एक्स्प्लोर

Kisan sabha : ओला दुष्काळासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन, उद्या राज्यपालांना निवेदन देणार

शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी किसान सभेचे (Kisan Sabha) राज्यभर धरणे आंदोलन सुरु आहे.

Kisan sabha : शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी किसान सभेचे (Kisan Sabha) राज्यभर धरणे आंदोलन सुरु आहे. 23 नोव्हंबर  राज्याच्या विविध भागात किसान सभेच्या वतीनं हे आंदोलन सुरु आहे. किसान सभेच्या अकोले इथं झालेल्या राज्य अधिवेशनात 23 मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले होते. या मागण्यांची सरकारनं दखल न घेतल्यामुळं 23 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना रास्त हमी भाव देणारा केंद्रीय कायदा करावा तसेच प्रस्तावित केंद्रीय वीज विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी उद्या (26 नोव्हेंबर)  देशभर राज्यपाल भवनांवर मोर्चे आयोजित करण्याची हाक देण्यात आली आहे. उद्या राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात येणार आहे.

नेमक्या काय आहेत मागण्या?

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये अर्थसहाय्य द्यावं
गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे कराव्या
वनजमिनी, देवस्थान जमिनी कसणारांच्या नावे करा
कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करा

उद्या तीव्र आंदोलन करण्याचे नियोजन 

या मामागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने 23 नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलने सुरू केले आहे. 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून आंदोलन तीव्र करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  किसान सभेच्या अकोले राज्य अधिवेशनाने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी बाधित शेतकऱ्यांना अग्रिम व अंतिम भरपाई विनाविलंब द्यावी यासह 23 मागण्यांचे ठराव संमत केले होते. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास 23 नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. यानुसार राज्यभर आंदोलने सुरू करण्यात आली आहेत.

या जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी 

ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, अमरावती, वर्धा, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत आचार संहितेचे कारण पुढे करून प्रशासनाने आंदोलनास परवानगी नाकारली आहे. तरी या जिल्ह्यांमध्ये 26 नोव्हेंबरला  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाबरोबर विस्तारीत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे.  
शेतकऱ्यांना रास्त हमी भाव देणारा केंद्रीय कायदा करावा व प्रस्तावित केंद्रीय वीज विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी 26 नोव्हेंबर रोजी देशभर राज्यपाल भवनांवर मोर्चे आयोजित करण्याची हाक दिली होती. राज्याच्या स्थानिक मागण्या जोडून घेत किसान सभेने संयुक्त किसान मोर्चाच्या या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत समविचारी संघटनांना सोबत घेत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने उद्या राज्यपालांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना धोका, हरभरा उत्पादकही चिंतेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Shani Shingnapur Temple : शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 01 March 2025Santosh Deshmukh Case Walmik Karad Exposed : संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडचABP Majha Marathi News Headlines 11.30 AM TOP Headlines 11.30 AM 01 March 2025HSRP Number Plate : राज्यात एचएसआरपी नंबर प्लेटचा वाद, तिप्पट वसुलीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Shani Shingnapur Temple : शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
Uttarakhand Avalanche : बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
Embed widget