एक्स्प्लोर

Animal Husbandry : पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी? जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय करावं?

सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्यांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. पशुपालकांनी पावसाळ्यात जनावरांची नेमकी काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती.

Animal Husbandry : सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. आणखी काही ठिकाणी म्हणावा तसा पाऊस पडत नाही. मात्र,पावसाळ्यात जनावरांची मोठी गैरसोय होते. शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई म्हशींचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्व आहे. अशा स्थितीत पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची नेमकी काळजी कशी घ्यावी, याची माहिती आपण पाहणार आहोत.

पावसाळ्यात जनावरांची काळजी घेणं महत्वाचं

आज नवे तंत्रज्ञान आलं असलं तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेती कामासाठी बैल आणि दूधासाठी गाई म्हशींचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्व आहे. सोबत शेळी मेंढी पालनासारखे जोड व्यवसाय देखील त्याच्या उत्पन्नात भर घालतात. त्यामुळं पावसाळ्यात अशा जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर रहातो. त्यामुळं जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. जनावरांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर आजार कमी होवून पशुपालकाचे आर्थिक नुकसान होत नाही. बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होवून जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात. त्यामुळं गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधीचा वापर, चाऱ्यांचे योग्य प्रकारे नियोजन करुन आपल्या जनावरांची पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. 


Animal Husbandry : पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी? जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय करावं?

गोठ्याचं योग्य व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. गोठ्यात पाणी येणार नाही याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी. पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानी गोठा धुवून घ्यावा. गोठ्यात सुर्यप्रकाशासोबतच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असणं गरजेचे आहे. त्यामुळं गोठ्यातील जागा कोरडी राहण्यास मदत होईल. तसेच गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून रवंथ करतील. गोठ्यातील दलदल कमी झाल्यास स्तनदाह आजार कमी होण्यास होतो. 

गोठा कोरडा ठेवावा

पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचणार नाही याचीदेखील दक्षता घ्यावी. जनावरांचे मलमूत्र वेळीच स्वच्छ करुन गोठा कोरडा करावा. निश्चित कालावधीत गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावं. गोठ्यातील हवा खेळती राहिल्यास आणि सुर्यप्रकाश असल्यास जनावरांच्यादृष्टीने चांगले वातावरण रहाते.


Animal Husbandry : पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी? जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय करावं?

चारा व्यवस्थापन कसं कराल

जनावरांना पावसानं भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देण्यात येऊ नये. ओले गवत मऊ असल्यानं जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतू, त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतूमय पदार्थ कमी असल्यानं जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना जुलाब होतात. त्यामुळं जनावरांसाठी देण्यात येणारं पशुखाद्य किंवा सुका चारा कोरडा राहील याबाबत दक्षता घ्यावी. 

पाऊस जनावरांना घेवून झाडाखाली थांबू नका 

जनावरांना बाहेर चरण्यासाठी घेवून जातांना विशेष काळजी घ्यावी. जनावरांना पाऊस किंवा विजा पडतांना झाडाखाली घेवून थांबू नये. जवळपास निवारा असल्यास त्याठिकाणी घेवून थांबावं. पावसाळ्याच्या सुरुवातीस बागायती क्षेत्रात फुलीचे गवत मोठ्या प्रमाणात आढळून येते. जनावरांना फुलीचे गवत खावू घातल्यास विषबाधेमुळं कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावतात. विशेषत मेंढ्यामध्ये हा प्रकार आढळून येतो. त्यामुळं पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यातील वातावरण विविध कृमींसाठी अनुकूल असते. त्यामुळे विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या सभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवल्यास त्यांना होणारा आजाराचा संसर्ग टाळता येतो. त्यासोबतच त्यांचे पोषण आणि पावसाळ्यातील आजाराबाबत माहिती करून घेत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death : तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवारRahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरलChhatrapati Sambhajinagar : गंगापूरमध्ये पहिली चारा छावणी सुरूCM Eknath Shinde  : मुख्यमंत्र्यांनी घेतलं टेंभीनाका देवीचं दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death : तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Embed widget