप अर्ध्यावर सोडून घरी परतला
Gold Chhatrapati Sambhajinagar: गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी झुंबड, पैठणमध्ये नागरिक टोपल्या-चाळण्या घेऊन नदीत उतरले, नेमकं काय घडलं?
गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी झुंबड, पैठणमध्ये नागरिक टोपल्या-चाळण्या घेऊन नदीत उतरले, नेमकं काय घडलं?
Raigad : रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, उदय सामंत आणि सुनील तटकरेंची बैठक सुरु, नवं समीकरण समोर येणार? 
रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंचा मोहरा सुनील तटकरेंच्या भेटीला, कोण सत्तेत? कोण विरोधात?
Tushar Damgude : काल जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, जे केलं ते योग्यच होतं, कोणतीही खंत नाही: तुषार दामगुडे
काल जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, जे केलं ते योग्यच होतं : तुषार दामगुडे
Mumbai Parking Issue: अरुंद गल्ल्यांतील पार्किंगवर महापालिकेकडून निर्बंध; मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंडाची शक्यता
अरुंद गल्ल्यांतील पार्किंगवर महापालिकेकडून निर्बंध; मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंडाची शक्यता
Team India: भारत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? सूर्या ब्रिगेडसाठी तीन समीकरणं महत्त्वाची ठरणार? जाणून घ्या
भारत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? सूर्या ब्रिगेडसाठी तीन समीकरणं महत्त्वाची ठरणार? जाणून घ्या
Kerala News: केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी सेवा तीर्थवरून पहिली मोठी घोषणा होण्याची शक्यता, नेमकं कारण काय, वाचा सविस्तर
केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी सेवा तीर्थवरून पहिली मोठी घोषणा होण्याची शक्यता, नेमकं कारण काय, वाचा सविस्तर
Embed widget