एक्स्प्लोर

Oil Import Duty: सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात कपातीचा निर्णय; दर पडण्याची शेतकऱ्यांना भीती

Soyoil Sunflower Oil: दोन्ही पिकांवरील आयात शुल्क हे 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.

Soyoil Sunflower Oil: केंद्र सरकारने आजपासून सोयाबीन (Soyabean) आणि सूर्यफुलावरील (Sunflower Oil) आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी, यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. आता दोन्ही पिकांवरील आयात शुल्क हे 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशातील दोन्ही पिकांचे दर पडण्याची शक्यता निर्माण झालीये. 

सोयाबीन आणि सूर्यफूल हे तेलवर्गीय पिकांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले पिकं आहेत. मात्र, यावर्षी आता दोन्ही पिकांचे भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने आजपासून सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात करीत ते 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणले आहे. यामुळे परदेशातून या दोन्ही उत्पादनांच्या आयातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा फटका थेट भारतीय शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणात आयात केल्याने दोन्ही पिकांच्या किंमती पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात  आहे. 

सोयाबीन आणि सूर्यफुलाचा  हमीभाव

           2022-23        2023-24

सोयाबीन   4300        4600
सूर्यफूल    6400         6770

देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने यापूर्वी अनेक निर्णय घेतले आहेत. याचाच भाग म्हणून 20 लाख टन कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलाच्या वार्षिक आयातीवर सीमाशुल्क आणि कृषी पायाभूत विकास उपकर माफ केले आहेत. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि प्रथम क्रमांकाचा वनस्पती तेल आयातदार आहे.

आपल्या देशातील 60 टक्के तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते आहे. त्यातील एक मोठा भाग पाम तेल आणि त्याचे व्युत्पत्ती (By-Product) आहे. जे इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जाते. भारत मुख्यत्वे मोहरी, पाम, सोयाबीन आणि सूर्यफूलापासून तयार झालेले खाद्यतेल वापरतोय. या निर्णयाचा परिणाम या दोन्ही तेलाच्या किंमतींवरही होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. 

तूर आणि उडीदाच्या साठा मर्यादा आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करा, केंद्राचे राज्यांना निर्देश

तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे. तसेच साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठा मर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली तूर आणि उडीद डाळींचा साठा जाहीर करण्यासंदर्भात बैठक झाली. यामध्ये राज्य सरकारांकडून साठा मर्यादेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राज्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, केंद्रीय गोदाम महामंडळ आणि राज्य गोदाम महामंडळ यांच्यासमवेत ही बैठक झाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget