एक्स्प्लोर

Agriculture News : भंडाऱ्यातील मिरची उत्पादक अडचणीत, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं क्वालिटी घसरली, खरेदीकडं व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं क्वालिटी घसरली आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांनी मिरची खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

Agriculture News in Bhandara : भंडारा (Bhandara) जिल्हा तांदूळ (Rice) उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. मात्र, मागील काही वर्षात तांदळाची शेती करणं जिकरीचे झाल्यानं शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मिरचीची (Chili) लागवड करायला सुरुवात केली आहे. मात्र, यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं मिरचीची क्वालिटी घसरली असून तिचा दरही कमी झाला आहे. त्यामुळं अशा मिरचीच्या खरेदीकडे व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळं मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मिरचीला किलोला 14 ते 18 रुपयांचा दर, शेतकरी चिंतेत

तुमसर, मोहाडी यासह अन्य तालुक्यातही मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील मिरची दिल्ली आणि बंगळुरु याठिकाणी व्यापाऱ्यांनी विकली होती. त्यावेळी जवळपास 70 रुपयांचा दर किलोला मिळाला होता. मात्र, यावर्षी वातावरण बदलामुळं मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळं मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानं मिरचीची वाढ खुंटली आहे. मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्यानं व्यापाऱ्यांनी मिरची खरेदीकडे पाठ फिरवली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मिरची नाईलाजानं 14 ते 18 रुपये किलो दरानं विकावी लागत आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळं मिरची लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही. उत्पादन कमी झाले सोबतच मिरचीची क्वालिटी नसल्यानं त्याला दरही मिळाला नाही. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील मिरचीच्या मागणीचा समतोल राखण्यासाठी नागपूर, अमरावती जिल्ह्यातून मिरचीची आवक वाढली आहे. परिणामी, दिल्ली आणि बंगळुरुला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

भंडारा जिल्ह्याती मिरचीची काय स्थिती

भंडारा जिल्ह्यात 900 हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे.
एकूण उत्पादन 63 हजार किलो
एका एकरात 30 क्विंटल उत्पादन
 चुरडा, मुरडा, बोकडया रोगाचा मिरचीच्या पिकावर प्रादुर्भाव झाला आहे
 नागपूर, अमरावती जिल्ह्यातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे
मिरचीची योग्य क्वालिटी नसल्याने व्यापाऱ्यांनी मिरची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे 

नंदूरबारमध्ये मिरचीची आवक घटली

नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समिती (Nandurbar Agricultural Produce Market Committee)  ही  देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ आहे. सध्या या बाजार समितीमध्ये मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मिरचीवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भाव आणि अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळं बाजारात मिरचीची आवक कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजार समितीत मिरचीची आवक घटली, उत्पादनात घट होण्याची कारणं काय?


 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Rohit Pawar Onion Farmers Protest: निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये, सरकार उपकार करतंय का? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये, सरकार उपकार करतंय का? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Embed widget