एक्स्प्लोर

Agriculture news : शेतकऱ्यांचे 400 रुपये द्या, अन्यथा कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही; स्वाभिमानीचा उद्या कोल्हापुरात एल्गार 

मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये अधिक द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.

Agriculture News : मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये अधिक द्यावे. ते पैसे दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलीय. या प्रमुख मागणीसह विविध मांगण्यांसाठी उद्या (13 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावरील मोर्चा  काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे 400 रुपये घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पैसे दिले नाहीतर आम्ही यावर्षी कारखान्याचं एकही धुराडं पेटवू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला.  

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल यांची रिकव्हरी अकरा आणि साडेअकरा टक्के आहे. या कारखान्यांना जर 3300 आणि 3400 रुपयांचा दर देता येत असेल तर मग 13 टक्के रिकव्हरी असलेल्या कारखान्यांना दर देणं का शक्य नाही असा जाब आपण विचारला पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं आपली ताकद दाखवली पाहिजे. त्याशिवाय कारखानदार पैसे देणार नाहीत आणि सरकार त्यांना पैसे देऊ देणार नाही असं राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं ज्याच्या घरी ऊस आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.  

कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करायला तयार, आपण संघटीत होणं गरजेचं

आपण लढलो तर आपल्या ऊसाच्या कांडीला सोन्याचा भाव येणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखर उद्योगामध्ये पुढील दोन वर्ष चांगलीच तेजी असणार आहे. त्यामुळं साखर कारखानदार नेहमीप्रमाणं आपली पिळवणूक करायला संघटीत झाले आहे. त्यामुळंआपण संघटीत होऊन लढलं पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. मागचा साखरेचा गळीत हंगाम सुरू झाला त्यावेळी 3100 रुपये भाव होता. आता साखरेचे दर 3800 ते 3900 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. सरासरी साखरेचा दर 3600 रुपये धरला तरी साखर कारखान्यांना टनाला 600 ते 700 रुपये जादा मिळणार आहेत. यातील शेतकऱ्यांना किमान 400 रुपये द्यावेत, अशी आमची मागणी असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

ऊसाच्या उत्पादनात घट येणार 

यावर्षी राज्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जात आहेत. कमी पावसामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. खताच्या वाढत्या किंमती, पाणी टंचाई यामुळे यावर्षी उसाचे उत्पादन  घटणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं चांगले कारखाने जास्तीत जास्त 90 ते 100 दिवस चालू शकतील. अन्य कारखान्यांचा एक- दीड महिन्यातच गळीत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : दुसऱ्या हप्त्याचे 400 रूपये तत्काळ द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget