एक्स्प्लोर

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका

वातावरणातील लहरीपणाचा फटका बसल्याने हापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेलाय.

Ratnagiri: हापूस! आपल्यापैकी अनेकांना आवडणारा आणि कोकणची ओळख बनलेला हा आंबा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा हाच हापूस कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठं संकट घेऊन आला आहे. शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ 20 टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय. वातावरणातील लहरीपणाचा फटका बसल्याने हापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेलाय. (Kokan Alphanso)

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

“यंदा जगायचं कसं? आणि जगवायचं कसं?” असा मोठा प्रश्न कोकणातील बागायतदारांसमोर उभा ठाकलाय. वातावरणातील बदलांमुळे हापूस उत्पादन घटलं असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आनंद देसाई यांच्यासारखे अनेक शेतकरी या संकटातून जात आहेत. वडिलोपार्जित हापूस बागा आणि कॅनिंग व्यवसाय सांभाळणाऱ्या देसाईंचं म्हणणं आहे की, यंदाची परिस्थिती अभूतपूर्व आहे.

हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हापूसची लागवड केली जाते. काही जाणकारांच्या मते, हापूस आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायातून सुमारे 2500 कोटी रुपयांची उलाढाल होते. रत्नागिरीत सुमारे 1.20 लाख हेक्टर, सिंधुदुर्गात 34 ते 35 हजार हेक्टर आणि रायगडमध्ये 11 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.

मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे ट्रान्सपोर्ट, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, गवत, पेट्यांसाठी लाकूड, मजूर, गाड्या अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. निरूळ गावातील स्वरूप गांगण यांसारखे हापूस वाहतूकदारही या संकटामुळे अडचणीत आले आहेत.

मजूर आणि कर्जाचा प्रश्न

कोकणात हापूसच्या हंगामात नेपाळमधून मोठ्या प्रमाणावर मजूर येतात. स्थानिक मजुरांनाही काम मिळतं. मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे मजुरांना काम देणं आणि त्यांचे पगार देणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालं आहे. अनेक शेतकऱ्यांवर आधीच लाखोंचं कर्ज असून त्यातून बाहेर पडण्याची चिंता वाढली आहे.

या अस्मानी संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनाची मागणी केली आहे. औषध फवारणी आणि शेती व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर मार्गदर्शन मिळण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

निसर्गाचा फटका, शेतकरी हतबल

जगभरात कोकणच्या हापूसची ख्याती...पण, यंदा मात्र निसर्गाची वक्रदृष्टी त्याच्यावर पडलीय...निसर्गाच्या लहरीपणाच्या या चक्रात असलेला हापूस आणि त्यात भरडणारा कोकणातील शेतकरी यांची स्थिती यंदा मात्र बिकट आहे...त्यामुळे आता जगायचं कसं? आणि जगवायचं कसं? हाच सवाल उरात घेऊन कोकणातील शेतकरी परिस्थितीशी लढतोय....

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget